Wednesday, April 6, 2016

*होऊन जाऊद्या वेगळ्या विदर्भासाठी “ सार्वमत “*

*होऊन जाऊद्या वेगळ्या विदर्भासाठी “ सार्वमत “*
वर्षनुवर्षे पुढे ढकलला जाणारा वेगळा विदर्भाचा प्रश्न पुन्हा एकदा डोक वर काढतो आहे .कधी कधी मुद्दाम एखादा विषय लोकांपुढे फेकला जातो ,जनता त्यात गुंतून जाते ,काही जुने विषय सहजच विसरले जातात.काही प्रश्न आहेत .विदर्भाला वेगळे होण्याची गरज आहे का ?वेगळा विदर्भ आर्थिक दृष्ट्या सक्षम असणार आहे एक ?बहुतांशी भाग हा खेड्यांचा असून मागासवर्गीय आहे ,विकासाचा दर कमी आहे तेंव्हा वेगळा विदर्भ झाल्यावर केंद्र शासनाकडून वेगळी मदत मिळू शकते का जी आज महा. राज्या कडून न मिळाल्यामुळे विदर्भ वंचित आहे .मुख्य म्हणजे विकासासाठी आजची नेते मंडळी का बर कमी पडली ?विदर्भातील पर्यटन,सिंचन ,शेती आणि औद्योगिक प्रकल्प स्वबळावर उभेराहून प्रगती साधू शकतील का?
विदर्भात भरपूर खनिज संपत्ती आहे ,महाराष्ट्राला वीज उपलब्ध करून दिली जाते .मोठ्या प्रमाणात जंगले आहेत .कापूस, संत्रा प्रसिद्ध आहे पण सध्या शेतीच्या अनेक समस्या आहेत .फार मोठ्या प्रमाणात मजूर वर्ग बेरोजगार आहे .पाण्याची समस्या सोडवली तर मात्र विकासासाठी नवनवीन प्रयत्नांना इथे नक्कीच वाव आहे .पर्यटन उद्योग सध्या तरी फारच दुर्लक्षित आहे .आरोग्याच्या सोई काही शहरात आहेत पण ग्रामीण भागात परिस्थिती बरी नाही ,भ्रष्टाचार आहे,गोंधळ आहे ,अनियंत्रित असून खाजगी आरोग्य सेवा [व्यवसाय ]फारच महागडा आहे .सर्व स्तरावर विकास होईल का ?वेगळा विदर्भ नेमका कुणाला हवा आहे ?नेत्यांना की बहुसंख्य जनतेला ? या प्रश्नाचेउत्तर खर तर लोकशाही प्रणालीत जनतेने ठरवायला हवे .
संपूर्ण महाराष्ट्रातील जनता [विदर्भासहित ]व नेतेगण या सर्वांनी वेगळ्या विदर्भ राज्याच्या विचार, आचार व कार्यप्रणालीत एक गोष्ट मात्र आवर्जून लक्षात घ्यावी की “ दुसऱ्या marathi भाषिक राज्य निर्मितीच्या “प्रयत्नासाठी आपण “स्वजनांशी”बोलणी करणार आहोत .एकाच परिवारातील सदस्य आपापसात निर्णय घेणार आहेत .असे वातावरण निर्माण होणे गरजेचे आहे ,तेंव्हा हिंसा,जाळपोळ ,कर्फ्यू अशा घटना कुठेही होणार नाहीत ही काळजी प्रत्येकाने घेणे गरजेचे आहे .खेळीमेळीच्या वातावरणात विदर्भाचे वेगळे राज्य व्हावे .दोन भाऊ सक्षम झाल्यावर स्वत:चा वेगळा संसार थाटतात असे व्हावे .वैदर्भीय जनतेने पुढाकार घेऊन या प्रश्नावर सर्वंकष विचार करावा .शासनाने जनतेचा विचार ग्राह्य धरावा म्हणून –होऊन जाऊद्या ,वेगळ्या विदर्भासाठी – “सार्वमत”.शांततेच्या मार्गाने विदर्भ राज्य निर्मिती झाल्यास जगभरात महाराष्ट्र मोठा होईल .
सुहास सोहोनी
विवेकानंद कॉलोनी ,अमरावती -६ मोबा:८६२६०६०६४६

बेरोजगारीचे दाहक वास्तव *

बेरोजगारीचे दाहक वास्तव *
बेरोजगारी हा एक मन अस्वस्थ करणारा विषय आहे .लहान मुले आणि वृद्ध यांना काम नाही ,त्यांची कारणे मान्य आहेत. स्त्रिया आपलंघर परिवार सांभाळतात त्यासाठी आयुष्यभर राबतात .भावी नागरिकांना लहानाचं मोठ करतात ,हेच त्या आपलं काम समजतात ,पण ज्यांच्या हातात काही काम नाही असा तरुण तरुणींचा शिक्षित वर्ग आज फार मोठ्या प्रमाणात बेरोजगार आहे ,हे सत्य काबुल करावेच लागेल .जिथे तिथे हजारो च्या संख्येने तरुण वर्ग विविध परीक्षा देतात .भरती प्रक्रियेतून जातात ,त्यामानाने नोकऱ्या फार कमी आहेत ,त्यातही प्रत्यक्ष नोकरी देतांना दिली-घेतली जाणारी लाच ! किती किडलेली व्यवस्था आहे ही ? गरजवंत अतिशय लाचार असतो पण बाकीच्या बेरोजगारांचे काय ! प्रत्येक गावात असलेली ही बेरोजगारांची फौज, नक्की काय करते याच्याशी कुणालाही कर्तव्य नाही .प्रत्येकाच्या हाताला काम मिळालेच पाहिजे यासाठी प्रशासनातर्फे मोठे मोठे प्रकल्प सुद्धा नाहीत ,जे आहेत त्यातील बरेच केवळ कागदावरच आहेत .
अफाट लोकसंख्येच्या समस्येमुळेच प्रत्येकाला रोजगार /नोकरी देणे प्रशासनाला अजिबात शक्य नाही .खाजगी उद्योग/व्यवसायात काही अंशी सोय होते पण कमी पगार असून अनिश्चितता असते .आधुनिक यंत्रांमुळे शेतीत बैल आणि मजुरांची संख्या कमी झाली ,पर्यायाने परंपरागत कुशल कारागीर सुद्धा काही प्रमाणात बेरोजगार झाले .कामाच्या आशेने शहरात आलेल्या मजुरांची अवस्था आगीतून फुफाट्यात पडल्यासारखी झाली .प्रत्येक शहरातील बेरोजगारांची संख्या कित्येक पटीने वाढली कधीमधी मिळणाऱ्या कामापेक्षा रोजची जीवनशैली जास्त खर्चिक ठरते आहे .आत्यंतिक स्पर्धा ,चढाओढ ,असह्य भाव वाढीने व्यवसाय उद्योग व्याव्स्थापनांचे आर्थिक नियोजन पार कोलमडले .अनेक ठिकाणी नाईलाजाने सक्तीची कामगार कपात लादली गेली .सुरक्षिततेला तडा गेला .कुटुंबाच्या काळजीने मन सैर भैर होऊन रोजगाराच्या शोधात केवळ वणवण सुरु असलेली दिसते .रिकामे हात आणि उद्याची काळजी माणसाला योग्य अयोग्य ,सत्य असत्य ,नीती अनीती ही सतवचने विसरावयास भाग पडतात .जगण्यासाठी कित्येकवेळा नाईलाजाने शोर्टकटची निवड केली जाते .दुबळे मन असलेला आत्महत्येची वाट पकडतो तर कुणी गुन्हेगारीची साथ धरतो .कुटुंबातील स्त्रिया आणि मुलांना मात्र दुर्दैवाचे दशावताराचे भोग भोगावे लागतात .वर्तमानातील या दाहक वास्तवाला कसं सामोर जायचं बेरोजगारांनी !प्रत्येक जिल्ह्यात अगणित लघु उद्योगांचे जाळे उभारले जाऊन प्रत्येकाला रोजगार मिळून सन्मानाच जिण जगता यावे .
सुहास सोहोनी ,विवेकानंद कॉलोनी ,अमरावती -४४४६०६ ,
मोबा: ८६२६०६०६४६ ,९४०५३४९३५४

पाण्यासाठी वाट्टेल ते |*👍

पाण्यासाठी वाट्टेल ते |*👍
पाण्याची कमतरता ही या उन्हाळ्यातील प्रमुख समस्या असणार हे सांगायला कुणीही ज्योतीषी नको.नागरिकांनी पाणी कसे सांभाळून वापरावे हे सगळे एकमेकाला सांगताहेत,ठीक आहे पण कायमस्वरूपी पाण्याचा प्रश्न सोडवणे ही खरी गरज आहे ,हे मान्य व्हायला हवे.
*बर्फाच्छादित पर्वतांवरून येणारे व पावसामुळे प्राप्त होणारे पिण्यायोग्य गोडे पाणी नदी नाल्यातून वाहत जाऊन शेवटी समुद्राच्या खाऱ्या पाण्यात मिसळते,त्यामुळे पिण्यायोग्य गोडे पाणी वाया जाते .हे जर समजते आहे तर *नद्या व पावसाचे पाणी पृथ्वीवर जागोजागी साठवायला हवे.*
*काही दिवस पाणी येणार नाही हे कळल्यावर आपण जसे घरातल्या प्रत्येक भांड्यात पाणी साठवतो ,तसे जमिनीचा उतार ,उंचसखल पणाचा अभ्यास करून, समजून घेऊन,प्रत्येक गावाजवळ तलाव निर्माण करायला हवेत.
* तलावभोवती मोठया वृक्षांची लागवड केल्यास आपोआप जंगलांची वाढ होऊन पर्यावरण संतुलन साधेल.
*पशुपक्षी जंगलातच सुखाने राहतील,शहरात येणार नाहीत,
*विहिरींना पाणी झिरपेल. *पाण्याविना जीवन अशक्य असल्यामुळे हा विषय आपल्या अस्तित्वाचा नाही का ?मग पावसाळ्यापूर्वी देशभर हा प्रकल्प सरकारी पातळीवर युद्धस्तरावर राबविण्याची गरज आहे .ही प्राथमिकता असायला हवी.
*मुख्य म्हणजे नागरिकांनी यात राजकारण आणू नये.*
*केंद्र व राज्य शासनांनी या कार्याला अग्रक्रम द्यावा.काही वर्षे सातत्याने प्रयत्न व्हावा.संबंधित अधिकारी व तज्ञ व्यक्तींनी कृपया पुढाकार घ्यावा व बिघडत जाणाऱ्या पर्यावरणाचे रक्षण करावे ही माझी कळकळीची विनंती आहे,
*वेळ कधीही गेलेली नसते,अजूनही वेळ आहे.
*शासनाने प्रत्येक गावाला पडीक जमिनीवर कमीतकमी 2 एकराचा तलाव अनिवार्य करावा.*
*असंख्य बेरोजगारांना काम मिळेल.
*हे सकारात्मक कार्य पुढील अनेक शतकांसाठी असणार आहे.
अन्यथा जनता *पाण्यासाठी वाट्टेल ते* करेल ही सार्थ भीती वाटते .
*सुहास सोहोनी
विवेकानंद कॉलोनी, अमरावती444606
मोबा:8626060646
*माझे विचार पटत असल्यास जरूर शेअर करावे.धन्यवाद.💐

* Water Resurvoirs +Memorial Gardens = Environment Protection & Rebuilding *



 *  Water Resurvoirs +Memorial Gardens   = Environment  Protection & Rebuilding  *
                      Our country is a Developing country & not a Developed country. In India,there are number of problems in peoples life ,among  them ,one major problem is lack of sufficient water .This is the big question for nation because  life without water is impossible.there is one equation LIFE  =  WATER.
                     There  are about 638356 villages in India ,we should construct the lake on unused land & this should be the priority project for their today & tomorrow .Formation or costruction of reservoirs [lakes] is the need as well as demand of our country & this activity should go through out the nation as a NATIONAL  DEVELOPMENT  PROGRAMME.We can save the existence village only by doing this .
                        Water techniciance should consider some points while selecting the land for construction of lakes,e.g.the dampness of land ,suitable climatic conditions ,rainy period of area etc.We should avoid the use of borewells.we are pumping out the precious water without refilling it .there is one simple example .firstly,we have to deposit the money in our saving bank a/c & then only we have a  right to withdraw some part of it .
                         We must insist  people about  the  thought of* MEMORIAL  GARDENS *around every lake .selection of trees for garden is obviously depends on there local climatic conditions .plantation of Indian trees such as wad ,pimpal ,kadamb,kawith,sal,sag,bahawa ,chinch ,aawala ,arjun wrukhs etc.is a need of future .plantation of such trees around the old lakes is also necessary.I am sure we can rebuilt our environment by plantation around around the lake near every village .This must  be a  honest national project.All  NGO should come ahead for this project .Weshould take steps fastly on this project because this is a battle for our EXISTANCE.
                   As per the data reports available presented by several study groups, regarding rise in temperature and increase of ice water at various mountains like Himalayas and both the poles of earth, it is known that water level at various seashore may increase which will result as disaster. At the same time drinking water ratio may lesser in near future.
          Reservoirs of Sweet water by building no. of lakes and Conservation of Forests all over the Earth must be the priority project. All Villages, Gram-Panchayat, Social Clubs like Rotary, Lions, J.C.’s and all others are humbly requested to join with this prime project.  Careing and nourishment of lakes and Forest (memory garden) up to 10 Years will definitely serve the purpose of environment, and I am sure this task will increase the beauty of our earth. Further I request to all honorable celebrities like Leaders, Personalities who have followers in masses and are famous by their devotion, Please do come forward and propagate the importance of Lakes And Forest (Memory Garden). I am confident that all-star personalities & NGO's will come together in this battle against “GLOBAL WARMING” .*Here I am impressed by one formulae that is *:BUILDING OF LAKES + MEMORY GARDEN
= PROTECTION &REBUILDING OF ENVIRONMENT.*
Suhas sohoni,Vivekanand colony,Amravati [Maharashtra]444606,
moba:9405349354