* सुसंस्काराच दान -एक अग्निहोत्र *
संत गुलाबराव महाराजांच्या नामस्मरणाने
पावन झालेल्या अमरावती जिल्ह्यातील चांदूरबाजार येथिल “भक्तीधाम”समोरून जात
असतांना मी अचानक थांबलो .मंदिराच्या सभामंडपात किमान दोनशे पेक्षा जास्त मुले
अतिशय शिस्तीत बसली होती,आणि एकास्वरात त्यांच्याकडून संतवचने म्हणवून घेतली जात
होती.मंत्रमुग्ध करणारे ते वातावरण होते .सृजन व गुणवान समाज निर्माण करण्याच
स्वप्न बघणाऱ्यांच तेथे संस्कार शिबीर होत.लोखंडाला परिसाचा स्पर्श व्हावा असा
संतस्पर्श,संतसंगत व संतविचार ज्या ज्या व्यक्तीला लाभले ती व्यक्ती सद्वर्तनाच्या
दिशेने वाटचाल करेल हे निश्चित .संस्कार शिबीर- तेही संतांच्या तपोभूमीत हाच मुळात
‘अमृत योग ‘आहे .सत्व गुणांनी युक्त असा शक्तिशाली माणूस घडवून समाजाला देणे ,हाच
उद्देश आहे संताच्या तपोभूमीचा आणि मंदिराचा .
मुळात
हे सुसंस्काराच दान त्या भावी नागरिकाला त्याच्या घरात दिले गेले पाहिजे .प्रत्येक
पालकाचे हे आद्य कर्तव्य आहे .मंदिरच पावित्र्य आपण जपतो, पण स्वतःच्या घराचे काय
?सुसंस्कार व पावित्र्य यात गरीब, श्रीमंत,जात,धर्म यांचा काय संबंध ?दगड विटांनी
बांधलेल्या घरांत वातावरण शुद्ध ,प्रसन्न आणि प्रत्येकाचा आदर करणार हवं.एखाद
सुंदर निरागस शुद्धतेच प्रतिक असलेलं,पूर्ण उमललेलं पुष्प जसं आसमंतात आपल्या
अस्तित्वाची जाणीव करून देत ,तसे सात्विक विचार प्रत्येक घरातून बाहेर यावेत हि
वास्तविक अपेक्षा आहे .चांगले कार्य कधीही सुरु करावे .प्रत्येकाने आपल्या मनात
आणि घरांत डोकावून पाहिले कि नक्की कुठे डागडुजी करायची ते उमजेल .आपल्या घराला
,आपल्या मुलांना आणि समाजाला आज गरज आहे ‘ समाज घडवणार्यांची ’.ज्योत कायम पेटती
ठेवण्यासाठी जसे नेहमी सतर्क राहावे लागते,तसे आहे सुसंस्काराचे .एखाद्या पवित्र
मंदिराकडे जसे सगळे आदराने पाहतात तसें आपल्या घराकडे समाजाने आदराने बघावे असे
प्रत्येकाला वाटले तर .........
सुहास सोहोनी
लेख संग्रह [वर्तुळाचे टोक
-२००५ ]