Thursday, May 5, 2016

★★★■■★★★ प्रती , ★ग्रामसेवक/ सरपंच/ संबंधित विभाग अधिकारी /आमदार/ खासदार/ समाजसेवी संस्था/ सेलिब्रिटीज★

★★★■■★★★
प्रती ,
★ग्रामसेवक/ सरपंच/ संबंधित विभाग अधिकारी /आमदार/ खासदार/ समाजसेवी संस्था/ सेलिब्रिटीज★
विषय :◆प्रत्येक गावासाठी एक तलाव तयार करावा.◆
सन्माननीय महोदय ,
😊
●आपल्या प्रत्येकाच्या गावाला एकतरी तलाव आहे ना ?●

नसेल, तर आजच विचार करा.
★★पाण्याचे मानवनिर्मित लक्षावधी प्रचंड साठे निर्माण करा★■
★आपल्या देशात 638000 पेक्षा जास्त गांवे आहेत.
■“गाव तेथे तळे”[जलयुक्त शिवार] ही संकल्पना सरकारी पातळीवर राबविल्यास प्रत्येक गावाला पडीक जमिनीवर कमीतकमी 4 एकराचा तलाव असणे अनिवार्य ठरेल .संसदेत तसा ठराव मंजूर करून ग्रामपंचायतीला तसे स्पष्ट निर्देश द्यायला हवेत .तरच पाण्याचा प्रश्न/तुटवडा कायमस्वरूपी संपेल.
★ठिकठिकाणी पाण्याचा साठा उपलब्ध राहील.पाणी जमिनीत जिरेल व गावातील विहिरींना पाणी पाझरेल.
★जंगलात सुद्धा भरपूर तलाव हवेत.अनेक तांत्रिक प्रश्नांचा मागोवा घेऊन सर्वेक्षण करता येईल .
★ज्याप्रमाणे आपल्या बँकेच्या खात्यात प्रथम पैसे जमा करावे लागतात नंतरच त्यातील थोडे काढता येतात,तसे जमिनीत प्रथम पाणी मुरवावे आणि नंतरच त्याचा उपसा करावा ,असे वाटते .
★प्रत्येक तलावाभोवती त्या गावातर्फे “ स्मृतिवनाची “ कल्पना रुजविल्यास तलावाभोवती प्रदेशानुरूप वृक्षांची रोपे लाऊन आजपर्यंत पर्यावरणाचा जो ऱ्हास झाला आहे तो काही प्रमाणात भरून काढता येईल .
★पुढील काही वर्षे तलाव व त्याभोवतीची “स्मृतीवने” यांचे रक्षण केल्यास देशाचे “निसर्गचित्र “सुंदर दिसेल.
★अनेक कारणांनी झालेल्या वृक्षतोडीमुळे नष्ट होत चाललेले वड ,पिंपळ ,सिसम ,कदंब, चिंच, साग, कवीठ, बेल ,आवळा, बहावा, अर्जुनवृक्ष हे पुन्हा लावले पाहिजेत .
★असंख्य कल्पना मांडतांना ज्याप्रमाणे जगभरातील” सेलिब्रिटीज “च्या माध्यमातून मांडल्या जातात ,लोकप्रिय व्यक्तींच्या प्रभावाचा वापर केला जातो ,त्याप्रमाणे प्रसिध्द व्यक्तींच्या वलयाचा लाभ या कार्यासाठी व्हावा .सर्व सेवाभावी संस्था व धनवानांनी “ पृथ्वीच्या अस्तित्वाच्या या सकारात्मक कार्या साठी” परमनंट प्रोजेक्ट तयार करावेत .गाव दत्तक योजना राबवावी .
★सध्या अस्तित्वात असलेल्या अनेक दुर्लक्षित तलावांसाठी सुद्धा हा कार्यक्रम राबवता येईल .
★प्रत्येक ग्रामसभेत आपत्कालीन सभा घेऊन, या विषयावर चर्चा होऊन,पडित जमिनीवर जागा मंजूर करून, ठराव करून हे कार्य सुरु होऊ शकते ,जे पुढील अनेक शतकांसाठी सकारात्मक कार्य म्हणून देशाच्या इतिहासात नोंद होईल .
*■*गावतलाव + स्मृतीवने = पर्यावरण संवर्धन*■*हे सूत्र यशस्वी पणे वापरणे आवश्यक आहे .
★पाणीप्रश्न कायमस्वरूपी सोडवणे हि काळाची गरज आहे.हवामान खात्यानुसार यंदा राज्यात समाधानकारक पाउस होईल.
★माझी सर्व लोकप्रतिनिधींना विनंती आहे की आपसातील सर्व मतभेद विसरून परिसरातील तलाव,पाणवठे,धरणे यातील कचरा काढून, खोली वाढवून ,साठवण क्षमता वाढविण्यासाठी आपल्या निधीतील काही भाग तातडीने खर्च करावा★
■पाऊस पडत असतांनाच पाणी संवर्धनाचे कार्य होऊ शकते ,अन्यथा पाणी टंचाई अटळ आहे .
★आपल्या सूर्यमालेत ज्या ग्रहावर पाणी नाही तेथे जीवसृष्टी आहे का★?मनरेगा च्या मजुरांमार्फत हे कार्य व्हावे.
*कृपया माझ्या सूचनेचा विचार करावा .
धन्यवाद . आपला नम्र,
सुहास सोहोनी,सोहोनी कॉम्प्लेक्स ,विवेकानंद कॉलोनी अमरावती [महाराष्ट्र ] मोबा-९४०५३४९३५४
⛈⛈⛈⛈⛈⛈💥गावतलाव विषयी माझे विचार पटत असतील तर कृपया शेअर करा.⛈💥