Saturday, September 29, 2012

अहिंसेवर बोलू काही

अहिंसेवर बोलू   काही

    योगसाधनेचा अभ्यास करताना योगाच्या आठ अंगांचा अभ्यास सुचवला  आहे.  त्या अष्टांग योगात प्रथम यम म्हणजे निग्रह - संयम, यात पाच यमापैकी एक आहे "अहिंसा' आपल्या कृतीने उक्तीने मनाने किंवा नजरेने कोणत्याही प्राणिमात्राला  उपद्रव होणार नाही असे वागणे म्हणजे अहिंसा.  क्रोधाचे दृश्य स्वरूप, घडणारी कृती, म्हणजे हिंसा.  अहिंसा हा धर्म आहे, सुसंस्कार आहे.  सजीवांच्या या सृष्टीत मांसभक्षी प्राणी आहेत, तो निसर्गचक्राचा भाग आहे.  त्यांचे वेगळे पण त्यांच्या जबड्या त असलेल्या सुळ्या मध्ये आहे.  मांसभक्षी प्राणी जीभेने आवाज करीत पाणी पितातत परंतु तृणभक्षी प्राणी आणि मानव यांना सुळे  नाहीत आणि ते ओठांनी पाणी पितात.  म्हणजेच उदरभरणासाठी मानवाजवळ  इतर पर्याय आहेत.  तरीही मानव इतर प्राण्याची हिंसा करतो, एवढेच नाही तर मानव स्वप्रजाती आणि स्वकियांची सुद्धा निघृण हिंसा करतो.
      पुरातन काळा पासून संपुर्ण विश्वात योगसाधना, अहिंसा व शाकाहाराचा पुरस्कार करणारं भारत हे एकमेव राष्ट्र  आहे.  सुदैवाने या मुळ  भारतीय जीवनप्रणाली चा प्रसार, विचार व आग्रह आज भारताबाहेर धरला  जात आहे.  अहिंसा हे तत्व  एकटे नसून ते अष्टांग  योगाच्या पेकेज मधील  एक जगण्याचं तत्व आहे.  समृद्ध भारतीय जीवनशैली  जगावयाची असेल  तर अहिंसेसोबत सत्य, चोरी न करणे, मोह नसणे, विकारांवर ताबा, शुचित्व , संतोष, तप, आराधना त्याचबरोबर स्वास्थ्य वृद्धी व अंतर्मुख बनणे या तत्वांचा सुद्धा स्विकार, अभ्यास व प्रसार करणे आवश्यक आहे.  हरणाजवळ  जशी सुगंधी दिव्य कस्तुरी असते तसा भारतीयांजवळ  सुखी जीवनाचा हा अनमोल  खजीना खचाखच भरलेला  आहे.  संपूर्ण विश्वाला  समृद्ध आणि विचारांनी श्रीमंत करण्याचं सामर्थ्य  या भारतीय वैचारिक खजीन्यात आहे.

    अहिंसेचा एखादा दिवस साजरा करावा असे जर वाटत असेल  तर 364 दिवसांच काय? ज्या तत्वाचा आजीवन स्विकार करावयास हवे त्या बाबत सरकारी खाक्याप्रमाणे एकदिवसीय विचार करायचा? खरोखर सुखी जीवनाचा ध्यास असणाऱ्या  प्रत्येक भारतीयाने आत्मचिंतन करावयालाच हवे. आपण जे खातो त्यानुसार आपला  स्वभाव बनतो. तामसी स्वभाव हिंसेला  प्रवृत्त करतो.  हिंसा कधीही एकटी नसते तर सोबतीला  असतो अविवेक आणि क्रौर्य.  अविचाराने हिंसेचा मार्ग धरणारे समाजाला  दु:ख, यातना देत असतात पण त्यांचा शेवटसुद्धा हिंसेनेच होतो, शिवाय आप्तजनांची नाचक्की होते.  हिंसेने काहीच साध्य होत नसतं.  जर काही उत्पन्न होत असेल  तर ती म्हणजे "प्रतिहिंसा'.   जगभर हिंसक घटनांच तांडव चालू  असताना अहिंसेचा आग्रह धरलाच पाहिजे.  जास्तीतजास्त प्रमाणात सर्व समाजघटकांना अहिंसेच्या राजमार्गावर सन्मानाने चालण्याची शिकवण दिली  जाण्याची गरज आहेच.  माणसांनी एकमेकाचा आदर करावा, कुठेही आतंक नसावा असे दिवस पाहण्यासाठी चला  मित्रांनो "अहिंसेवर बोलू  काही'.
                        ुुु  सुहास सोहोनी
                                   ९४०५३४९३५४
                            क्षण वेचतांना [मराठी लेख संग्रह २०१२]
                         www.suhassohoni.blogspot.com

ग्राहक राजा तुझा रोज वाजतोय बाजा

ग्राहक राजा तुझा रोज वाजतोय बाजा

    कोणतीही वस्तू किंवा सेवा यांची नक्की किती किंमत असावी या बाबतीत काहीतरी निर्णय लवकरच व्हावयास हवा.  वस्तूच्या उत्पादन खर्चात, कारखान्यात होणारा सगळा खर्च अंतर्भूत असतो, अगदी कच्च्या माला पासून कामगारांचा पगार, बँकेचे व्याज, एक्साइज टेक्स, सेल्स टेक्स, नफा सगळ  धरून मुळ  किंमत ठरवली  जाते.  ग्राहकांच्या हातात ती वस्तू येते तेव्‌हा मुळ  किंमतीच्या वस्तूंवर पुन्हा विविध कर लागतात.  त्या आधी वस्तूच्या पेंकिंगवर प्रचंड खर्च केला  जातो.  चकचकीत आकर्षक वेष्टण मालाचा खप वाढवतं.  मुळात या वेष्टणाचा व मालाच्या गुणवत्तेचा संबंध असेलच असे नाही.  खऱ्या  अर्थाने वस्तू महागते ती जाहिरातींच्या अवाढव्य खर्चामुळे .  जाहिरातींचे सगळे  प्रकार वापरले  जातात.  टि.व्ही  चेनल , वृत्तपत्रादवारे होत असल्या जाहिराती या प्रचंड महाग असतात, मात्र अत्यंत जिद्दिने अशा जाहिरांतीवर खर्च केला  जातो.  त्यात विविध कर पुन्हा आकारले  जातात.  तेच तेच कर एकाच वस्तूंवर विक्रीच्या प्रत्येक टप्प्यावर लावले  जातात.  आणि किंमत वाढत जाते. खीसा मात्र ग्राहकाचा लुटला  जातो.  यावर कुठेतरी निर्बंध हवा.
      या सर्व समस्यांवर विदेशी एफडीआय च्या भारतात प्रवेश करण्याचा युक्‌तीवाद केला  जातो तो मान्य नसावा.  एफडीआय हा गेट  करारांतर्गत येणारा मुद्दा असून त्यावर आक्रमक चर्चा चालुच राहणार आहे, परंतू भारतीय उत्पादकांनी किंमतीवर बंधन ठेवायला  हवे.  किंवा किंमतीवर अंकूश हवा.  उत्पादनावर जर ग्राहकांचा विश्वास असेल  तर वेष्टणा चा खर्च कमी करता येईल .  केवळ  आकर्षक वेष्टण  म्हणजे दर्जेदार उत्पादन, नक्कीच नाही.  त्याचप्रमाणे चेनल वर दाखवल्या जाणाऱ्या  कितीतरी जाहिराती अतर्क्य  आणि आत्यंतिक फसव्या असतात, भ्रामक असतात.  जाहिरातीसाठी वापरले  जाणारे गुळगुळीत  अभिनेते, नट्या 
यांनी जाहिरातीच्या नावावर कितीही पैसा उकळावा आणि किती चुकीची विधाने करावी याला  काही ताळतंत्र उरला  नाही.  एखादे उत्पादन किती काळ  वापरल्यावर त्यावर मत देता येईल , यावर निर्बंध नाहीच.  ग्राहकाला  एकदम मुर्ख समजून या जाहिराती ग्राहकाच्याच पैशाने सुरू असतात.  कारण हा खर्च सुद्धा वस्तूच्या किंमतीत आकारला  जावून ग्राहकाकडून वसूल  केला  जातो.  सेवा देण्याच्या किंमतीत तर काही काही एम.आर.पी.नाही. अगदी होमिओपेथी किंवा आयुर्वेद डॉक्टरांनी तपासणी व औषधांचे किती पैसे घ्यावे ?  स्पेशालीस्ट त्यांचे, हॉस्पीटल , त्यांच्या तपासण्या, वेळोवेळी  आकारलेली व्हिजीट  फी सगळेच बेहिशोबी वाटतं.  वित्तीय संस्था, होमलोन, कार लोन सर्व ठिकाणी छुपे खर्च सहज आकारतात.  ग्राहकांच्या गरजेप्रमाणे छोट्या  छोट्या  रोजच्या गरजेच्या वस्तूंचे भाव का वाढतात? चैनी विलासी जीवनाची चटक  ग्राहक प्रत्येक टप्प्यावर सहज लुटला  जातोय, म्हणून म्हणावसं वाटतं की हे ग्राहक राजा तुझा रोज वाजतोय बाजा.

                        ुुु  सुहास सोहोनी
                                ९४०५३४९३५४
                            क्षण वेचतांना [मराठी लेख संग्रह २०१२]
                             www.suhassohoni.blogspot.com