Thursday, July 26, 2012

नसावा गावात प्लास्टिकचा कचरा

          नसावा गावात प्लास्टिकचा कचरा
           खेळण्यांपासून ते यंत्रसामुग्री ,सुटे भाग ज्यापासून बनवले जातात ते प्लास्टिक ,अद्भुत जगभर मान्यता पावलेलसंशोधन .शेकडो वर्ष टिकून राहत,कुजत नाही ,सडत नाही कि गळत नाही ,आगीत जळल   तरी  वायुरूपाने आपल अस्तित्व कायम ठेवत ,"वापरा आणि फेका "या वृत्तीत काम संपले की सहजपणे" निरुपयोगी कचरा "म्हणून हेप्लास्टिक भिरकावले जाते .जगभर प्लास्टिकच्या वस्तू ,  थैल्या ,आवरणं अवतीभवती पसरते व पडून असते.रस्त्याच्या कडेने,रेल्वलाईनच्याबाजूने,मैदानात,नाल्यांमध्ये,झादाझुदुपात ,विविध पर्यटन स्थळांवर हा कचरा सहजपणे भिरकावला जातो .शेकडो वर्षाचे आयुष्यमान  लाभलेला हा कचरा साचायला लागतो ,ढीग तयार होतात आणि मग त्या कचर्याची मानवाशी निसर्गाशी लढाई सुरु होते .
            संथ गतीने सुरु असलेल्या निसर्गाच्या कार्यात हा प्लास्टिकचा कचरा सतत अडथळा आणतो .वनस्पतींची वाढ खुंटते ,शेतजमिनीची प्रत निकृष्ट होते .जनावरांच्या पोटात गेल्याने कित्येक जीव प्राणाला मुकतात  .गटारात नाल्यात साठल्याने पाणी वाहून जात नाही ,अस्वच्छता रोगराई पसरते .सहजपणे भिरकवलेला हा कचरा आपलं किती नुकसान  करतो हे त्यावेळी उमजतच नाही .आज सर्वच शहरांसाठी हा प्रश्न डोकेदुखी ठरत आहे .जागोजागी साठलेले हे ढीग आधुनिक काळातील राक्षसच आहेत .पर्यटन स्थळांवर हजारो पोटी प्लास्टिकचा कचरा गोळा केला जातो .क्यारीब्याग्ज,बाटल्या डिशेश झुडुपातून पडूनअसतात
.इतर जीव संस्कृती निसर्गाच्या जीवन चक्राला   हातभार लावतात,पण माणूस !उकिरडा निर्माण
करतो ,बेफिकीरपणे .
             काय होऊ  शकत  या प्लास्टिकच्या कचऱ्याचे ?  उकीरड्यावर फेकण्यापेक्षा हे प्लास्टिक पुन्हा कारखान्यात नेता आल पाहिजे ."प्लास्टिक  रिसायकलिंग प्लांट "निर्माण व्हावयाला  हवेत .प्रत्येक जिल्ह्यात हा उद्योग होऊ शकतो .कापडी पिशव्या सोबत बाळगण्याची सवय करून घेणे जरुरी आहे .घरातल्या बाकीच्या कचऱ्याचे खत करता येईल. प्रत्येक गावाने किंवा शहरातील प्रत्येक विभागाने प्लास्टिक कचरा साचू न देण्याचा उपक्रम राबवायला हवा.कायद्याची सक्ती करण्यापेक्षा स्वयंनिर्णय महत्वाचा. आपला परिसर नित्य स्वच्छ राहावा म्हणून "नसावा गावात प्लास्टिकचा कचरा "
        [उजळते क्षितीज -लेखसंग्रह २००७ ]
           सुहास सोहोनी ९४०५३४९३५४
         visit:www.suhassohoni.blogspot.com   


                       यांत्रिक कत्तलखान्याचे शहर --भविष्यातील  अमरावतीची नवी    
       प्रती
    मा . ---------------------
    विषय -अमरावती म. न. पा .चा प्रस्तावित कत्तल खाना रद्द व्हावा .
           सन्माननीय महोदय ,
                       आपण एक अधिकृत लोकप्रिय जनेते आहात .जनतेसाठी कल्याणप्रद अभियान आपण
     नित्य राबवीत असता.आपणास माहीतच आहे की अमरावती म. न. पा.तर्फे प्रस्तावित कत्तलखाना
      लवकरच सुरु होणार    असे कळते मुळात या यांत्कत्तलखान्याची शहर  व जिल्ह्याला खरच गरज
     आहे का ?कारण जिल्ह्यात  सध्या अधिकृत ३कत्तलखाने अस्तित्त्वात आहेत. त्यातुन्जीळ्याची
      मांसाची गरज नक्कीच पूर्ण होते .म्हणजेच ह्या  अजस्त्र यांत्रिक कत्तलखान्याचे उत्पादन निर्यातक्षम
 आहे .एवढा मोठा मांस विक्रीचा  व्यवसा  करण्यासाठी आपलेच अमरावती शहर का निवडले ?उर्वरित
 महाराष्ट्र का नाही ?या कत्तलखान्यामुळे  दररोज हजारो दुभती जनावरे नष्ट होणार आहेत .जनावरांची
चोरी फार मोठ्या प्रमाणात होणार आहे पशुधनाचा ऱ्हास म्हणजेच पर्यावरणाचा ऱ्हास .दुधाच्या उत्पादनात
 प्रचंड घट संभवते.  दुध सर्वचजनावरांची आबालवृद्धांना हवे आहे दुधाच्या बाबतीत  जात धर्म पंथ हा भेदभाव
 नसतो .पशुधन नष्ट करून कुपोषणावरकशी मात करणार ?संतांच्या,विचारवंतांच्या  इंद्रपुरी  अंबा नगरीत
 हा एक कलंक आहे .            
             नगरसेवकांच्या बहुमताने पारित झालेला कत्तल खाना रद्द चा ठराव शासनाने त्वरित विखंडीत केला 
    लोकशाहीत जनप्रतीनिधींच्या ठरावाला केराची टोपली .नगरसेवकांची किंमत शून्य .असे का?   लोकसंखेच्या ४०%
    लोकांची मांसाहार हि गरज आहे .पण आपले पशुधन नष्ट करून जगाला मांस का पुरवावे?पशुधानाद्वारे दुध
    दुधाचे पदार्थ ,औशधे,  खते असे फायदे आहेत .दारू ,सिगारेटचे कारखाने ,शिक्षण संस्था मेडिकल इंजी .कॉलेज
    यात अफाट पैसा गुंतवणारे धनाढ्य कधीही गोरक्षण आणि त्याद्वारे उभारले जाणारे विविध उद्योगात का गुंतवणूक
     करत नाहीत?कत्तल खान्याचे शहर -आशी अमरावतीची नामुष्कीची ओळख चालेल का ?  अहिंसा हा प्रत्येक
     धर्माचा मुळ गाभा आहे.भारतीय पशुधनाचे रक्षण करण्यासाठी आपणसुद्धा मनःपूर्वक करून या कत्तल खान्याला
    संपूर्ण  विरोध करावा हि विनंती या कार्यास आपले योगदान आवश्यक आहे .
     आपले नागरिक
 
           सुहास सोहोनी   ९४०५३४९३५४