Wednesday, May 18, 2016

गांव तालाब + स्मृतीवने = पर्यावरण रक्षण व संवर्धन



प्रति ,
ग्रामसेवक /सरपंच /संबंधित विभाग अधिकारी /आमदार/खासदार /
  समाजसेवी संस्था /सेलिब्रिटीज ★★★■■★
विषय :देश के हर गांव में एक तालाब जरुरी है |
सन्माननीय महोदय ,
😊क्या हमारे गाव में एक तालाब है  ?
अगर नही है ता आजसे सोचना शुरू करे!
★★ मानवनिर्मित लक्षावधी बड़े बड़े तालाब निर्माण करना अति आवश्यक है |
  हमारे देशमे 638000  से जादा गांव है |
पानी समस्या कायमस्वरूपी सुलझाने के लिए हर गांव में तालाब .यह सोच शासन स्तर पर जरुरी है|      E क्लास जमीं पर हर ग्रामपंचायत द्वारा ५ एकर का तालाब बनाना अनिवर्य होना चाहिए |संसद में ऐसा ठराव पारित करवाना जरुरी है| तद्न्यो द्वारा सर्वेक्षण करवाना आवश्यक है |
जिससे जगह जगह पर पानी की उपलब्धी होगी ,भूगर्भ में पानी जमा होगा ,कुएं का जलस्तर निश्चित बढेगा |.
जंगल में तलाबोंकी विशेष जरूरत है ,जिस कारण वन्य पशु शहर की तरफ नही आएंगे| पेड़, पौधे,वृक्ष  .हरे भरे हो जायेंगे |
जिस तरह हमारे बैंक के बचत खाते में प्रथम कुछ रकम जमा करना आवश्यक है ,तभी हम उसमेसे कुछ रकम निकाल सकते ,उसी तरह प्रथम भूगर्भ में पानी जमा होना चाहिए तभी बादमे थोडा पानी कुए या बोअर वेल से निकला जा सकता है |
हर तालाब के किनारे प्रदेशानुरूप पौधे लगाकर स्मृतिवन निर्माण किया जाये जिसद्वारा आजतक पर्यावरण को जो नुकसान हुआ है उसमे कमी होगी |
भविष्य में कुछ साल तालाब और स्मृतिवन दोनोका सम्पूर्ण रक्षण करनेसे देश का निसर्ग चित्रसुंदर दिखेगा|  
जगह जगह पर पेड़ काटने के कारन नष्ट हुए वड ,पिंपळ ,सिसम ,कदंब, वटवृक्ष, चिंच, साग, कवीठ, बेल ,आमला , बहावा, अर्जुनवृक्ष ऐसे वृक्षो का फिरसे रोपण करना जरुरी है |
दुनियाभरमे सेलिब्रिटीज के माध्यम से जिसतरह कई कल्पना [विचार ]समझाए जाते है उसी तरह पानी समस्या *गांव तालाब + स्मृतिवन = पर्यावरण रक्षण व संवर्धन *इस सूत्र से लोगोंको अवगत करने हेतु लोकप्रिय व्यक्तिओंके प्रभाव का सदुपयोग किया जाये | सभी सेवाभावी संस्था ,प्रतिभावान जनप्रिय व्यक्ति तथा धनवान लोगोने हमारे पृथ्वी के अस्तित्व के इस सकारात्मक कार्य हेतु *पर्मनंट प्रोजेक्ट* तयार करे |गावोंको गोद लेना आवश्यक है |
वर्तमान के सभी तालाब, नाले, नदिया, बंधारे इनकी पानी क्षमता बढने हेतु साफ सफाई की जाये |
इस सकारात्मक कार्य की भविष्यमे हजारो सालो तक सराहना की जाएगी |
**गावतलाव + स्मृतिवन = पर्यावरण रक्षण व संवर्धन इस सूत्र पर कृति होना जरुरी है |
हमारे सौर मंडल में जिस ग्रह पर पानी नहीं है ,क्या वहाँ जिव सृष्टि है ?
निसर्ग कृपासे जबतक बरसात हो रही है ,तबतक पानी संवर्धन कार्य सम्पन्न हो सकता है |
                   ** हमारा भविष्य हमें बनाना है **
धन्यवाद,
आपका नम्र ,
सुहास सोहोनी,
सोहोनी कॉम्प्लेक्स ,विवेकानंद कॉलोनी अमरावती [महाराष्ट्र ] मोबा-९४०५३४९३५४
⛈⛈⛈⛈⛈⛈💥अगर आप मुझसे सहमत है तो कृपया साथ दे |★★★

Thursday, May 12, 2016

पुतळे नको

💥🙏🏽लोकोत्तर महापुरुषांचे भव्य पुतळे जागोजागी उभारले जातात पण त्याच श्रद्धेय महापुरुषांच्या नावाला साजेसा भव्य तलाव निर्माण केला गेला तर पुढील हजारो वर्षांसाठी हे सकारात्मक कार्य म्हणून जगाच्या इतिहासात नोंद होईल.
निसर्गाचे सूत्र:-
💥गावतलाव + स्मृतीवने= पर्यावरण रक्षण व संरक्षण 💥
सुहास सोहोनी
★संवेदना★
अमरावती,-६

Thursday, May 5, 2016

★★★■■★★★ प्रती , ★ग्रामसेवक/ सरपंच/ संबंधित विभाग अधिकारी /आमदार/ खासदार/ समाजसेवी संस्था/ सेलिब्रिटीज★

★★★■■★★★
प्रती ,
★ग्रामसेवक/ सरपंच/ संबंधित विभाग अधिकारी /आमदार/ खासदार/ समाजसेवी संस्था/ सेलिब्रिटीज★
विषय :◆प्रत्येक गावासाठी एक तलाव तयार करावा.◆
सन्माननीय महोदय ,
😊
●आपल्या प्रत्येकाच्या गावाला एकतरी तलाव आहे ना ?●

नसेल, तर आजच विचार करा.
★★पाण्याचे मानवनिर्मित लक्षावधी प्रचंड साठे निर्माण करा★■
★आपल्या देशात 638000 पेक्षा जास्त गांवे आहेत.
■“गाव तेथे तळे”[जलयुक्त शिवार] ही संकल्पना सरकारी पातळीवर राबविल्यास प्रत्येक गावाला पडीक जमिनीवर कमीतकमी 4 एकराचा तलाव असणे अनिवार्य ठरेल .संसदेत तसा ठराव मंजूर करून ग्रामपंचायतीला तसे स्पष्ट निर्देश द्यायला हवेत .तरच पाण्याचा प्रश्न/तुटवडा कायमस्वरूपी संपेल.
★ठिकठिकाणी पाण्याचा साठा उपलब्ध राहील.पाणी जमिनीत जिरेल व गावातील विहिरींना पाणी पाझरेल.
★जंगलात सुद्धा भरपूर तलाव हवेत.अनेक तांत्रिक प्रश्नांचा मागोवा घेऊन सर्वेक्षण करता येईल .
★ज्याप्रमाणे आपल्या बँकेच्या खात्यात प्रथम पैसे जमा करावे लागतात नंतरच त्यातील थोडे काढता येतात,तसे जमिनीत प्रथम पाणी मुरवावे आणि नंतरच त्याचा उपसा करावा ,असे वाटते .
★प्रत्येक तलावाभोवती त्या गावातर्फे “ स्मृतिवनाची “ कल्पना रुजविल्यास तलावाभोवती प्रदेशानुरूप वृक्षांची रोपे लाऊन आजपर्यंत पर्यावरणाचा जो ऱ्हास झाला आहे तो काही प्रमाणात भरून काढता येईल .
★पुढील काही वर्षे तलाव व त्याभोवतीची “स्मृतीवने” यांचे रक्षण केल्यास देशाचे “निसर्गचित्र “सुंदर दिसेल.
★अनेक कारणांनी झालेल्या वृक्षतोडीमुळे नष्ट होत चाललेले वड ,पिंपळ ,सिसम ,कदंब, चिंच, साग, कवीठ, बेल ,आवळा, बहावा, अर्जुनवृक्ष हे पुन्हा लावले पाहिजेत .
★असंख्य कल्पना मांडतांना ज्याप्रमाणे जगभरातील” सेलिब्रिटीज “च्या माध्यमातून मांडल्या जातात ,लोकप्रिय व्यक्तींच्या प्रभावाचा वापर केला जातो ,त्याप्रमाणे प्रसिध्द व्यक्तींच्या वलयाचा लाभ या कार्यासाठी व्हावा .सर्व सेवाभावी संस्था व धनवानांनी “ पृथ्वीच्या अस्तित्वाच्या या सकारात्मक कार्या साठी” परमनंट प्रोजेक्ट तयार करावेत .गाव दत्तक योजना राबवावी .
★सध्या अस्तित्वात असलेल्या अनेक दुर्लक्षित तलावांसाठी सुद्धा हा कार्यक्रम राबवता येईल .
★प्रत्येक ग्रामसभेत आपत्कालीन सभा घेऊन, या विषयावर चर्चा होऊन,पडित जमिनीवर जागा मंजूर करून, ठराव करून हे कार्य सुरु होऊ शकते ,जे पुढील अनेक शतकांसाठी सकारात्मक कार्य म्हणून देशाच्या इतिहासात नोंद होईल .
*■*गावतलाव + स्मृतीवने = पर्यावरण संवर्धन*■*हे सूत्र यशस्वी पणे वापरणे आवश्यक आहे .
★पाणीप्रश्न कायमस्वरूपी सोडवणे हि काळाची गरज आहे.हवामान खात्यानुसार यंदा राज्यात समाधानकारक पाउस होईल.
★माझी सर्व लोकप्रतिनिधींना विनंती आहे की आपसातील सर्व मतभेद विसरून परिसरातील तलाव,पाणवठे,धरणे यातील कचरा काढून, खोली वाढवून ,साठवण क्षमता वाढविण्यासाठी आपल्या निधीतील काही भाग तातडीने खर्च करावा★
■पाऊस पडत असतांनाच पाणी संवर्धनाचे कार्य होऊ शकते ,अन्यथा पाणी टंचाई अटळ आहे .
★आपल्या सूर्यमालेत ज्या ग्रहावर पाणी नाही तेथे जीवसृष्टी आहे का★?मनरेगा च्या मजुरांमार्फत हे कार्य व्हावे.
*कृपया माझ्या सूचनेचा विचार करावा .
धन्यवाद . आपला नम्र,
सुहास सोहोनी,सोहोनी कॉम्प्लेक्स ,विवेकानंद कॉलोनी अमरावती [महाराष्ट्र ] मोबा-९४०५३४९३५४
⛈⛈⛈⛈⛈⛈💥गावतलाव विषयी माझे विचार पटत असतील तर कृपया शेअर करा.⛈💥

Sunday, May 1, 2016

*बेरोजगारांचे तांडे आणि कामगार दिन *



                     * बेरोजगारांचे तांडे आणि कामगार दिन *
              भरपूर कामगार नोकरीवर ठेऊन कारखान्यात उत्पादन घ्यायचं की दिवसातले १६ -१८ तास काम करून अफाट उत्पादन देणारे यंत्र /संगणक वापरायचे !यात अखेर संगणकांचा विजय होतांना दिसतो आहे .निर्मिती क्षेत्रात प्रचंड उलथापालथ घडवणारे हे राक्षसी क्षमतेचे महागडे संगणक जणू कामगारांचे शत्रू सिध्द होत आहेत .उत्पादन प्रक्रियेतून कामगार वर्गाला कमी करणे किंवा वगळणे हे भांडवलशाही समाज व्यवस्थेचे अंतिम उद्दिष्ट असेल ,असे चित्र जिकडे तिकडे दिसते आहे .प्रत्येक उद्योग किंवा सेवा व्यवस्थापनाला शेवटी नफ्याचे गणित करावे लागणार आहे .प्रचंड उत्पादन क्षमता असलेल्या विदेशी उद्योग समूहाकडून सध्या मोठ्या प्रमाणात अनेक वस्तू आयात होत आहेत त्यांमुळे जीवघेण्या स्पर्धेला सुरवात झाली आहे ,त्याचा परिणाम म्हणजे कामगार कपात किंवा उद्योग बंद करण्यात येत आहेत .
               बेरोजगारीची समस्या दिवसेंदिवस तीव्र होत आहे ,समाजातील प्रत्येक घटक आपापल्या विचारधारेत मश्गुल आहे .विविधते बरोबर विषमता सुद्धा वाढते आहे .कुणाला कुणाचे सोयरसुतक नाही.या असंख्य हातांना काम मिळणे गरजेचे आहे .हा भविष्यातील स्थिरतेचा प्रश्न आहे .बेकारी व स्थिरतेच्या समस्येवर त्वरित विचार कार्यान्वित होणे गरजेचे आहे अन्यथा मनाचे विकार ,गुन्हेगारी ,हिंसाचार ,वाढती वाटमारी ,सामाजिक ताणताणाव असे अनेक धोके आहेत .हे प्रखर सत्य आजचे समाजशास्त्रज्ञ कसे काय विसरताहेत .सर्व समाज घटकांचा विचार करणे गरजेचे आहे . देशभर छोट्या उद्योगांचे जाळे उभारण्याची गरज आहे .
लेख संग्रह : वर्तुळाचे टोक    
लेखक : सुहास सोहोनी ,अमरावती -६