Friday, August 24, 2012

* स्त्रियांचे स्वातंत्र्य व स्त्री मुक्ती आणि वास्तव*

 * स्त्रियांचे स्वातंत्र्य  व स्त्री मुक्ती आणि वास्तव*
-----------------------------------------------------
    प्रत्यक्षात एक वस्तुस्थिती स्पष्ट  आहे की निसर्गात मानवासहित प्रत्येक प्राण्यात (फक्‌त काही अपवाद वगळता) नर आणि मादी या दोनच प्रजाती असून त्या एकमेकांशिवाय अपूर्ण आहेत.  जीवन, संगोपन, प्रजातीची वाढ, संवर्धन या निसर्गाच्या संतुलनात्मक क्रिया सहजगत्या साकार होतात, त्या नर आणि मादी यांच्या सहकार्यानेच, आणि त्यासाठी हे दोन्ही घटक एकमेकांसाठी आवश्यक आहेत.  दोघांची प्रकृती व जीवनकार्य परस्परभिन्न आहे.  प्रत्येक वस्तु व जीव विशिष्ट  काळा नंतर नष्ट  होणार या निसर्ग नियमामुळे  जैवसंतुलन साधण्याकरीता प्रजनन आवश्यक ठरते.  नेमक्या याच मुलभूत गरजेमुळे  स्त्री पुरूषांचे कार्यक्षेत्र ठरले .  सहाजीकच दोघांच्या शक्तीच्या मर्यादा निश्चित झाल्या.  विविध आपत्तीपासून स्त्रीचे रक्षण करणे, पालन करणे हे पुरूषांचे महत्वाचे कार्य ठरले .  आणि याचवेळी  स्त्रीयांना "धन' मानले  जाऊ लागले .  त्यातूनच पुरूषप्रधान संस्कृती सहजच मान्य झाली .  धनाचा सांभाळ  करणे, वापरणे, धनासाठी युद्ध करणे आणि व्यापार करणे या गोष्टी  नित्याच्याच घडू लागल्या.  कालांतराने पुरूषप्रधान संस्कृतीचे दुष्परिणाम जगभर दिसू लागले .  पुरूषी महत्वाकांक्षा आणि लोभ जोर धरू लागला  .  शतकानुशतके स्त्रीयांच्या व्यक्ती स्वातंत्र्या वर नेहमीच विविध बंधने घातली  गेली . त्यांना डांबून ठेवणे, स्वत:च्या श्रीमंती निमित्य  त्यांचे प्रदर्शन करणे घडू लागले .  जुलुम, अत्याचार व प्रजनन या चक्रात स्त्री वर्ग कायम त्रस्त होता.
    गेल्या शतकाच्या उत्तरार्धात 1907 साली  अमेरीकेत न्युयार्क येथे उद्योग जगतातील  महिलांची एक परिषद आयोजीत केली  होती.  त्यासाठी जगभरातून मोठ्या  संख्येने स्त्रीया एकत्र आल्या व त्यांनी विविध सोई सवलती सोबत मतदानाच्या हक्कांच्या मागण्याचे निवेदन प्रथमत: दिले .  हजारो वर्षे मत स्वातंत्र्य  जीथे नाही तिथे मतदानाचा अधिकार कसा शक्य असणार? पण 8 मार्च 1908 साली  स्त्रीयांचा मतदानाचा हक्क मान्य झाला  आणि नवे पर्व सुरू झाले .  स्त्रीयांच्या स्वातंत्र्या तील  पहिला  टप्पा पार झाला .  पुरूषाप्रमाणे आपणही स्वकर्तृत्वाने विविध क्षेत्रात बरोबरीने काम करू शकतो हे सिद्ध करण्याची संधी स्त्रियांना मिळत गेली .  बौद्धिक गुणवत्तेत स्त्रीया कुठेही कमी नसून वेगवेगल्या  क्षेत्रात स्वावलंबी होऊन स्वत:चा प्रभाव आज स्त्री सिद्ध करीत आहे. मोठ्या  शहरातील  उच्च शिक्षित स्त्रीयांना संधी भरपूर असली  तरी मध्यम शहरे व ग्रामीण भागात आजतरी स्त्रीया विविध संधी पासून वंचित आहेत.  विविध सोयी उपलब्ध नाहीत.  यासोबत कुटुंबातील  पुरूषांची नकारात्मक मानसीकता स्त्रीयांच्या वैचारीक प्रगतीच्या आड येते.  देशात कितीतरी ठिकाणी आदिवासी ग्रामीण भागात स्त्रीयांच्या विचारांना स्थान नाही, मान्यता नाही.  चेहरा पदराने लपवण्याची सक्ती आहे, स्त्रीभृणहत्या समाजाच्या सर्व स्तरात उच्चांक गाठते आहे.  मुलींना शिक्षणाची संधी नाकारली  जात आहे.  शिक्षणाचा आर्थिक भार असह्य आहे.  कायदयाने बंदी असताना सुद्धा बाल विवाह उरकले  जात आहेत.  बाल कामगार म्हणून मुलीं चा वापर फार मोठ्या  प्रमाणात होत आहे.  आनर किलींगच्या निमित्या  ने युवतींचा जीव घेतला  जातोय.  ग्रामीण भागात स्त्रीया दहशतीच्या वातावरणात जगत आहेत हे सत्य आहे.  विशेषत: लहान मुली वर लैगिक अत्याचाराचे प्रमाण फारच चिंताजनक झालेले  आहे.  पुर्वी  चार भिंतीच्या आत स्त्रीयांना धोका होताच, पण शिक्षण व विकासाची दालने जसजसी उघडायला  लागली  तसा स्त्रीयांवरील  अत्याचार, लैगिक शोषण, छेडखानी, विनयभंगाच्या प्रकारात फारच वाढ झाली  आहे.  कायदा कठोर तर हवाच.  गुन्हेगाराला  जन्मठेप वा फाशीची शिक्षा व्हायलाच हवी.  आजही महिलांना फक्त उपभोगाची वस्तू समजले  जाते हे विदारक सत्य आहे.  ** नवीन जन्म घेणारे बाळ मातेच्या उदरांत संपूर्ण सुरक्षित असतेच पण जन्माला येऊ पाहणारी कन्या [भ्रूण ]मातेच्या गर्भातही सुरक्षित नाही ,हे वर्तमानाचे विदारक सत्य आहे .केवळ मुलगी झाली या कारणाने कितीतरी मातांना जीवघेणा ,मानसिक छळ ,अपशब्द सहन करावे लागतात .**   हा दृष्टीकोन  कसा बदलेल ?
    मुलींना हीन लेखणे योग्य नाही.  मुलगी म्हणजे जगाचा मुलाधार, प्रतिष्ठा  आहे.  माहेर आणि सासरची दोन्ही कुळ  साधणारा दुवा म्हणजे मुलगी.  ती दोन्ही कुलांचं हित साधत असते.  विवाह संस्थेचं महत्व नक्कीच लक्षणीय आहे.  त्यामुळेच फार मोठा वर्ग शांततेच जीवन जगत आहे.  असे सुखी परिवार नेत्रदिपक विकास साधू शकत आहेत.  मात्र धोका इथेही दडून बसला  आहे.  अती उच्चशिक्षित असल्यामुळे  पती पत्नी दोघेही मोठ्या  पगारावर नोकरीत किंवा व्यवसाय, करिअर मध्ये व्यस्त आणि गर्क आहेत.  त्यांना कुणाचीही जबाबदारी नको आहे अगदी स्वत:च्या अपत्याची सुद्धा जबाबदारी नको आहे.  त्यांना मुल च नको आहे.  दोघेही फारसे एकमेकांसाठी वेळ  काढू शकत नाहीत आणि या वर्गामध्ये दुर्दैवा ने घटस्फोटाचे प्रमाण धोकादायक वाढलेल  आहे.  या श्रीमंत वर्गातील  स्त्रीयांना पुरेपूर स्वातंत्र्य  आहे आणि त्यांचे जीवनसुद्धा मुक्त वातावरणात त्यांच्याच इच्छेनुसार असताना कित्येकांना अपयश  का यावे ?
    स्त्रीमुक्ती या संकल्पनेचा सर्वांगीण विचार करावयाचा झाल्यास आजच्या विज्ञाननिष्ठ बदलत्या वातावरणात न जमणाऱ्या , न समजणाऱ्या , कर्मकांडांनी पुरेपूर व्यापून राहिलेल्या, दंतकथेमध्ये शोभून दिसणाऱ्या  अशा अनेक विचार, कल्पना व क्रियांपासून जाणिवपूर्वक मुक्ती मिळवणे व परंपरेच्या नावाखाली अवास्तव दबावाला  स्पष्ट  विरोध करणे गरजेचे आहे, * मात्र परंपरेने चालत आलेल्या शाश्वत सत्यांचा शुद्धबुद्धीने स्विकार करणे सुद्धा तितकेच गरजेचे आहे. *  अनेक तथाकथीत तज्ञ म्हणवणाऱ्या  महाभागांकडून या विषयात जाणीवपूर्वक भ्रम निर्माण केला  जातो आणि या भुलावणीमुळे  आपण नकळत शाश्वत सत्यांनाच विरोध करू लागतो, आणि आयुष्‌यात अपयश प्राप्त होते.  कोणतेही निकष नसलेल्या खुळ्या   कल्पना पासून मुक्त व्हावयास हवे.
    ज्या प्रमाणे पुरुषी मानसिकता बदलण्याची गरज आहे त्याचप्रमाणे स्त्रीने अती परावलंबीत्वाचा त्याग करायलाच हवा त्यानंतरच खऱ्या अर्थाने स्त्री मुक्ती या संकल्पनेचा विचार होईल .  आजतरी शहर असो की खेडेगाव स्त्रीयांना संरक्षणाची नितांत गरज आहे.  त्याचवेळी  महिलांना स्वसंरक्षणासाठी प्रशिक्षण दिले  पाहिजे.  पुरूषांसोबत समाजाची मानसिकताही बदलणे गरजेचे आहे.  कायदे तर आहेतच पण कायद्याचे संरक्षण करणारे सक्षम आहेत ? हुंडाबळी  आणि विकृत, व्यसनी पुरुषांकडून स्त्रीयांवरील  अत्याचारात नित्य वाढ होत आहे.  विविध समाज घटकांनी या विषयावर गंभीरपणे विचार करायला  हवा. " स्त्रीमुक्ती व स्वातंत्र्य "  या संकल्पनाच आहेत.  प्रत्यक्षात दु:खी, गांजलेली , चिंताक्रांत अशी स्त्री स्वत:चे भविष्य बनवू शकत नाही ती भावी पिढीचे भवितव्य कसे काय बनवणार? प्रत्येक कुटुंबात स्त्रीयांना संपूर्ण सन्मान दिला  जातो का? तिच्या विचारांना मान्यता दिली  जाते का? आपसात सुसंवाद आहे का? हे प्रश्न प्रत्येकाने स्वत:ला  विचारावयास हवेत.  स्त्री पुरूषांनी परस्पर आदर व सन्मान मान्य करून तसे वर्तन घडण्याची गरज आहे.  दोघेही समंजस व सक्षम हवेत.  ज्या घरात स्त्री दु:खी असेल  ते घर कधीही सुखी राहू  शकणार नाही.

                   सुहास सोहोनी    मोबा.९४०५३४९३५४
                 क्षण वेचतांना [मराठी लेखसंग्रह २०१२]
                 www.suhassohoni.blogspot.com
                 www.mazyasamvedana

No comments: