Friday, April 5, 2019

दुष्काळाला no entry....

★#बोअरवेल व #विहिरींद्वारे भूजल वृद्धी हा मी स्वतः केलेला एक यशस्वी उपक्रम असून देशभर हे कार्य होणे गरजेचे आहे,अनेक ठिकाणी हा प्रयोग केल्या जात आहे .पाणी न लागल्यामुळे बंद पडलेल्या बोअरवेल साठी सुद्धा हा प्रयोग अवश्य करावा.संपूर्ण माहितीसाठी fb पेज ला भेट द्या किंवा मला फोन करावा.
#सुहास #सोहोनी
जलक्रांती अभियान,
मोबा:-9405349354
★★★★★★★★★★★★★★★★★★★★◆#दूर #हटवा #जलसंकटाला◆
●#दुष्काळाला -- #नो #एन्ट्री●
★हा फोटो माझ्या घरी असलेल्या #बोरवेल चा आहे.घरातील वापरलेले व घरातून बाहेर सोडले गेलेले पाणीआधी "मॅजिक पिट" मध्ये जमा केले जाते,नंतर नैसर्गिक पणे फिल्टर होऊन बोअरवेल मधून खोल जमिनीत साठवले जाते.
★छतावरील वाहून जाणारे व सगळे पावसाचे पाणी #फिल्टर करून शोषखड्ड्या तुन या बोअरवेल द्वारे सरळ खोल जमिनीत जाते,त्यामुळे बोरवेलचे कधीही पाणी कमी होत नाही.हा एक १००% #यशस्वी प्रयोग आहे .
★माझ्या घरातील व घराच्या आवारातील पाणी नाली /गटारात जात नाही.सरळ #जमिनीत साठवले जाते.
★याच पद्धतीने प्रत्येक हँडपम्प,हापशी तसेच विहिरींचे सुद्धा #जल #पुनर्भरण करता येते.

💥👇
● आपल्या गांवात/शहरात #पाणी #टंचाई असो किंवा नसो ,एव्हढे मात्र अवश्य करा.●
★ आपल्या घरी,सोसायटीत,कॉलनीत वा #शेतात बोअरवेल किंवा विहिर आहे का?
★किंवा आपण नवीन बोअरवेल तयार करणार आहात का ?
 तर मग *भूजलस्तर वाढवण्यासाठी
सगळ्या बोअरवेल व विहीरीचे शोषखड्ड्याद्वारे पुनर्भरण करा
जलसंकट टळेल
★ भूजल पातळी कमी झालेल्या बोरवेल साठी हा प्रयोग अत्यंत गरजेचाआहे.★

**🏵🙏please invite your facebook/WhatsApp friends to visit my facebook page        जलक्रांती अभियान . ★             
       Link : -
https://www.facebook.com/%E0%A4%9C%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A8-1805754619463612/?ti=a

अमरावती शहरात व महाराष्ट्रात अनेक गावात या प्रयोगाचे अनुकरण केले जात आहे.   -
#विचार #करा-
★आपल्याला जलसंकट दूर करायचे आहे.
 *#सुहास #सोहोनी,
#जलक्रांती #अभियान*
#जलक्रांती #चौक
विवेकानंद कॉलनी,अमरावती,     
9405349354
https://www.facebook.com/groups/542293752830502/

एक यशस्वी लढा पाण्यासाठी

■ एक यशस्वी लढा - पाण्यासाठी■
           ★एप्रिल ते जून दाहक ऊन असणार ,
नाले ,नद्या आत्ताच कोरड्या पडल्या आहेत मानवा
सोबत पशुपक्षांची पाण्यासाठी भटकंती सुरू झाली आहे. विहिरी,हँडपम्प कोरडे पडत चालले आहेत पाणी कसे मिळवावे,काय प्रयत्न करावा हीच चिंता जिकडे तिकडे जाणवते,तरीही पाणी हवे म्हणून अनेक ठिकाणी नवीन बोअरवेल खणल्या जात आहेत पर्यायाने जमिनीतील उरलेसुरले पाणी सुद्धा उपसले जाणार आहे हेही सत्य आहे .
           ★या परिस्थितीत  सुद्धा कुठूनतरी पाणी मिळवून,वापरून ते गटारात सोडले जाणार आहे.चित्र अगदी स्पष्ट आहे.पिण्यायोग्य पाणी वापरल्यानंतर गटारात सोडले की ते पाणी वाया जाणार,कुणाच्याही कामाचे राहणार नाही हे सत्य समजून घेण्याची गरज आहे.
            ★ कृपया सकारात्मक विचार करा वापरलेले पाणी नाल्यात, गटारात फेकू नका त्याऐवजी हे पाणी फिल्टर करून शोषखड्ड्याच्या माध्यमातून खोल जमिनीत साठवा,रिसायकल करा,असे केले तर दररोज करोडो लिटर पाणी जमिनीत साठेल ,आजूबाजूच्या विहीर बोअरवेल ला पाण्याची पातळी वाढेल ,जलसमस्या राहणार नाही .अवश्य विचार करा .

जलक्रांती अभियान ,लिंक : -
***https://www.facebook.com/groups/542293752830502/

सुहास सोहोनी
जलक्रांती अभियान
मोबा : - 9405349354
■ बोअरवेल बाबत काही अत्यन्त महत्वाचे ■ ★ बोअरवेल रिचार्ज करण्या पूर्वी हे अवश्य समजून घ्या व गैरसमज दूर करा.
          ★ जमिनीच्या आत जे घटक उदा.कोळसा,विविध धातू,पेट्रोलियम पदार्थ,डांबर,रॉकेल,रंगीत खडक,काळी लाल पिवळी माती/खडक रसायने जास्त असतील त्याप्रमाणे काही ठिकाणी बोरवेल च्या पाण्याला आपल्याला न आवडणारा असा रंग,चव किंवा वास असतो पण यासाठी आपण काहीही करू शकत नाही मात्र बेजबाबदार पणे व आपल्या दुर्लक्ष करण्यामुळे जमिनीवरील घाण, *दूषित पाणी ,रसायने ,विषारी द्रव्ये,कारखान्यातून बाहेर पडणारे घाण पाणी (वेस्ट) शेतात केलेली विषारी फवारणी मिश्रित पाणी ,हॉस्पिटल मधून बाहेर पडणारे सांडपाणी ,बोरवेल मधून जमिनीच्या आत खोलवर जायला नको,त्यासाठी पाणी नैसर्गिकपणे फिल्टर करा किंवा आधुनिक यांत्रिक फिल्टर चा वापर करून पाणी भूगर्भात सोडतांना सुद्धा खूप काळजी घेणे आवश्यक आहे.
       ★यावर विस्तृत लेख जलक्रांती अभियान या पेज किंवा ग्रुप वर आहे,अवश्य भेट द्यावी.

जलक्रांती अभियान ,लिंक : -
***https://www.facebook.com/groups/542293752830502/

सुहास सोहोनी
जलक्रांती अभियान