Monday, December 28, 2015

*अयोध्याच्या विवादास्पद जागेवर जागतिक दर्जाचे सुसज्ज हॉस्पिटल व संशोधन केंद्र उभारावे.*
                       * एक पर्याय ,एक विकासात्मक,सकारात्मक दृष्टीकोन ,
                       * हि एक सुवर्णसंधी ,राष्ट्रीय एकात्मता सिद्ध करण्याची .
         धर्म निरापेक्षतेचा कितीही डंका भारतीयांनी वाजवला तरी अयोध्या विवाद सारख्या समस्या जेंव्हा जेंव्हा उग्र रूप धारण करतात तेंव्हा तेंव्हा देशाची शांतता धोक्यात येते ,हेच आजपर्यंत सिद्ध झालेले आहे .नेमके याचवेळी ,”बोलणे हा माझा हक्क आहे “या आवेशाने नेते ,सिलीब्रेटी ,आणि विद्वान मंडळी वादविवाद माजवतात ,वातावरण ढवळले जाऊन स्फोटक बनते .भविष्यात अयोध्या मंदिर -मस्जिद प्रकरणात कोर्टाचा निकाल कुणाच्याही बाजूने लागला तरी देशाचे वातावरण नियंत्रणात ठेवणे हि गोष्ट मात्र प्रशासनाच्या कुशलतेची कसोटी पाहणारी असेल .
         कोणाच्याही बाजूचा जय किंवा पराजय होणे यावरून हा मुद्दा संपणारा नाही असे खेदाने म्हणावेसे वाटते ,परंतु एका वेगळ्या दृष्टीकोनातून या विषयावर कायमचा तोडगा निघू शकतो .यासाठी कोर्टाची भूमिका फार महत्वाची असणार आहे .जर ----*सन्माननीय न्याय देवतेने प्रशासनाला ती संपूर्ण विवादास्पद जमीन अधिग्रहित करावयास सांगून त्या जागी केवळ “जागतिक दर्जाचे सुसज्ज हॉस्पिटल व संशोधन केंद्र “उभारले जावे ,असे करण्याची विनंती वजा मार्गदर्शन केले तर ती एक वेगळी दिशा ठरेल .
          सर्वोच्य न्यायालयाच्या सूचनेवरून केंद्र सरकारने जर हा उपक्रम सुरु केला तर सर्व धर्म निरापेक्ष्तेच्या दिशेने भारत देशाचा खर्या अर्थाने प्रवास सुरु आहे ,हेच सिध्द होईल .खरे तर आपल्यासमोर हि एक संधी आहे राष्ट्रीय एकात्मता सिध्द करण्याची .असे एक हॉस्पिटल उभारले जावे कि जेथे मानवतेची सेवा सुरु राहील ,नवनवीन संशोधन होईल .रुग्ण हा केवळ रुग्णच असतो त्याला धर्म, जात, पंथ नसतो .रुग्णाला दिल्या जाणार्या रक्ताला सुद्धा जात ,धर्म असे लेबल नसते.एक असा उपक्रम कि जे रिसर्च सेंटर संपूर्ण जगात *मानबिंदू *बनू शकते. देशाला खर्या अर्थाने प्रगती करायची असेल तर आधी शांतता असायला हवी .असे विवाद निकाली काढायला हवेत .हॉस्पिटल चे नाव सुद्धा व्यक्ती धर्म यावरून नसावे. हा वाद आता संपणे हीच खरी गरज आहे. विवादास्पद जागेत असलेले मंदिर व मस्जिद न्यायदेवतेच्या मार्गदर्शनानुसार शासनाने अयोध्येतील दोन वेगवेगळ्या जागी निर्माण करून दिल्याने या विषयावर कायमस्वरूपी तोडगा निघू शकेल असे मला वाटते .
                                    सुहास सोहोनी
विवेकानंद कॉलोनी ,अमरावती -४४४६०६ फोन ०७२१-२५६७४६३ ,मोबा -९४०५३४९३५४ ,८६२६०६०६४६