Sunday, December 25, 2011

व्यसनमुक्ती... एकविसाव्या शतकाची कळकळीची हाक

सुहास सोहोनी
वीकास वार्ता पुरस्कार -१९९० महा शासन,
राष्टीय एकात्मता फेलोशीप - २००५ अखील महा पत्रकार व पत्रलेखक संघ,
सहसचीव डाय्बेटीक असो. इंडीया, अमरावती ,
सदस्य : महारषट्र वृत्तपत्र लेखक असोसिएशन,
please visit at : www.suhassohoni.blogspot.com
_________________________________________
व्यसनमुक्ती... एकविसाव्या  शतकाची कळकळीची हाक

        ज्याचे  परिणाम  म्हणजे फक्त विनाश आणि केवळ विनाश, अशा  व्यसनरूपी  राक्षसाने आज आपल्या देशातील युवा पिढीला बरबाद करण्याचा जणू  विडाच उचलला आहे. ही युव पिढी  फार मोठ्या  प्रमाणात जोरदार वार्याने पाला पाचोळा उडावा तसे या व्यसनी दुनियेत भीरकावली गेली आहे. या वीनाशकारी वादळाला आत्ताच जर आपण थोपवले नाही तर कितीतरी कोवळे युवक आणि युवती नव्या शतकाचा पहिला उगवता सूर्य  बघण्यासाठी शील्लकच राहाणार नाहीत,  तेंव्हा मित्रहो सावध व्हा.  अजूनतरी जागे व्हा आणि स्वत:ला, स्वत:च्या पिरवाराला आणि या देशाला  व्यसना पासून वाचवा.

        मेंदूला झीण झीण्या आणणा-या तसेच बधीर करणा-या कोणत्याही मादक पदार्थाचे अतिरेकी सेवन करणारी व्यक्ती म्हणजेच व्यसनी जीव. तो केवळ जीव जात नाही तोपर्यंत जीवंत राहतो आणि स्वत:च्या पायाने एक एक पायरी उतरत मृत्यूच्या गर्तेत एके दिवशी संपून जातो. मादक पदार्थ म्हणजे तंबाखू, घोटा, सिगारेट, नस, दारू, गांजा, अफीम,चरस, ब्राऊन शुगर, पाश्चिमात्यांनी शोधून  काढलेली अनेक  मादक पदार्थ. झोपेच्या गोळ्या किंवा गुंगी आणणारी मेंदू बधीर करणारी PENTAZOCAIN, PETHIDINE , LSD. Tab MANDREX या पैकी  कोणत्याही पदार्थाचे प्रमाणाबाहेर सेवन करणा-या व्यक्तीला व्यसनी ही पदवी प्राप्त होते.

        हा व्यसनी जीव स्वतः बायको, मुलं बाळ, आप्त पिरवार, मीत्र पिरवार अशा अगणित कुटुंबांना सतत आणि सहज दु:खात लोटत असतो. आणि मुख्य म्हणजे त्याला बद्दल जाणीव होत ही असली तरी त्याचा नाईलाज असतो इतका तो व्यसनांच्या आहारी जाऊन हतबल झालेला  असतो.

        कोणतीही व्यक्ती व्यसनी होण्याचे मुख्य कारण म्हणजे इच्छा शक्तीचा अभाव आणि पंच महाभूता सारख्या दैवी शक्तींवर असलेला अविश्वास, बर्याचवेळा कर्ज वाढ, घरगुती कलह, कमी वयात कमी अनुभव असतांना लायकी पेक्षा जास्त मिळालेलं धन ही सुद्धा व्यसनाधीनतेची  कारणे असू शकतात.

        पूर्वी असे वाटायच की शैक्षणिक आणि  आर्थिक दृष्ट्या कमजोर वर्गात हा प्रश्न भीषण होता. पण आज चीत्र पूर्णपणे पालटले आहे. गर्भ श्रीमंत, मध्यम वर्गीय आणि बुद्धीवंत स्वत:  किंवा त्यांची लाडावलेली मुल, मुली या प्रश्नाने ग्रासली गेली आहेत.  सधन व्यावसायिक निरनिराळे अधिकारी आणि शाळा, कॉलेजातील वीद्यार्थी केवळ फॅशन ओण मौज म्हणून या दुष्टच्रकात स्वत:ला अडकवून घेतात  आणि वेळीच जर त्यांच्या कडे लक्ष दिले नाही तर नकळत आश्चर्यकारक गतीने व्यसनाधीनतेच्या  आहारी जातात.

        सध्याच युग हे  खर म्हणजे प्रलोभन युग आहे.  प्रत्येक कुटुंबाने  आपल्या मुलांवर बारीक लक्ष ठेवणे अत्यंत निकडीच झाल आहे. आपल्या मुलांचे मित्र कोण ? त्याला संगत कोणाची ?  घराबाहेर  असतांना शाळा, कॉलेज व्यतिरिक्त तो कुठे वेळ घालवतो ?  त्याची दिनचर्या कशी आहे ?  समाजात, नातेवाईकात आणि घरात, इतर व्यक्तीनबरोबर  त्याची वर्तणूक कशी आह ?  या आणि अशा अनेक प्रश्नांची जाणीवू पुर्वक माहिती गोळा करणे  प्रत्येक जबाबदार पालकासांठी अत्यंत आवश्यक आहे. बर्याचवेळा या प्रथम उपचारामुळे प्राथामिक अवस्थेतील व्यसनी व्यक्ती हा दुर्दैवी मार्ग सोडून स्वत:चे आणि इतरांच जीवन सुखी करू शकतो.

         इतर अनेक रोगां प्रमाणे  व्यसनाधीनता हा एक रोग आहे.  त्याला मानासिक रोग म्हणता यईल.  अंमली पदार्थाची चटक लागलेल्या व्यक्तीची माहिती हाई पर्यंत बर्याच वेळा फार उशीर झालेला असतो. असा रोगी , इतरां पासून वेगळा, एकांतात राहण्याचा प्रयत्न करतो. सतत पैशांच्या विवंचनेत असतो. घरात शुल्लक कारणां वरून चिडचिड करतो. तब्येतीची खोटी करणे सांगून जास्तीत जास्त वेळ झोपतो. काही कारण नसतांना वेळो वेळी खोटे बोलतो, बाथरूम, संडासात जास्त वेळ घालवतो. त्याची भाषा हळू हळू गलिच्छ बनते, घाणेरड्या शिव्या देतो. व्यसनं पुरती साठी लागणाऱ्या पैशासाठी तो अफरातफर करतो, खोटे बोलतो, उधारी करतो, चोरून घरातल्या वस्तू विकतो आणि शक्य झाले तर घरात खुंटी वर टांगलेल्या कुणाच्याही कपड्यातून पैसे चोरतो. सट्टा, जुगार खेळायला सुरुवात करतो. सरळ सध्या मार्गाने जाणार्या लोकांची चेष्टा करतो. त्यांच्या पासून काळजी पूर्वक दूर राहतो. स्वतःच्या मौल्यवान वस्तू, पैशाचे पाकीट, चोरीला गेल्याचे तो अधून मधून सांगतो, त्याचा स्वभाव उतावळा व अधीर झालेला असतो. आपला क्षुल्लक हट्ट सुद्धा तो पूर्ण केल्या शिवाय राहत नाही. त्याचे स्वास्थ्य खरोखरच बिघडते, त्यामुळे घरातल्या व्यक्तींची सहानुभूती मिळवायचा प्रयत्न करतो आणि सर्वांना मूर्ख बनवितो. आपली प्रियव्यक्ती अश्या भयानक दुश्चाक्रात सापडली असेल अशी कल्पनाच येत नाही व विश्वास तर मुळीच बसत नाही. जेंव्हा चित्र स्पष्ट होते तेंव्हा प्रकरण फार पुढे गेलेले असते. एकावेळी दोन तीन प्रकारचे अमली पदार्थ सेवन करण्याची सवय लागलेली असते अश्या वेळी जे कोणी त्याला व्यसनांपासून परावृत्त करतात त्यांच्या पासून तो दूर पाळतो किंवा त्यांना घालून पडून बोलतो. घरात जे कोणी त्याच्या आकांतांडवाला घाबरतात त्यांच्यावर तो आपली हुकुमत चालवतो. वेळ प्रसंगी त्यांना खोटे बोलण्यास भाग पाडतो. व्यसन पूर्तते साठी असा माणूस अक्षरशः लाखो रुपयांची विल्हेवाट लावतो. बेधुंद अवस्थेत त्याच्या अंगावरील मौल्यवान वस्तू खिशातील पैसे चोरणारी टोळी त्याच्या भोवती सक्रीय असते. स्वतःच्या  व्यासंनन पुढे त्याला कोणाचेही सोयरसुतक नसते भावनांची जाणीव नसते, अभ्यासात लक्ष नसते. पूर्वीच्या सगळ्या आवडीच्या गोष्टीतील आवड नष्ट झालेली असते. अश्या व्यक्तीची प्रथम भूक मंद होते, निद्र नाश जडतो, बोलण्या वागण्यात ताळतंत्र नसते, हात पायाला सतत कंपन असते. बधीर पण मुले मेंदूची कार्यशक्ती क्षीण होत जाते. भीतीदायक स्वप्ना पडतात. मनः स्थिती अशांत असते, स्मरण शक्ती क्षीण होते, दुर्ष्टी अधू होते. गुप्त रोग होऊ शकतो, हृदय रोगाची शक्यता वाढते.

         जर व्यसनाधीनता हा मानसिक रोग आहे, हे स्पष्ट आहे, तर आजच्या प्रगत युगात या रोगावर उपचार सुद्धा आहेत. रोग स्पष्ट झाल्यावर मानस रोग तज्ञाची मदत घ्यायला हवी. रोग्याच्या स्वातंत्र्याला हळू हळू बंदी घातल्याने मारलेल्या थापा आता पचत नाहीत हे त्याला स्पष्ट करावे .त्याचे सर्व काही चुकलेले आहे हे त्याला पटवून द्यावे. मात्र त्याची फाजील काळजी घेतली जाणार नाही असे वागावे. वेळप्रसंगी त्याच्यापेक्षा मोठा आवाज चढवून त्याला चूप बसवणे, अत्यंत आवश्यक आहे. असे रोगी पूर्ण बरे व्हायला कमीत कमी दोन ते तीन वर्षांचा काळ लागतो. हा काळ पूर्ण कुटुंबाला फारच कठीण परीक्षेचा काळ असतो. अश्या वेळी आपले मनोधैर्य खचू न देणे आवश्यक आहे कारण जीवनात सुखा मागून दु:ख तसे दु:खा मागून सुखाचे दिवस येतात हे नेहमी लक्षात ठेवावे.

          अगदी स्पष्टपणे सांगायचे तर रोग्याला शक्य तितक्या लवकर एखाद्या व्यसनमुक्ती केंद्रात भरती करणे हाच उपचार खऱ्या अर्थाने प्रभावी आहे. कारण घरात राहून एखाद्याचे स्वातंत्र्य नष्ट करणे वाटते तितके सोपे नाही. त्यांची मित्र सांगत तोडणे, चालू वातावरणात संपूर्ण बदल करणे, प्रसंगी कठोर वागणे आणि रोग्यास त्याच्या व्यसनांपासून दूर ठेवणे, फक्त व्यसनमुक्ती केंद्रातच शक्य आहे. तिथे रोग्याला मनन करण्याची, पश्चात्तापाची संधी मिळते, वेळ मिळतो. सतत व्यसनाधीन असल्याने असा वेळ त्याला कधी मिळालेला नसतो. दवाखान्यात भरती करणे हा शंभर टक्के रामबाण उपाय नाही हे जरी खरे असले तरी या काळात रोग्याचे मन परिवर्तन करण्यास मदत होते, त्याला चांगले आणि वाईट यातील फरक तज्ञ व्यक्तीमुळे समजावल्या जातो. योग्य तो औशोधोप्चार कठोरपणे चालू असतो. त्याची दिनचर्या चाकोरीबद्ध केली जाते. पण सर्वात मुख्य म्हणजे अंमली पदार्थांचा त्याचा खुराक न मिळाल्याने पहिल्या आठवड्यातच रोग्याला जो त्रास सुरु होतो तो घरातल्या व्यक्तींना बघाव्ल्या जात नाही. अश्या त्रासाला withdrawal symptoms असे म्हणतात. हा त्रास रोग्याला सहन करणे भाग आहे. तज्ञ डॉक्टरच अश्या रोग्याला हाताळू शकतात. मोठ्या शहरात सरकारी तसेच खाजगी व्यसनमुक्ती केंद्रे आहेत. प्रत्यक मेंटल हॉस्पिटल मध्ये व्यसनमुक्ती केंद्र आहेत. भरती केल्या नंतर डिस्चार्ज मिळे पर्यंत कोणाही आप्त स्वकीयांनी रोग्याला न भेटणे हे आवश्यक आहे. मधेच रोग्याला भेटल्यामुळे उपचार पद्धतीत अडथळे येतात आणि रोग्याची मानसिक स्थिती बिघडते. अश्यावेळी संबंधित डॉक्टरांना भेटत राहणे योग्य आहे आणि रोग्या बाबत आपल्याला माहित असलेल्या सगळ्या गोष्टी, सगळ्या सवयी, घटना स्पष्टपणे डॉक्टरांना सांगाव्या.

         रोग्याला डिस्चार्ज मिळाल्या नंतर आता तू बरा झालास आता आपल्या कामाला लाग अशी भूमिका मुळीच करू नये. मानसोपचार  तज्ञाच्या देखरेखी खाली बरेच महिने त्याने Anti Drug Medicine  घ्यायचे असतात. या दिवसात भूत, वर्तमान व भविष्य हे तिन्ही काळ त्याच्या मेंदूत थैमान घालत असतात. या काळात अल्कोहोलिक अनामोलीस ए. ए. सारख्या समाजसेवी संस्थांची मदत घ्यावी. शक्यतोवर त्याला एकटे राहू देऊ नये. त्याच्या जवळ पैसे राहणार नाही असे बघावे. आध्यात्मिक विचार, ईश्वरभक्ती, धार्मिक पूजाविधी अश्या गोष्टीत त्याला गुंतवण्याचा हळुवार प्रयत्न करावा. यथावकाश या प्रयत्नामुळे त्याचे आत्मबल आणि आत्मविश्वास वाढीला लागेल आणि हाच आत्मविश्वास त्याच्या पुढील आयुष्याची पुंजी ठरणार आहे. मात्र त्याच्यात आत्मविश्वासाची चिन्हे दिसल्यानंतर त्याला आवडीचे काम जरूर करू द्यावे. हळू हळू त्याच्यावर जबाबदारीची कामे सोपवावी पण बारीक लक्ष्य असू द्यावे. खरे म्हणजे व्यसनमुक्त झाल्यनंतर रोग्याने स्वतः च आपल्या कुटुंबीयांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करू नये. त्याचे शुभ चीन्तानार्या आप्त स्वकीयांच्या काळजीयुक्त प्रमाच्या सावलीतच त्याने मोठा काळ काढणे अत्यंत आवश्यक आहे. हा विचित्र बहुरूपी दुनियेच्या अनेक दैनंदिन समस्या स्वतःच्या बळावर सोडवण्य साठी तो खरोखर काही काळ पत्र नसतो हे सत्य ज्या रोग्याला कळले तो खऱ्या अर्थाने सुदैवी. या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यावर या विनाशकारी वादळाची तीव्रता किती भयंकर आहे, हे कळते. प्रत्यक गावात समाजसेवी संस्थांनी हा विषय हाती घेणे आवश्यक आहे. अन्यथा व्यसनाधीन मेंदू कृश आणि सुकलेले खांदे, छातीचा खोका, दुर्बल मन असलेली युवापिढी या महान देशाचा गाढा ताकदीने ओढून एकविसाव्या शतकात पदार्पण करण्यास खरोखर समर्थ होणार आहे काय ?

सुहास सोहोनी
विवेकानंद कॉलोनी, अमरावती ४४४६०६.

फोन : ०७२१-२५६७४६३, ९४०५३४९३५४.

Saturday, December 10, 2011

भांडवलदारांना हवा असतो फक्‌त नफा-आणखी नफा


सुहास सोहोनी
वीकास वार्ता पुरस्कार -१९९० महा शासन,
राष्टीय एकात्मता फेलोशीप - २००५ अखील महा पत्रकार पत्रलेखक संघ,
सहसचीव डाय्बेटीक असो. इंडीया, अमरावती ,
सदस्य : महारषट्र वृत्तपत्र लेखक असोसिएशन,
please visit at : www.suhassohoni.blogspot.com
_________________________________________


भांडवलदारांना हवा असतो फक्‌त नफा-आणखी नफा 
   
       करोडो भारतीयांच्या  पोटात भरपूर किटकांचा प्रादुर्भाव झाला असा शोध लागल्यामुळे, आरोग्याच्या काळजीपोटी पवीत्र सेवाभावी वृत्तीने परदेशस्थ थंड पेयांच्या कंपनींनी थंड पेयात किडनाशकांचा वापर केला असावा काय ? आणि असे जर असेल तर आपण मात्र......... मुख्‌य म्हणजे किटकनाशकांचे प्रमाण जास्त असण्यावर आक्षेप आहे.  दररोज आमच्या पोटात किती विषारी द्रव्य कणाकणांनी जात आहे याबाबत आम्ही खरोखर अज्ञानी आहोत.  पण याहीपेक्षा महत्वाचे म्हणजे काही राज्यांनी या बहुराष्ट्रीय कंपन्यांना म्हणे विक्रीकरात करोडो रूपयांची सवलत देण्याच पवित्र कार्य केल आहे.

           आता महीने न महीने समिती वगैरे नेमुन भारतीय जनता आपला  विस्मरणाचा हक्क बजावण्यास मोकळी  आहेच. पाश्चिमात्यांचे गोडवे गाण्याचा आपला  परिपाठ असतांना त्यांना एकदम गुन्हेगार वगैरे कसं काय म्हणायचं ? याच राक्षसी प्रमाणात उत्पादक असणार्या बहुराष्ट्रीय  परदेशस्थ कंपन्या भारतामधे टाचणी पासुन तर विमानापर्यंत सगळ्या वस्तू व सेवा घरपोच आणुन देणार आहेत, आणि आपल्याला  फक्त उपभोग घेण्याचं काम करायचं आहे, अशा शेकडो कंपन्यांच्या मदतीने आपल्या देशात एक्सप्रेस हायवेज, उड्डाण  पुल, संगीत उद्याने, मोटारी, इंटरनेट, फास्ट  हॉटेल्स खाण्यापिण्याच्या सगळ्या  वस्तु मिळणार आहेत.  एक नवा स्वर्ग इथे अवतरणार आहे.  तुमच्याजवळ पैसे नसतील तर प्रॉपरटी गहाण ठेवून या कंपन्या भरपूर कर्ज ही देणार आहेत.  त्यांना इथे कायम व्यवसाय करायचा आहे.  भांडवलदारांना फक्त हवा असतो नफा आणखी नफा.  श्रीमंतांना व्हावयाचं असतं आणखी श्रीमंत.  या देशातल्या मुठभर 10 टक्के श्रीमंतांना या मानवयोनीतील  मिळालेल्या जीवनाचा आनंद उपभोगायचा आहे.   उरलेल्या 90 टक्के गरीबांचा विचार किती काळ , कोणी करावा?  गरिब वगैरे जर कोणी असतील तर त्यांनी सुद्धा झटपट श्रीमंत व्हावं आणि याच जीवनात सगळा उपभोग घेवून टाकावा हे पाश्चात्य तत्वज्ञान इंटरनेट मार्केटिंग सारख्या नवतंत्रात घरोघरी शिकवल जात आहे.
    विदर्भात कापुस पिकत असतांना घरोघरी हातमाग का नाहीत ?  विदर्भात संत्रा पिकत आसतांना संत्राज्युस, संत्र्याचे अनेक पदार्थ का नाही बनत ?  भारतात ठिकठिकाणी उपलब्ध असलेल्या कच्च्या माला पासून त्याच विभागात कारखाने का नाही चालत ?  करोडो हातांना काम का नाही?  सुरक्षीत नोकर्या मधून कामगार का काढले जात आहेत ?  प्रश्न अनेक आहेत आणि जनतेनेच त्यांचा वेध घ्यायचा आहे.

           -------------0--------------------0--------------0---------------------0--------------------


सुहास सोहोनी
विवेकानंद कॉलोनी, अमरावती ४४४६०६
फोन : ०७२१-२५६७४६३, ९४०५३४९३५४.

 

व्यवस्थेने आत्मचिंतन करण्याची गरज


सुहास सोहोनी
वीकास वार्ता पुरस्कार -१९९० महा शासन,
राष्टीय एकात्मता फेलोशीप - २००५ अखील महा पत्रकार पत्रलेखक संघ,
सहसचीव डाय्बेटीक असो. इंडीया, अमरावती ,
सदस्य : महारषट्र वृत्तपत्र लेखक असोसिएशन,
please visit at : www.suhassohoni.blogspot.com
_________________________________________

व्यवस्थेने आत्मचिंतन करण्याची गरज
 
       ना होगा कोर्ट, ना मिलेगी तारीख और ना होगी सुनबाई. सिधा उपर भेज दूंगा ।  नायकाच्या तोंडी शोभुन दिसणारे टाळ्या हमखास मिळवणारा प्रेक्षकांच्या पसंतीचा हा डायलॉग नागपूरच्या आतंकाग्रस्त १०० -१५० च्या जमावाने भर कोर्टात पोलीस आणि वकीलाच्या साक्षीने एका कुख्‌यात गुन्हेगाराला यमसदनास पाठविले. तडीपार असलेला गुन्हेगार सतत मोहल्यात येतो. नित्य जबरी गुन्हे करतो. नागरीक आतंकित आहेत, त्रस्त आहेत.  न्यायाची वाट न पाहता, पुर्ण विचार करून पुर्णनियोजित पद्धतीने त्या गुन्हेगाराला संपवले जाते.  संपुर्ण पणे दोषी ठरलेल्या ज्ञात गुन्हेगाराला शिक्षा देण्याकरीता १०० च्या वर नागरीकांनी शस्त्र हाती धरावे ? ज्या पद्धतीने ही घटना घडली. त्या वेळी जास्त दु:खद घटना घडली आहे की १००  ते १५०  नवीन गुन्हेगारांनी जन्म घेतला.

         जगात सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतवर्षाचा न्यायपालीकेवर असीम विश्वास आहे. न्यायसंस्था ही सर्वोच्य आहे आणि ती आदरणीय राहिलीच पाहिजे, ही जबाबदारी आहे लोकशाहीचा पुरस्कार करणार्यांची निरनिराळी पद भूषवित मिरवणार्यांची. जनतेचे रक्षक असणारा पोलीस विभाग आणि शासनाचे सर्व घटक यांनी आपापली जबाबदारी वेळच्यावेळी पार पाडणे ही गोष्ट सर्वांच्या भल्यासाठी अत्यावश्यक बाब आहे. दुष्टांच निर्दालन करण्यासाठी जनता जनार्दनाला कायदा हातात घ्यावा लागतोय हे संकेत निश्चीतच धोकादायक आहेत.  व्यक्ती स्वातंत्र्याचा आनंद उपभोगीत असतांना गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांसाठी कायद्याची कठोर पकड हवीच.  कायदा आणि त्याचे रक्षक यांचा धाक कमी होत चालला आहे.  ही गोष्ट अशा घटनांवरून सिद्ध होते आहे. कायदेशीर कार्यालयीन कामाला वेग देवून दोषी व्यक्तींवर लवकर कारवाई होणे गरजेचे आहे. कायद्याच्या त्रुटीचा लाभ जेव्हा सराईत गुन्हेगारांना मिळतो तेव्हा त्रस्त असलेल्या जनतेचा राग अनावर होतो ही मानसीकता लक्षात घेणे आवश्यक आहे. बेसुमार वाढत चाललेली लोकसंख्या, शिक्षित बेरोजगारांचा खदखदणारा असंतोष आणि भौतिक सुखाची लालसा यातुन गुन्हेगारी प्रवृत्ती प्रबळ होईल यात नवल नाही.  सुदृढ लोकशाहीच्या उज्वल भविष्यासाठी न्यायदेवतेवर भारतीयांचा पुर्ण विश्वास हवा, यात तडजोड नाही करता येणार. जनसमुहाद्वारे केल्‌या गेलेल्या हिंसेच्या उद्रेकाच समर्थन होऊच शकत नाही. गरज आहे ती प्रस्थापित व्यवस्थेने आत्मचिंतन करण्याची. ( लेख संग्रह - वर्तुळाचे टोक - लेख क्रमांक २८ )

सुहास सोहोनी
विवेकानंद कॉलोनी, अमरावती.

फोन : ०७२१-२५६७४६३, ९४०५३४९३५४.

Friday, December 9, 2011

मानवी हक्क आयोगाचा आधार वाटायला हवा

सुहास सोहोनी
वीकास वार्ता पुरस्कार -१९९० महा शासन,
राष्टीय एकात्मता फेलोशीप - २००५ अखील महा पत्रकार व पत्रलेखक संघ,
सहसचीव डाय्बेटीक असो. इंडीया, अमरावती ,
सदस्य : महारषट्र वृत्तपत्र लेखक असोसिएशन,
please visit at : www.suhassohoni.blogspot.com
_________________________________________
 
मानवी  हक्क  आयोगाचा आधार वाटायला हवा

     मानवी हक्क म्हणजे कोणाही स्त्री पुरुषाचा शांततेने जीवन जगण्याचा अधिकार. या विचार मध्ये मानवता, मानवी भावना, मनुष्य आणि त्याचे मन अखिल मानवता वाद, मानवी अत्याचार, दबाव , जुलूम, असे असंख्य विषय अंतर्भूत असून मनुष्य जातीच्या सुखासाठी झटणे, गुन्हेगारांच्या वागणुकीत सिधार्ण घडवून आणणे , दुख : व क्लेश कमी करून मानव हित कसे वाढवता येईल, हा मानव हित वाद, व त्या अनुषंगाने मानवाधिकाराचे रक्षण कसे करता येईल याचा प्रामाणिक प्रयत्न करणे, हे मानवी  हक्क  आयोगच कार्य आहे.

    स्वार्थासाठी, सत्येसाठी  मनुष्य  व्यक्तिगत किंवा समूहाने इतर व्यक्ती किवा समूहाला, जरब दाखवून, जबरीने नाडतो, छळतो, अन्याय करतो किंवा निर्दयी होऊन हत्या करतो. कितीही सुसंस्कृतीच्या गप्पा मारल्या तरी जगभर नित्य या घटना घडतात. कुठलाही विधिनिषेध पाळला जात नाही. मानवी मुल्ये सहज गत्या पायदळी तुडवली जातात . शांततेने व सुखाने जगण्याचा हक्क नाकारला जातो. मानव स्वतः इतर मानवांचा शत्रू बनतो .प्रत्येक देशात मन गोठवणाऱ्या दुख:द दुर्दैवी घटना इतिहासात बद्ध झालेल्या आहेत. पण आपल्या देशात तरी कोणते वेगळे चित्र आहे ? शांततेने उपोषण करणाऱ्या, झोपेत असणार्यां, स्त्री , पुरुषांवर पोलीसी लाठीमार केला जातो, अश्रुधुराचा वापर होतो, स्त्रियांवर अत्याचार होतात, न्याय हक्क मागणाऱ्या शेतकऱ्यांवर, जमिनधार्कांवर, गोळीबार होतो. छोट्या मोठ्या गुन्हेगारांना अक्षरशः तुडविले जाते . अश्या कितीतरी घटनांचा उल्लेख करता येईल . शेतकऱ्यांवर, व्यावसायिकांवर आत्महत्या करण्याची वेळ येईल अशी विपरीत व्यवस्था निर्माण होऊ देणे हि कृती, परिस्थिती म्हणजे सुद्धा, मानवी हक्क पायदळी तुडवानेच आहे.

    शांततेने व सुखाने जगण्याच्या मानवी मूल्यांच्या हक्कांचे रक्षण करणे, व अत्याचार ग्रस्तांना न्याय देण्यासाठी आयोग बनवणे व चौकशी करणे, नंतर मात्र सर्व प्रकरण थंड्या बस्त्यात वर्षानु वर्षे पडून राहणे हा अनुभव भारतीयांना नवीन नाही. जगण्याचा हक्क डावलल्या गेलेल्या  केविलवाण्या  अत्याचारग्रस्त व्यक्तिला मानविहक्कासाठी असलेला हा मंच म्हणजे एक आधार वाटायला हवा, आशेचा किरण वाटायला हवा. मात्र आज देशावर आतंकी हल्ला करुन, कराग्रुहात असलेले, फ़शीची शिक्षा झालेले आतंकवादी यांच्यासाठी मानवि हक्काच्या गोष्ठी देश सांभाळण्याची शपथ घेतलेले महानुभाव करतांना दिसतात. मानवी हक्कांचे रक्षण नेमक  कोणाचे करायला हवे ? shahid झालेले, जखमी असलेले, वाचलेले, आणि सर्व नागरिक यांच्या मानवी मुल्ये व हक्कांच रक्षण होऊन त्यांना न्याय केव्हा मिळणार ? कारण फार उशिरा मिळालेला न्याय किंवा निर्णय हाच खरा अन्याय होय.

सुहास सोहोनी

फोन : ०७२१-२५६७४६३, ९४०५३४९३५४.

Thursday, September 1, 2011

समाज मंथनातून भार्ष्टाचार न करणारे नागरिक निर्माण व्हावेत.

सुहास सोहोनी
वीकास वार्ता पुरस्कार -१९९० महा शासन,
राष्टीय एकात्मता फेलोशीप - २००५ अखील महा पत्रकार व पत्रलेखक संघ,
सहसचीव डाय्बेटीक असो. इंडीया, अमरावती ,
सदस्य : महारषट्र वृत्तपत्र लेखक असोसिएशन,
please visit at : www.suhassohoni.blogspot.com
_________________________________________
 
            एकाच वर्षात लागोपाठ भ्रष्टाचाराच्या एकाच  मुद्द्यावर तीन वेळा अहिंसेच्या मार्गाने पण प्राणांतिक उपोषणाच्या निर्धाराने जन आंदोलन होणे हि गोष्ट आंदोलनाचा मुद्दा किती गंभीर आहे हे सिद्ध करते. आंदोलन जरी राजधानीत साकारले तरी ते देशाच्या प्रत्येक गावात, शहरात पसरले. जून ११ चे रामदेव बाबाचे आंदोलन सरकारने हुकुमशाही पद्धतीने उधळून लावले, त्यासाठी साम, दाम, दंड , भेद नीती चा परिपूर्ण वापर केला. तिन्ही आंदोलनात कुणीही राष्ट्रीय वा खाजगी संपत्ती ची लुटालूट केलेली नाही. वास्तविक या तीनही जन आंदोलनात देशातून लाखो करोडो लोक सहभागी झालेले असून हा एक उच्चांक आहे. या गोष्टीची दाखल घेणे गरजेचे आहे. विषय भ्रष्टाचाराचा असो कि विदेशात लपवलेला काळा पैसा हा असो, देशाचे मात्र केवळ आर्थिक नुकसानच आहे. 

            वास्तविक भ्रष्ट्चारी गुन्हेगाराला पकडल्यानंतर शिक्षा करण्याचा कायदा आज अस्तित्वात आहे, पण तरीही अजून सक्षम, कठोर, व व्यापक स्वरूपाचा कायदा म्हणजेच "लोकपाल विधेयक" जे गेल्या ४२ वर्षापासून प्रलंबित आहे. ते २०११ च्या संसदेत पारित व्हावे यासाठी हे आंदोलन आहे. खर्या अर्थाने हे समाज मंथन आहे. आंदोलक, समर्थक जनता , सरकार , सत्ताधारी राजकीय पक्ष , विविध विरोधी पक्ष, या सर्वांच्या निग्रहाची हि एक परीक्षा आहे . बुद्धीचा , जनकल्याणाच्या विचारांचा  कस  लागणार  आहे. भ्रष्टाचाराच्या विरोधात जनक्षोभ या निमित्याने बाहेर आला . जन्मताला वाचा फुटली . जनजाग्रुतिची प्रक्रिया सुरु झाली . श्री आण्णा हजारे आणि त्यांचे सहायक असे नेत्तृत्वा देशापुढे आले. यांचा भविष्यात देशाच्या जडण घडणीत योग्य असा फायदा होईल हा विश्वास वाटतो .

                चारित्र्यवान, सज्जन  , निष्ठावान , व सक्षम नेत्तृत्वाची जनतेला नेहमी भुरळ पडते . पण त्याच वेळी आंदोलनाचा मुद्दा संपूर्ण जनहिताचा असावा लागतो . त्यात स्वार्थाचा लवलेशही नको . यावरच चळवळीचे फलित आवलंबून असते . देशाच्या कानाकोपर्यात अक्षरशहा करोडो लोक या चालवलीत उतरलेले आहेत. भ्रष्टाचार नष्ट करण्याच्या विचाराने लोक भारले गेलेले आहेत .  हि एक उपलब्धी असली तरी भ्रष्टाचार हा स्वतः पासून प्रथम संपवावा लागेल , हेच खरे सत्य आहे.  जोश , आवेश , भुरळ पडणे , भरून जाणे , नेता मान्य होणे, नेत्याची आज्ञा , आवाहन , आव्हान  तत्काळ मान्य करणे , अंमलात आणणे , प्रसंगी जीव देणे, घेणे , हे सगळे त्या वेळच्या परिस्थितीवर आणि नेत्तृत्वाच्या परीपाक्वतेवर , खंबीर पणावर व योग्य निर्णयावर अवलंबून असते .

                      केवळ कायदा कितीही कठोर , सक्षम केला तरी,  जो पर्यंत लोभ , लालसा , सत्ता, हव्यास या सारखे मनाचे शत्रू प्रबळ असतील , तोपर्यंत भ्रष्टाचार, लाच देणे, घेणे नष्ट होणे कठीण आहे . केवळ  मी अण्णा आहे, मै भी अण्णा तू भी अण्णा असे लिहिलेले कपडे घालून हा भस्मासुर हटणार नाही. तर स्वतः च्या मनात ठाण मांडून बसलेला हा भ्रष्टाचाराचा राक्षस नष्ट करावा लागेल. सुरुवात स्वतः पासून करावी लागेल. मी भविष्यात कधीही भ्रष्टाचार करणार नाही, लाच घेणार नाही आणि कोणाला घेऊ देणार नाही अशी प्रत्येकाने प्रतिज्ञा करणे आणि  पाळणे गरजेचे आहे. भ्रष्टाचार विरोधी आंदोलनाद्वारे होत असलेल्या या समाज मंथनातून भ्रष्टाचार  न करणारे नागरिक निर्माण व्हावेत.

सुहास सोहोनी
फोन : ०७२१-२५६७४६३, ९४०५३४९३५४.





Thursday, June 23, 2011

विनाश पृथ्वीचा नाही, जीवसंस्कृतीचा होऊ शकतो

सुहास सोहोनी
वीकास वार्ता पुरस्कार -१९९० महा शासन,
राष्टीय एकात्मता फेलोशीप - २००५ अखील महा पत्रकार व पत्रलेखक संघ,
सहसचीव डाय्बेटीक असो. इंडीया, अमरावती ,
सदस्य : महारषट्र वृत्तपत्र लेखक असोसिएशन,
please visit at : www.suhassohoni.blogspot.com
___________________________________
विनाश पृथ्वीचा नाही, जीवसंस्कृतीचा होऊ शकतो
जगभरातील शात्रज्ञ, जोतीशी, विचारवंत, वैज्ञानिक आणि प्रत्येकच घटनेवर चर्चा करणारे तज्ञ मंडळी या सगळ्यांना नागीक्च्या भविष्यात पृथ्वीच्या नष्ट होण्याची जरा जास्तच काळजी वाटते आहे. अनेक पुरावे, दाखले, पूर्वी नष्ट झालेली माया संस्कृती, नोस्त्रदामची भविष्यवाणी, अधूनमधून जगभर घडणाऱ्या नैसर्गिक आपत्ती, या सगळ्या घटनांचा दाखला हि मंडळी पुढे करतात. सगळे टीव्ही चानल्स प्रलय, भूकंप, ज्वालामुखी यावर आधारित सिनेमांच्या क्लिप्स दिवसभर दाखवत तज्ञांची चर्चासत्रे आयोजित करतात. वृत्तपत्रातून हे काल्पनिक चित्रण रंगवले जाते, जनता भयभीत होते, रक्तदाब वाढतो, चिंता वाढते, आणि उद्याची शाश्वती नसल्याने आज जास्तीतजास्त भोगवादी बना, मजा करा, चंगळ करा, ही मानसिकता वाढीस लागते. विज्ञानाने जी प्रगती साधली ती एका झटक्यात नष्ट होईल कि काय हा एक भयगंड सध्या थैमान घालतो आहे. बुद्धीवादि घटकांना जडलेला झा मानसिक विकार आहे.
भ्रम्हांडाची रचना अद्भूद संरक्षित आहे. अनेक आकाशगंगा, त्यात अगणित तारे, त्यांचे ग्रह, उपग्रह, कृष्णविवरे, याशिवाय आपल्याला माहिती नसलेल्या अगणित गोष्टी हे सगळ संतुलित आहे. अंतर आणि वेगात बांधलेले आहे, नियंत्रित सुधा आहे. या सगळ्या पसाऱ्यात आपली छानशी पृथ्वी चुबकीय प्रभावाच्या अदृश्य धाग्यांनी संतुलित आहे. पृथ्वीच्या उगमापासून अनेक स्थित्यतरे घडून गेली आहेत. नैसर्गिक कारणांनी विविध ठिकाणी विविध वेळी भूपृष्ठावर नित्य बदल झालेले आहेत, होत आहेत आणि पुढेही होत राहणार आहेत. भूगर्भातील सूक्ष्म वेगाने सरकणारे महाकाय खडक (प्लेट्स) नित्य बदल घडवण्यास कारणीभूत ठरतात. हे सर्व बदल घडत असतांना त्या त्या वेळेची जीव्संस्कृती फक्त नष्ट होते. त्या भूभागापुरताच हा विनाश असतो. कालांतराने पुन्हा उपलाभ्ध पर्यावरणाला साजेसे मान्य असणारे नवीन जीव उत्पन्न होतात. पुन्हा कधीतरी नष्ट होईपर्यंत ही जीव्संस्कृती फुलते, खुलते.
हे निसर्गाचे बदल मान्य असतांना आत्ताच जगबुडीची भीती का ? याचे कारण म्हणजे प्रचंड विध्वंसक क्षमता असलेले आजच्या युगातील मानवाने निर्माण केलेले ब्रम्हास्त्र म्हणजेच अणुबॉम्ब. स्वतः ला समर्थ नामाज्णारी अण्वस्त्रधारी राष्ट्रे जेंव्हा अणुयुधाची दुर्दैवी चूक करतील तेंव्हा मानव निर्मित आपत्ती आपले रौद्रस्वरूप दाखवेल. स्वतः सकट संपूर्ण जीवसृष्टीला नष्ट करण्याच सामर्थ्य या आपत्तीत आहे. मानवातील आपसातील इर्षा सत्तकांक्षा व आत्यंतिक द्वेष याची परिणीती एकमेकांवर कुरघोडी करून बेचिराख करून नष्ट करण्यातच होणार हे निश्चित. समजलेले आणि मान्य असलेले हे स्वतः च भविष्य कितीही भयभीत करीत असले तरी आता काय उपयोग ? आपणच निर्माण केलेला अण्वस्त्ररुपी भस्मासुर मान्य असला तरीही विनाशाच खापर ब्राम्हन्दातील ग्रहतार्यांच्या टक्कर होण्यावर फोडले जात आहे. ब्रम्हांड संतुलित व सुनियंत्रित आहे, अण्वस्त्रांच्या स्फोटांच्या प्रभावाने सुद्धा पृथ्वीची शकले होणार नसून भूपृष्ठावरील अयोग्य झालेल्या आवरणात असलेली मानवासहित जीवसृष्टी नाहीशी होऊ शकेल. त्यानंतर जे शिल्लक असेल त्या सहित आपली पृथ्वी मार्गक्रमण करणारच आहे. विशाल वृक्षाच्या फांदीवर बसून आपणच ती फांदी तोडतो आहोत. अजूनही वेळ गेली नाही. सर्वच राष्ट्रांनी अण्वस्त्रे नष्ट करणे आवश्यक आहे. शास्त्र प्रयोगाने शास्त्र वादाचा अंत होऊ शकत नाही. विनाश पृथ्वीचा नाही, जीवसंस्कृतीचा होऊ शकतो.
सुहास सोहोनी. अमरावती.

Tuesday, June 14, 2011

एका लेखणीला विरगती

सुहास सोहोनी
वीकास वार्ता पुरस्कार -१९९० महा शासन,
राष्टीय एकात्मता फेलोशीप - २००५ अखील महा पत्रकार व पत्रलेखक संघ,
सहसचीव डाय्बेटीक असो. इंडीया, अमरावती ,
सदस्य : महारषट्र वृत्तपत्र लेखक असोसिएशन,
please visit at : www.suhassohoni.blogspot.com
_____________________________________________________

एका लेखणीला विरगती

पत्रकारांवरील हल्ले हि दुर्दैवी घट्ना असून एक चिंतेचा विषय आहे. एखाद्या समस्येचा मागोवा घेणे हा पत्रकाराच्या कामाचा एक भाग आहे. त्यातल्या त्यात गुन्हेगारांच्या मागावर राहून त्यांच्या बातम्या मिळवणे ही गुन्हेजगताविरोधात सुरु असलेली एक लढाइच आहे. या लढाइत पत्रकाराच्या हातात लेखणी असते तर गुन्हेगारांच्या हातात शस्त्र असते. कुठ्लीही मान्यताप्राप्त वर्दी नसलेला, शत्राचा वापर न करु शकणारा, माहिती गोळा करुन लेखणी द्वारे, माध्यमाद्वारे ती उघडकीला आणण्यासाठी प्रसंगी जीव पणाला लावून धड्पड्णारा, एखाद्या मिडीया समुहाचा पगारी नोकर असलेल्या या शोध पत्रकाराला काय संरक्षण असते ?

शोधपत्रकारीतेत मुळात पत्रकाराचे काम हे नेहमीच गुप्त स्वरुपाचे असते. कुणावर विसंबुन राहायचे, कुणाकडून माहिती घ्यायची हा सगळा बुद्धीचा आणि डावपेचांचा खेळ असतो, मात्र त्याचवेळी गुन्हेजगताचे जाळे (नेटवर्क) खुपच मजबुत असुन त्यांच्या जवळ अद्ययावत शस्त्रास्त्रे, वाहने, इंटरनेट आणि आधुनिक तंत्रज्ञान हे उपलब्ध आहे असे उघडकीस येत असते. विरोध न आवड्णाऱ्या आणि जिवावर उदार असणाऱ्या या माफियांनी कुणाचीही हत्या करणे अगदी सहज गोष्ट आहे. समाज विघातक कारवायांद्वारे गडगंज संपत्ती लुट्णारे भुमाफिया, तेल माफिया, अन्न धान्य, ऒषधी, मानव तस्करी, बनावट नोटा, अवैध शस्त्र ख्ररेदि विक्री, बोगस गुंतवणुकवाले, आणि अश्या कितीतरी प्रकारे गुन्हे करणाऱ्या माफिया मंड्ळींना अड्थळे कसे काय सहन होणार ?

"मिड डे" चे इंन्हेस्टीगेटींग एडीटर असलेले जोतिर्मय डे यांची हत्या विचार करण्यास प्रवृत्त करते. आज पर्यंत जगात अनेक पत्रकारांवर हल्ले झालेले आहेत, हत्या झालेल्या आहेत. हे सर्व पत्रकार आपले कर्तव्य बजावत असतांना बळी गेलेले आहेत. पत्रकारांना संरक्षण देण्याची गरज आहे. गोपनीय कामात व्यग्र असतांना संरक्षण कसे आणि केव्हा द्यायचे, असे प्रश्न उपस्थित करण्यापेक्षा अनुभवांती काही ठोस संरक्षणात्मक व्यवस्था निर्माण करावयास हवी. गुन्हेगारांविरोधात लढ्णारा पत्रकार हा मिडीया व समाजासाठी मौल्यवान जीव आहे. कर्तव्य पार पाड्त असतांना जीवाचे बलीदान करणाऱ्या पत्रकारांना विरगती प्राप्त झाली असे म्हणावयास हवे. यांचा मरणोत्तर उचित सन्मान व्हावा व त्यांच्या परिवाराला आर्थिक संरक्षण मिळावे.

सुहास सोहोनी
सदस्य : महारषट्र वृत्तपत्र लेखक असोसिएशन, अमरावती
मोबाइल: ९४०५३४९३५४
फोन : ०७२१-२५६७४६३


Tuesday, May 10, 2011

नातवंडात रमलेले आजी आजोबा यांचे स्वर्गसुख

नातवंडात रमलेले आजी आजोबा यांचे स्वर्गसुख

नशीबवान आहेत ते आजी आजोबा ज्यांना नातवंड सोबत राहाण्याच, खेळण्याच भाग्य लागत. अर्ध शतकाच्या लांबलचक प्रवासात सुख दुःखाचे असंख्य चढ उतार पार करीत एका सोनेरी वळणावर नातवंडांच्या प्रतीक्षेचे वेध लागतात. हा काही महिन्यांचा काळ म्हणजे आनंद, काळजी, अनामिक हुरहूर असंख्य भावभावनांचा नुसता कल्लोळ असतो. जन्माला येणाऱ्या बाळाच्या नुसत्या कल्पनेने ती वास्तू कणाकणाने फुलते/ खुलते, आणि एका नेमक्या मुहूर्तावर सुंदर, गुलाबी, मखमली, गोबर्या गालांचे ते बाळ अनेकांना विवध नात्यांनी एकमेकांशी बांधून टाकत. एका नव जीवनाची पुन्हा सुरवात होते. कृतार्थ मातापिता आकंठ आनंदात तरंगत असतात. जणू काही आपली खूप जुनी ओळख आहे अश्या थाटात टुकू टुकू बघत आजी आजोबांना नव चैतन्य मिळवून देत. त्या लबाडाच कौतुक करतांना, खेळवतांना, त्यांचा थकवा दूर पाळतो. शारीरिक व्याधीने त्रस्त असले तरी हाताच्या पाळण्यावर बाळाला घेऊन बडबडगीत गात खोलीभर फिरणारे आजी आजोबा प्रत्यक्ष विधात्याशी गुजगोष्टी करीत स्वर्गसुखाचा अनुभव घेत आहेत असा भास होतो. पलंगावर पहुडलेली पणजी जेंव्हा तिचा ४ वर्षाचा पणतू येतो तेंव्हा टुणकन पुढे येते आणि बोबड्या बोलीत त्याच्या विवध खेळत भान विसरते. तो प्रसंग तिच्या साठी श्रेष्ठ साध्य योग असून त्या संपूर्ण वास्तूसाठी निखळ अमृत योग आहे.

नातवंडांशी मनसोक्त खेळायला मिळण म्हणजे आजी आजोबांसाठी जगातील सर्वोत्कृष्ठ टोनिक मिळण्यासारखच आहे. जादूच्या कान्डीने बदल घडवावा तस मन उल्हासित करणारे हे टोनिक सर्व श्रेष्ठ अशे. नातवंडांचा रुसवा फुगवा, निरागस हास्य, हट्ट, कल्पना विश्व, अनुकरण करण्यातील तीव्र बुद्धिमत्ता आणि कुठल्याही भावविकारांचा स्पर्शहि न झालेला निरागस लोभस पणा या अनोख्या विश्वात पुरेपूर गुंतून जाणे, हा आनंदच आगळा आहे. अफाट सत्ता आणि करोडोची संपत्ती सुद्धा या आनंदापुढे कमीच आहे. भाग्यवान आजी आजोबांनाच हा आनंद मिळतो अस येवढ्याकरता म्हणावस वाटत, कि नोकरी व्यवसायामुळे मुले सुना दूर असतात, अनेक कारणांमुळे आजी आजोबांशी जवळीक राहत नाही. कधीतरी पत्रात किंवा फोनवरच थोडस बोलता येत, बाकी वेळ केवळ आठवणी आणि काळजी आणि हुरहूर.

विविध भूतिक कारणांमुळे आज असंख्य वयस्क जेष्ठांना एकट्यानेच रहाव लागत. कितीतरी जोडप्यांना एकमेकांची सावली आधार बनून आहे ते जीवन जगावे लागत, कारण, पर्याय नाही. सुंदर घर आहे, फर्निचर आहे, पैसा अडकाहि भरपूर आहे, पण घरात केवळ दोघाच. घर खायला उठत. हळूहळू सवय व्हायला लागते. ते स्वतः साठी, फर्निचर साठी, घरातल्या बगिच्या साठी जगात राहतात. पण त्या विधात्याच्या मनात काही वेगळाच असाव, कारण असंख्य कारणांनी माता-पित्याच छत्र हरवलेली, घरा-दाराला मुकलेली, आईबापाने त्याग केलेली असंख्य बालके निराधार निराश्रित जीवन का जगतात ? पुन्हा पर्याय नाही. त्या बालकांना सुद्धा जगणे क्रमप्राप्त आहे. जीवन देणे आणि संपवणे हे दोन्ही अधिकार त्या विधात्याने स्वतः जवळ ठेवलेत. या बालकांना आई बापच नाहीत तर आजी आजोबा कुठून मिळणार ? एक गोष्ट खूपच महत्वाची वाटते, ती म्हणजे माये साठी आसुसलेली हि बालके आणि एकाकी जीवन कंठणारे आजी आजोबा यांच्यात त्यांच्याच शहरात फक्त काही मैलांचच अंतर आहे. हे काही मैलांचच अंतर जर मिटवता आल तर स्वतः च म्हणून काहीही नसलेल्या निराधार बालकांना आजी आजोबांची माया तरी मिळेल, आपुलकी, संरक्षण तरी मिळेल. अजूनही आम्ही विचारांच्या परंपरेच्या बंदिस्त कोशात घूसमटण्यात समाधान मानतो आहोत. पण तो बंदिस्त कोश आपल्या बळकट पंखांनी फोडून जेंव्हा विविध रंगी फुलपाखरू आसमंतात गिरक्या घेऊ लागेल तेंव्हा नशीबवान असतील ते आजी आजोबा ज्यांना नातवंडांसोबत राहाण्याच, खेळण्या बागडण्याच, आणि मुख्य म्हणजे खळखळून हासण्याच भाग्य लाभेल. खरच अस होईल ?

सुहास सोहोनी,
वीकास वार्ता पुरस्कार -१९९० महा शासन,
राष्टीय एकात्मता फेलोशीप - २००५ अखील महा पत्रकार व पत्रलेखक संघ,
सदस्य महाराष्ट्र वृत्त पत्र लेखक असोसीएशन,
सहसचीव डाय्बेटीक असो. इंडीया, अमरावती.
please visit at : www.suhassohoni.blogspot.com

Monday, May 9, 2011

परिचारिका म्हणजे तपस्विता, तत्परता, तेजस्विता.

परिचारिका म्हणजे तपस्विता, तत्परता, तेजस्विता.
(१२ में, जागतिक परिचारिका दिन निमित्त )

बाळाचा जन्म झाल्यावर सर्वप्रथम त्याला / तिला तळहातावर सुरक्षित उचलून घेणारी परिचारिका (नर्स) असते. बाळाला सर्वप्रथम न्हाऊ घालणे स्वच करणे हि सगळी सेवा नर्स करते, "आईच्याही आधी" . नंतर जन्मभर रुग्णांना हीच परिचारिका अखंड सेवा देत असते. यातना आणि वेदनांनी तळमळणार्या रुग्णाची सुश्रुषा करणारी, धीर देणारी हि एक देवदूतच आहे. अशा देवदूतांच्या प्रशिक्षणाचा पाया रोवणाऱ्या एका दीपस्तंभाचा जन्म १२ मे १८२० साली इटली मध्ये श्रीमंत इंग्रज घराण्यात झाला. हा दीपस्तंभ म्हणजेच फ्लोरेंस नाईटिंगल. त्या काळात फारसा प्रतिष्ठेचा नसलेला हा व्यवसाय तिने निवडला. दोन वर्ष प्रत्यक्ष युद्ध क्षेत्रात हजार राहून ३७ नर्सेस ना सोबत घेऊन फ्लोरेंस नाईटिंगल हिने जखमी सैनिकांची सेवा केली. करुणाभाव आणि कर्तव्याची जाण इतकी प्रखर होती कि जखमी सैनिकांची चौकशी करण्यासाठी धीर देण्यासाठी हातात ल्याम्प घेऊन रात्री बेरात्री हॉस्पिटलच्या सर्व वार्डात फ्लोरेंस फिरत असे, त्यावरून तिला "लेडी विथ ल्याम्प", हे संबोधन प्राप्त झाले. नर्सेस ना प्रशिक्षणाची आत्यंतिक गरज हेरून, या प्रशिक्षण कार्यात सुधारणा घडवून आणल्या. स्वतःच संपूर्ण आयुष्य परिचारिका घडवण्याच्या कार्यासाठी समर्पित केल. लंडन मध्ये नर्सेस ट्रेनिंग कॉलेज स्थापित केल. ब्रिटनचा सर्वोच्य नागरीक सन्मान फ्लोरेंसला प्राप्त झाला.

परिचारिकेची नोकरी हे मानव सेवेचे व्रत आहे, याचा विचार हे क्षेत्र निवडताना व्हावा. रुग्ण संखेच्या तुलनेत प्रशिक्षित परिचारिका नाहीत हे सत्य आहे, परंतु आरोग्य सेवेच्या कार्यात हि एक फार मोठी गरज आहे. प्रत्यक शहराची प्रशिक्षित परिचारिकांची गरज पूर्ण होत नसल्याने, अप्रशिक्शिताना नोकरी द्यावी लागते. त्यांना पगार कमी दिला जातो, मात्र रुग्ण सेवेचा दर्जा खालावतो. रुग्ण सेवा हि ईश्वरसेवा आहे. तसेच गरज आणि बेरोजगारी यांचा विचार करता, हा एक चांगला व्यवसाय आहे. जास्तीतजास्त युवक युवतींनी हा अभ्यासक्रम निवडावा. परिचारिकांच्या आरोग्य सेवेतील योगदानाकडे साधी नोकरी म्हणून बघितले जाऊ नये. संपूर्ण समाजाने या व्यवसायाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलण्याची गरज आहे. खाजगी शैक्षणिक संस्थांमध्ये चालवला जाणारा नर्सिंग अभ्यासक्रम दिवसेंदिवस महाग होतो आहे. यावर काही बंधन हवे.

मृत्यू हे अंतिम सत्य जरी असले तरी, आजच्या विज्ञान युगात या आरोग्य दूतांना ओलांडून मृत्यूसुद्धा रुग्णाजवळ पोहोचू शकत नाही. कितीतरी वेळा मृत्यूला तात्पुरता पराभव स्वीकारावा लागतो. नेमके निर्णय, चपळ हालचाली, सांघिक दक्षता, आणि समर्थ अनुभवाच्या जोरावर रुग्णाला मृत्युच्या दाढेतून खेचून काढले जाते. कामाचे तणाव पूर्ण स्वरूप अनियमित वेळा जरी असल्या, तरी कर्तव्याद्वारे आत्मिक समाधान याच कामाद्वारे मिळते हेही खरे आहे. आधुनिक ज्ञानाद्वारे प्रशिक्षित पारीचारकांचे रुग्ण सेवेचे कार्य, हे दैवी कार्य आहे. जीवन रक्षणाचा विश्वास आहे परिचारिका, म्हणजेच तपस्विता, तत्परता, तेजस्विता हेच त्रिगुणात्मक रूप आहे. समाजाने या देवतुल्य कार्याची दाखल घ्यायला हवी.

या देवी सर्व भूतेषु सेवारूपेण संस्थिता !
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमोनमः !!

सुहास सोहोनी,
वीकास वार्ता पुरस्कार -१९९० महा शासन,
राष्टीय एकात्मता फेलोशीप - २००५ अखील महा पत्रकार व पत्रलेखक संघ,
सदस्य महाराष्ट्र वृत्त पत्र लेखक असोसीएशन,
सहसचीव डाय्बेटीक असो. इंडीया, अमरावती.
please visit at : www.suhassohoni.blogspot.com

Sunday, May 8, 2011

मॉर्निंग वॉक आणि गुटखा पाकिटे

मॉर्निंग वॉक आणि गुटखा पाकिटे

चांगल्या आरोग्याची आवड असणारे सकाळच्या शांत रम्य समयी शुद्ध हवेत मोकळ्या वातावरणात फिरायला जातात. गावालगतच्या जंगलात थोड दूर, वर एखाद्या तळ्याकाठी, मैदानात किंवा छोट्याश्या टेकडीवर आपल्या आवडत्या स्थळी फिरताना मनाला शरीराला आनंद होतो. कोणत्याही शहराच्या मानन सकाळी फिरायला जाणार्यांचे प्रमाण फारच कमी आहे. हे प्रमाण वाढल तर नक्कीच ती एक चागली गोष्ट आहे. पण सद्य स्थितीत अश्या रम्य स्थळाच्या परिसरात चालण्याच्या वाटेच्या बाजूने दर दहा पावलांवर रिकामी गुटखा पाकिटे भिरकावलेली दिसतात.

सकारात्मक आरोग्याच्या दिशेने पुढे पाऊल टाकत वाटचाल करणाऱ्या या मंडळींचे हात तंबाखू जन्य गुटखा पाकिटांना का जवळ करीत असतील ? केवळ एक रुपयाल मिळणार हे चकचकीत रंगच गुटखा पाकीट एखादी रमणीय टेकडी सर करून टेकडीच्या माथ्यावर इतस्ततः विराजमान झालेलं सहज दिसत. प्लास्टिकच्या रंगीबेरंगी आवरणामुळे त्या पाकिटांच अस्तित्व चटकन जाणवत. कोणत्याही गावातून कधीही फेरफटका मारला तरी विविध स्वरुपात इतस्ततः फेकलेल्या प्लास्टिकच्या थैल्या, वेस्टने, बाटल्या, कायम पडलेल्या दिसतात.

सतत कोणीतरी कोणाला उपदेश करण्या पेक्षा काही प्रश्न प्रत्येकाने स्वतःच्या मनालाच विचारायला हवेत. प्रत्येक प्रश्नाच योग्य उत्तर असत आणि ते प्रत्याकाला माहिती असत, फक्त गरज आहे ते चुकीच काम करणाऱ्या आपल्या हाताला थांबवण्याची. प्लास्टिकच्या थैल्या, वेष्टने किंवा गुटखा पाकिटे, या निर्जीव वस्तू आहेत. स्वतःच्या मर्जीने ती पाकिटे टेकडीवर चढत नाहीत, तेव्हा ती फेकणार्या हातांना योग्य आदेश आपल्या मनानेच द्यायचा आहे. एकदा निर्णय घेतला तर काहीही शक्य आहे.

सुहास सोहोनी,
वीकास वार्ता पुरस्कार -१९९० महा शासन,
राष्टीय एकात्मता फेलोशीप - २००५ अखील महा पत्रकार व पत्रलेखक संघ,
सदस्य महाराष्ट्र वृत्त पत्र लेखक असोसीएशन,
सहसचीव डाय्बेटीक असो. इंडीया, अमरावती.
please visit at : www.suhassohoni.blogspot.com

Saturday, May 7, 2011

मोबाईल, वाहन आणि फुकटचा सल्ला !

मोबाईल, वाहन आणि फुकटचा सल्ला !

कोणतेही वाहन जेव्हा आपण चालवतो तेव्हा वाहन चालवण्याच्या क्रियेशी आपले हात, पाय, आणि विचार एकरूप होतात. माशीन आणि चालवणारा चालक दोघांच्या संगनमताने ते वाहन सहजपणे चालकाच्या मेंदूच्या आज्ञेप्रमाणे पुढे सरकते, वेग घेते. वाहन चालकाने नजर रस्त्यावर ठेवून शांत बुद्धीने वाहन चालवावे हि अपेक्षा, पण आजच्या मोबाईल काळात सतत नित्य बोलत राहा हेच सांगितल्या मुळे मोबाईल वर बोलणे अगदी आवश्यक आहे. त्या करिता एका हाताने वाहन आणि दुसर्या हाताने कानाला मोबाईल, मोठ्याने बोलणे, त्यापेक्षा बोलताना विषयाला अनुसरून चेहेर्यावर हावभाव, हे सुद्धा फारच आवश्यक आहे. याहीपेक्षा आणखीन एक क्रिया वाहनचालकाला यायलाच हवी, तरच त्याला तरबेज वाहन चालक म्हणता येईल. म्हणजे असे कि ४५ डिग्री आपली मान खंद्याच्या दिशेने झुकवायची आणि ४५ डिग्री ने खांदा उंच करायचा व मान आणि खांदा यांच्या मध्ये अलगद मोबाईल सरकवायचा आणि कितीही वेळ वाहन चालवताना मस्त गप्पा हाणायच्या. आहे कि नाही गम्मत ? नाहीतरी हि नवी पिढी मुळातच हुशार आहे बुवा !

वास्तविक वाहन चालवताना कसरत करत मोबाईल वापरणाऱ्या लोकांना इतर वाहनांनी सन्मानपूर्वक वाट करून द्यायला हवी. वाकडी मान करून येणारे वाहन सामान्य वाहन चालकांना दिसत कसे नाही ? मोबाईलवर बोलण्यात व्यस्त असलेल्या वाहन चालकावर सरळ आदळतात म्हणजे काय ? हे बरोबर नाही प्रत्येक वाहन चालकाला किमान मान वाकडी करून बोलत बोलत वाहन चालवता आलेच पाहिजे. तज्ञ चालकांनी असे कोचिंग क्लासेस काढायला हरकत नाही. आई बाप आणि पालक हि तर एक नंबरची घाबरत मंडळी. अगदी मुळे घरी येई पर्यंत सारखे घाबरत असतात. काही तज्ञ विचारवंत स्वतः ला लेखक वगैरे समजणारी मंडळी तर फुकटचा सल्ला देण्याची एकही संधी सोडत नाही. फुकट सल्ले देण्याच्या यांच्या चिकाटीला मानावे लागेल. खरे म्हणजे अनेक थोर महात्म्यांनी प्रवचकरांनी, संतांनी सांगूनच ठेवले आहे कि, जगतांना उठ सुठ सारखा सारखा मृत्यू चा विचार कधी करू नये. तो काय कधीतरी यायचाच कसे ? तरीपण एक फुकट सल्ला द्यावासा वाटतो कि मोबाईल वर बोलतांना वाहन चालवणे धोक्याचे असते.

सुहास सोहोनी
वीकास वार्ता पुरस्कार -१९९० महा शासन
राष्टीय एकात्मता फेलोशीप - २००५ अखील महा पत्रकार व पत्रलेखक संघ
सहसचीव डाय्बेटीक असो. इंडीया, अमरावती
please visit at : www.suhassohoni.blogspot.com

देव आपल्यावर का रुसला हेच कळत नाही !

देव आपल्यावर का रुसला हेच कळत नाही.

जन्माने किंवा अपघाताने अपंगत्वाचा एकदा का एखाद्या कुटुंबात शिरकाव झाला कि त्या परिवाराला जणू एक्खाद्या युद्ध प्रसंगाला सामोरे जावे, तसे या अपंगत्वावर मात करण्यासाठी झगडावे लागते. अनुवांशिकता, गुणसूत्रातील दोष, गर्भार अवस्थेत मातेचे कुपोषण, चुकीची औषधे, अपघात, ताप, रक्तदाब, मधुमेह, थायरॉईड चा प्रभाव, अशा अगणित आणि अनाकलनीय कारणाने जन्मतः शारीरिक किंवा मानसिक अपंगत्व प्राप्त होते. त्याशिवाय व्यसनांचा अतिरेक, रासायनिक द्रव्य किंवा वायू वा किरणोत्सर्गाने येणारे अपंगत्व म्हणजे कठीण परीक्षाच आहे. अपंग व्यक्ती व तिचे माता पिता यांच्या हृदयाची कालवाकालव इतरांना दिसली तरी त्या यातना त्यांच्या त्यांनाच सोसाव्या लागतात.

आज आरोग्य विज्ञान शास्त्र अत्यंत प्रगत आहे. प्रसूतीपूर्व विविध चाचण्या आहेत. जनता साक्षर आहे. पण तरीही जन्मतः अपंगत्व, त्यापेक्षा मेंदूचे रोग आणि मानसिक अपंगत्वाच प्रमाण काळजी करण्या इतकेच जास्त आहे. प्रसूतीपूर्व चाचण्या द्वारे या प्रकारची कमतरता का सिद्ध होऊ शकत नाही ? चाचणी मशीन ची अचूकता व त्याचे निदान करण्याची प्रगल्भ बुद्धिमत्ता प्रत्येक छोट्या मोठ्या शहरात उपलब्ध आहे का ? प्रगत आरोग्य विज्ञान शाश्त्राचा सूक्ष्म अभ्यास होणे गरजेचे असून आर्थिक दृष्ट्या स्वस्त असण्याची गरज आहे, कारण समस्या ग्रस्त परिवारासाठी हा प्रचंड आर्थिक मनस्ताप आहे. एकदा समस्या सिद्ध झाली कि या दवाखान्यातून त्या दवाखान्यात धावणाऱ्या आई बापाला वंशपरंपरागत दोष, गुणसूत्रातील दोष, किंवा गर्भारपणात झालेल्या न झालेल्या चुका यावर प्रश्नांच्या फैरी ऐकाव्या लागतात. जन्मापात्रीकेतील दोष, पूर्वजांचा शाप, नक्षत्र वा ग्रहांचा त्रास, पुनर्जन्म अश्या अनेक गोष्टीतून मनस्ताप होतो. कुठेही उत्तर सापडत नाही. आपला देव आपल्यावर का रुसला हेच कळत नाही.

नीट विचार केला तर सुधृद सशक्त शरीर, चांगल्या सवयी, काही शारीरिक दोषांची पूर्व माहिती त्यावर वेळेआधी केलेले उपचार, शरीर शाश्त्राची आवश्यक माहिती, प्रसन्न मन, योग्य वेळी होणारी गर्भधारणा अशा अनेक गोष्टींचा शास्त्रीय दृष्ट्या विचार करावा लागेल.

अपंग, अंध वा मतीमंद अश्या समाज घटकांसाठी बँकेच्या ठेवींवर २ टक्के व्याज जास्त मिळावे, तसेच समस्या ग्रस्त असलेल्यांसाठी औशोधोप्चार, चाचण्या सरकारी व खाजगी रुग्णालयात सुद्धा ना नफा ना तोटा तत्वावर उपलब्ध असाव्या. हा खर्च भरून काढण्यासाठी धनवान व सामाजिक संस्थांनी पुढाकार घ्यावा. असे झाले तर पुन्हा कोणी हिम्मतवाला एवरेस्ट सर करेल. अथांग सागर पोहून जाईल. नवनवी कल्पना जिद्दीने साकार केल्या जातील. आत्मविश्वास जागृत करून या समाज घटकाला दिशा दाखवायची गरज आहे. देवाचा रुसवा आपण घालवू या !

सुहास सोहोनी
वीकास वार्ता पुरस्कार -१९९० महा शासन
राष्टीय एकात्मता फेलोशीप - २००५ अखील महा पत्रकार व पत्रलेखक संघ
सहसचीव डाय्बेटीक असो. इंडीया, अमरावती
please visit at : www.suhassohoni.blogspot.com

Wednesday, May 4, 2011

देव देवलातच असतो का ?

देव देवलातच असतो का ?
मंदिरात पूजा आर्चा करण्याची जबाबदारी ज्याच्यावर सोपवली असेल, जो कोणत्याही समाजाचा असेल, त्याच्या शिवाय कुणाही स्त्री किंवा पुरुषाने गाभार्यात स्वतः होऊंन जाऊ नए। खर तर देव दर्शनासाठी केंव्हा जाऊ नए हे स्त्रियांना स्वाताहलाच समजते, पण देवालयात गाभार्यात प्रवेश करणारे पुरुष स्वच्छतेचे कितीसे पालन करतात ? तोंडाला पानमसाला, गुट्ख्याचा उग्र वास, अंघोळ न केलेले अंगाला व कपड्यांना कूबत वास असलेले आणि तोंडाला चक्क दारूचा वास येत असलेले अनेक महाभाग देव दर्शनाच्या रांगेत लागलेले आढल्तात। देव दर्शन प्रत्येकासाठी मुक्त असलेच पाहिजे। व दर्शनासाठी उभे राहिल्यावर पुढे सरका असेही हकालल्या सारखे कुणी म्हणु नए। देव दर्शन हा आनंदाचा क्षण आहे। गाभार्यात जाऊंन मूर्ति ला स्पर्ष करण्यानेच कृपा होते हा एक समज। गाभार्या बाहेर उभ राहून, डोळे भरून, सर्व सुख दुख विसरून, त्या तेजाच्या मूर्ति कड़े बघत बसणे, हा खरा आनंद आहे।

देवाचिये द्वारी ऊभा क्षण भरी अशी आनंदाची स्थिति अनुभवणे सोडून , वादाच्या ठिणग्या का फेकल्या जातात ? त्या पेक्षा आपली देवालय शांत, सुन्दर, स्वच्छ कशी राहतील, हे तपासण्याची गरज आहे । मुर्तिवर अभिषेक, त्यामुलेच दूध, दही, पाणी, त्यातच भिजलेली सर्वत्र पसरलेली, वास येत असलेली, फुले, सभामंडपात पायाखाली तुडवली जाणारी फुले, या बाबत कृति हवी। दोन तिन मजले चढून व उतरून, कठडयातुन रांगेत आल्यावर, काही तासांनी देव दर्शन होत। अति श्रीमंत देवस्थान म्हणजे जागृत देवस्थान असाही एक भ्रम आहे। शेवटी भक्तान्चिच इच्छा दुसरे काय !

आजकल सगले देव सोन्याचे कसे करता येतील, मुर्तिवर सोन्याचे कपडे, त्यावर हीरे माणके, सोन्याचे सिंहासन, सोन्याचाच कलस कसा बसवता येइल, ह्या धेयाने भक्त गण वेडे ज़लेले आहेत। गावो गावची जुनी मंदिरे व निर्माण होत असलेली नवी मंदिरे, त्यावर होणारा कोट्यावधीचा खर्च , दनाद्वारे येणारा अफाट पैसा, आणि श्रीमंत देव देवता या परश्वाभूमीवर मनात विचारांच आन्दोलन सुरु की या देशात दररोज कुपोषित बालके का मारतात ? अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण। औषधोपचार या प्राथमिक गोष्टीपासून करोडो नागरिक का वंचित आहेत ? देव दर्शानासाठी अफाट गर्दी असताना तीच जनता, व्यसनाधीन, भ्रष्ट, विक्रुतान्ध का ? देव देवलातच असतो का ?


सुहास सोहोनी
वीकास वार्ता पुरस्कार -१९९० महा शासन
राष्टीय एकात्मता फेलोशीप - २००५ अखील महा पत्रकार व पत्रलेखक संघ
सहसचीव डाय्बेटीक असो. इंडीया, अमरावती
please visit at : www.suhassohoni.blogspot.com

Saturday, April 30, 2011

Global Warning

GLOBAL WARMING, BUILDING OF LAKES,
MEMORY GARDEN AND CELEBRITIES

1. As per the data reports available presented by several study groups, regarding rise in temperature and increase of ice water at various mountains like Himalayas and both the poles of earth, it is known that water level at various seashore may increase which will result as disaster. At the same time drinking water ratio may lesser in near future.

2. Reservoirs of Sweet water by building cores of lakes and Conservation of Forests all over the Earth must be the priority project. All Villages, Gram-Panchayat, Social Clubs like Rotary, Lions, J.C.’s and all others are humbly requested to join with this prime project. By adopting villages lakes can be built up and Forest should be constructed around the lakes. Caring and nourishment of lakes and Forest (memory garden) up to 10 Years will definitely serve the purpose of environment, and I am sure this task will increase the beauty of our earth. Further I request to all honorable celebrities like Leaders, Personalities who have followers in masses and are famous by their devotion, Please do come forward and propagate the importance of Lakes And Forest (Memory Garden) in our Future Existence and priority project to save our earth. I am confident that all-star personalities will come together in this battle against “GLOBAL WARMING”

Here I am impressed by one formulae that is:

BUILDING OF LAKES + MEMORY GARDEN
= PROTECTION OF ENVIRONMENT


Suhas Sohoni
Amravati.

Thursday, April 28, 2011

अणुउर्जा प्रकल्प म्हणजे बंद बाटलीतले राक्षस

अणुउर्जा प्रकल्प म्हणजे बंद बाटलीतले राक्षस

अणुउर्जा कार्यक्रमांना जागतिक स्तरावर विरोध होणे हा विचार मानवी अस्तित्वाशी निगडीत आहे. ६५ वर्षांपूर्वी अनु बॉम्बच्या रूपाने संहारक शक्ती जपान आणि संपूर्ण जगाने भयचकित होवून पहिली. लाखोंच्या संखेने लोक क्षणात नाहीसे झाले. लाखोलोक प्रभावित झाले. अनुउर्जेच्या मदतीने पुढे प्रगती झाली. भौतीकसुखासाठी प्रचंड विकास केला गेला, पण एक गोष्ट सर्व जण विसरताहेत कि अणुउर्जा म्हणजे बाटलीत बंद असलेला राक्षस आहे. ज्या ज्या ठिकाणी आणि ज्या ज्या वेळी हा राक्षस बाहेर पडला तेंव्हा त्याने प्रचंड हाहाक्कार माजवला आहे. आज सुद्धा नेमका जपान या अणुउर्जा नामक भयानक राक्षसाच्या तावडीत सापडला आहे. भूकंप जपानला नवीन नाही, त्सुनामी हा निसर्गाच्या तांडवाचा अतिरेक आहेच पण न्यूक्लीअर रेडीएंशन मुले होणारा विनाश हे केवळ दुर्दैव म्हणावयाचे काय .

स्वतःला प्रगत म्हणवणाऱ्या सर्वच देशांमध्ये अणुउर्जा संयंत्र आहेत. छोट्याश्या जपान देशात ५५ संयंत्र आहेत. आपल्या देशात २२ संयंत्र आहेत. अजून काही नवीन उभारली जात आहेत. भारतात हिमालयाच्या रांगा, ईशांन्येची राज्ये, गुजरात, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, आणि दक्षिणेकडील बराच भाग, भूकंप शक्यतेच्या पट्टयात येतो. यापूर्वी बर्याच वेळा मोठे भूकंप होवून दुखद अनुभव आलेले आहेत. त्सुनामीचे रौद्र रूप सुद्धा आपल्या देशाने अनुभवलं आहे. ७००० किलोमीटर समुद्र किनारा लाभलेल्या आपल्या देशात समुद्री लाटांमुळे नेहमीच नुकसान होत असते. पण अनुउर्जेच्या धोक्याबाबत काय ? संपूर्ण सागर तटांवर जवळ जवळ ४५ कोटी लोकसंख्या आहे. नैसर्गिक आपत्ती नंतर उद्भवलेल्या रेडीएशनच्या धोक्याला प्रगत राष्ट्र सुद्धा यशस्वी तोंड देवू शकलेली नाहीत. निसर्गापुढे कुणीही शक्तिमान नाही. न्यूक्लीअर रेडीएंशन हि केवळ मानव निर्मित आपत्ती आहे. संपूर्ण जग प्रत्येक वेळी आश्या राक्षसी आपत्तीला कसेकाय तोंड देणार आहेत ? कितीवेळा विषाची परीक्षा बघायची आहे ? पृथ्वीच्या पाठीवर हे घातक विषारी साठे नको. हेच निसर्गाने आपल्या कृतीने दाखवून दिले. हि धोक्याची घंटा आम्हाला समजत नाही. काय कामाची हि बुद्धिमत्ता !

करोडो जीवांची क्षणात राख रांगोळी होऊ शकेल अशीचूक कोणाच्याही हातून होऊ नये. अनुउर्जे ऐवजी जलउर्जा, पावनउर्जा, सौरुर्जेचा वापर का होऊ शकत नाही, यावर संशोधन व्हावे. मुळात संहारक असलेली अणुउर्जा कधीही धोकेदायक ठरू शकते. जागतिक स्तरावर न्यूक्लीअर एनर्जी विरोधात एकत्रित जनमत उभे राहिले पाहिजे. आण्विक संकट समूळ नष्ट करणे हि आजची प्राथमिकता आहे. प्रत्येक लहान थोर व्यक्तीने अनुउर्जे विरोधात आग्रही मत मांडणे आवश्यक आहे. जगण्याचा हक्कासाठी अणुउर्जा प्रकल्पांना स्पष्ट विरोध हवा.

सुहास सोहोनी
विवेकानंद कॉलोनी, अमरावती - ४४४६०६
फोन : ०७२१ - २५६७४६३, ९४०५३४९३५४.
www.suhassohoni.blogspot.com

Tuesday, April 26, 2011

सत्य साई बाबांचे कार्य कोणत्या पद्धतीने पुढे चालवावे ?

सत्य साई बाबांचे कार्य कोणत्या पद्धतीने पुढे चालवावे ?

देश विदेशातील करोडो भक्तांचे दैवत असलेले सत्य साईबाबा आज आपल्यात शरीर रूपाने जरी नसले तरी समाजासाठी त्यांनी जे महान कार्य करून ठेवले आहे त्या कार्य रूपाने ते आपल्या जवळ नित्य असणार आहेत. प्रत्येक अवतारी महापुरुषाला सुद्धा मृत्यू अटळ आहे, हेच निसर्गाला मान्य आहे. गावागावांमध्ये पाणी उपलब्ध करून देणे, शिक्षणासाठी शाळा निर्माण करणे आणि रोग ग्रस्तांना औशोधाप्चार, शुश्रुषा मिळणे या साठी अद्ययावत सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, असे मोठे प्रकल्प त्यांनी उभे केले.

सत्य साईबाबांनी भक्तांना आयुष्यभर भरभरून आशीर्वाद दिले त्याच बरोबर शिक्षण, पाणी, व हॉस्पिटल द्वारा जनतेला कायम उपकृत केले आणि म्हणूनच आज त्यांचे करोडो भक्तगण दु:खात आहेत. त्यांचा वारस कोण ? किंवा इस्टेटीचा मालक कोण ? हा प्रश्न उपस्थित होऊच नये. "सत्य साईबाबा ट्रस्ट " या ट्रस्ट मार्फत त्यांचे कार्य या पुढेही अधिक निष्ठेने सुरु राहावे. भक्तगणांच्या देणग्यांवर ट्रस्ट निर्माण झालेला असल्यामुळे पूर्वी इतकेच किंवा त्या पेक्षा जास्त समाजाभिमुख राहून सत्य साईबाबा ट्रस्ट ने त्यांचे महान कार्य " पवित्र कर्म " समजून चालवावे. जरासुद्धा अपहार होणार नाही याची पुरेपूर काळजी / दक्षता घ्यावी. हीच त्या कर्मयोग्याला खरीखुरी श्रद्धांजली ठरणार आहे.

सुहास सोहोनी
विवेकानंद कॉलनी, अमरावती - ४४४६०६.
फोन न.: ९४०५३४९३५४ .