Saturday, April 30, 2011

Global Warning

GLOBAL WARMING, BUILDING OF LAKES,
MEMORY GARDEN AND CELEBRITIES

1. As per the data reports available presented by several study groups, regarding rise in temperature and increase of ice water at various mountains like Himalayas and both the poles of earth, it is known that water level at various seashore may increase which will result as disaster. At the same time drinking water ratio may lesser in near future.

2. Reservoirs of Sweet water by building cores of lakes and Conservation of Forests all over the Earth must be the priority project. All Villages, Gram-Panchayat, Social Clubs like Rotary, Lions, J.C.’s and all others are humbly requested to join with this prime project. By adopting villages lakes can be built up and Forest should be constructed around the lakes. Caring and nourishment of lakes and Forest (memory garden) up to 10 Years will definitely serve the purpose of environment, and I am sure this task will increase the beauty of our earth. Further I request to all honorable celebrities like Leaders, Personalities who have followers in masses and are famous by their devotion, Please do come forward and propagate the importance of Lakes And Forest (Memory Garden) in our Future Existence and priority project to save our earth. I am confident that all-star personalities will come together in this battle against “GLOBAL WARMING”

Here I am impressed by one formulae that is:

BUILDING OF LAKES + MEMORY GARDEN
= PROTECTION OF ENVIRONMENT


Suhas Sohoni
Amravati.

Thursday, April 28, 2011

अणुउर्जा प्रकल्प म्हणजे बंद बाटलीतले राक्षस

अणुउर्जा प्रकल्प म्हणजे बंद बाटलीतले राक्षस

अणुउर्जा कार्यक्रमांना जागतिक स्तरावर विरोध होणे हा विचार मानवी अस्तित्वाशी निगडीत आहे. ६५ वर्षांपूर्वी अनु बॉम्बच्या रूपाने संहारक शक्ती जपान आणि संपूर्ण जगाने भयचकित होवून पहिली. लाखोंच्या संखेने लोक क्षणात नाहीसे झाले. लाखोलोक प्रभावित झाले. अनुउर्जेच्या मदतीने पुढे प्रगती झाली. भौतीकसुखासाठी प्रचंड विकास केला गेला, पण एक गोष्ट सर्व जण विसरताहेत कि अणुउर्जा म्हणजे बाटलीत बंद असलेला राक्षस आहे. ज्या ज्या ठिकाणी आणि ज्या ज्या वेळी हा राक्षस बाहेर पडला तेंव्हा त्याने प्रचंड हाहाक्कार माजवला आहे. आज सुद्धा नेमका जपान या अणुउर्जा नामक भयानक राक्षसाच्या तावडीत सापडला आहे. भूकंप जपानला नवीन नाही, त्सुनामी हा निसर्गाच्या तांडवाचा अतिरेक आहेच पण न्यूक्लीअर रेडीएंशन मुले होणारा विनाश हे केवळ दुर्दैव म्हणावयाचे काय .

स्वतःला प्रगत म्हणवणाऱ्या सर्वच देशांमध्ये अणुउर्जा संयंत्र आहेत. छोट्याश्या जपान देशात ५५ संयंत्र आहेत. आपल्या देशात २२ संयंत्र आहेत. अजून काही नवीन उभारली जात आहेत. भारतात हिमालयाच्या रांगा, ईशांन्येची राज्ये, गुजरात, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, आणि दक्षिणेकडील बराच भाग, भूकंप शक्यतेच्या पट्टयात येतो. यापूर्वी बर्याच वेळा मोठे भूकंप होवून दुखद अनुभव आलेले आहेत. त्सुनामीचे रौद्र रूप सुद्धा आपल्या देशाने अनुभवलं आहे. ७००० किलोमीटर समुद्र किनारा लाभलेल्या आपल्या देशात समुद्री लाटांमुळे नेहमीच नुकसान होत असते. पण अनुउर्जेच्या धोक्याबाबत काय ? संपूर्ण सागर तटांवर जवळ जवळ ४५ कोटी लोकसंख्या आहे. नैसर्गिक आपत्ती नंतर उद्भवलेल्या रेडीएशनच्या धोक्याला प्रगत राष्ट्र सुद्धा यशस्वी तोंड देवू शकलेली नाहीत. निसर्गापुढे कुणीही शक्तिमान नाही. न्यूक्लीअर रेडीएंशन हि केवळ मानव निर्मित आपत्ती आहे. संपूर्ण जग प्रत्येक वेळी आश्या राक्षसी आपत्तीला कसेकाय तोंड देणार आहेत ? कितीवेळा विषाची परीक्षा बघायची आहे ? पृथ्वीच्या पाठीवर हे घातक विषारी साठे नको. हेच निसर्गाने आपल्या कृतीने दाखवून दिले. हि धोक्याची घंटा आम्हाला समजत नाही. काय कामाची हि बुद्धिमत्ता !

करोडो जीवांची क्षणात राख रांगोळी होऊ शकेल अशीचूक कोणाच्याही हातून होऊ नये. अनुउर्जे ऐवजी जलउर्जा, पावनउर्जा, सौरुर्जेचा वापर का होऊ शकत नाही, यावर संशोधन व्हावे. मुळात संहारक असलेली अणुउर्जा कधीही धोकेदायक ठरू शकते. जागतिक स्तरावर न्यूक्लीअर एनर्जी विरोधात एकत्रित जनमत उभे राहिले पाहिजे. आण्विक संकट समूळ नष्ट करणे हि आजची प्राथमिकता आहे. प्रत्येक लहान थोर व्यक्तीने अनुउर्जे विरोधात आग्रही मत मांडणे आवश्यक आहे. जगण्याचा हक्कासाठी अणुउर्जा प्रकल्पांना स्पष्ट विरोध हवा.

सुहास सोहोनी
विवेकानंद कॉलोनी, अमरावती - ४४४६०६
फोन : ०७२१ - २५६७४६३, ९४०५३४९३५४.
www.suhassohoni.blogspot.com

Tuesday, April 26, 2011

सत्य साई बाबांचे कार्य कोणत्या पद्धतीने पुढे चालवावे ?

सत्य साई बाबांचे कार्य कोणत्या पद्धतीने पुढे चालवावे ?

देश विदेशातील करोडो भक्तांचे दैवत असलेले सत्य साईबाबा आज आपल्यात शरीर रूपाने जरी नसले तरी समाजासाठी त्यांनी जे महान कार्य करून ठेवले आहे त्या कार्य रूपाने ते आपल्या जवळ नित्य असणार आहेत. प्रत्येक अवतारी महापुरुषाला सुद्धा मृत्यू अटळ आहे, हेच निसर्गाला मान्य आहे. गावागावांमध्ये पाणी उपलब्ध करून देणे, शिक्षणासाठी शाळा निर्माण करणे आणि रोग ग्रस्तांना औशोधाप्चार, शुश्रुषा मिळणे या साठी अद्ययावत सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, असे मोठे प्रकल्प त्यांनी उभे केले.

सत्य साईबाबांनी भक्तांना आयुष्यभर भरभरून आशीर्वाद दिले त्याच बरोबर शिक्षण, पाणी, व हॉस्पिटल द्वारा जनतेला कायम उपकृत केले आणि म्हणूनच आज त्यांचे करोडो भक्तगण दु:खात आहेत. त्यांचा वारस कोण ? किंवा इस्टेटीचा मालक कोण ? हा प्रश्न उपस्थित होऊच नये. "सत्य साईबाबा ट्रस्ट " या ट्रस्ट मार्फत त्यांचे कार्य या पुढेही अधिक निष्ठेने सुरु राहावे. भक्तगणांच्या देणग्यांवर ट्रस्ट निर्माण झालेला असल्यामुळे पूर्वी इतकेच किंवा त्या पेक्षा जास्त समाजाभिमुख राहून सत्य साईबाबा ट्रस्ट ने त्यांचे महान कार्य " पवित्र कर्म " समजून चालवावे. जरासुद्धा अपहार होणार नाही याची पुरेपूर काळजी / दक्षता घ्यावी. हीच त्या कर्मयोग्याला खरीखुरी श्रद्धांजली ठरणार आहे.

सुहास सोहोनी
विवेकानंद कॉलनी, अमरावती - ४४४६०६.
फोन न.: ९४०५३४९३५४ .