Saturday, December 10, 2011

भांडवलदारांना हवा असतो फक्‌त नफा-आणखी नफा


सुहास सोहोनी
वीकास वार्ता पुरस्कार -१९९० महा शासन,
राष्टीय एकात्मता फेलोशीप - २००५ अखील महा पत्रकार पत्रलेखक संघ,
सहसचीव डाय्बेटीक असो. इंडीया, अमरावती ,
सदस्य : महारषट्र वृत्तपत्र लेखक असोसिएशन,
please visit at : www.suhassohoni.blogspot.com
_________________________________________


भांडवलदारांना हवा असतो फक्‌त नफा-आणखी नफा 
   
       करोडो भारतीयांच्या  पोटात भरपूर किटकांचा प्रादुर्भाव झाला असा शोध लागल्यामुळे, आरोग्याच्या काळजीपोटी पवीत्र सेवाभावी वृत्तीने परदेशस्थ थंड पेयांच्या कंपनींनी थंड पेयात किडनाशकांचा वापर केला असावा काय ? आणि असे जर असेल तर आपण मात्र......... मुख्‌य म्हणजे किटकनाशकांचे प्रमाण जास्त असण्यावर आक्षेप आहे.  दररोज आमच्या पोटात किती विषारी द्रव्य कणाकणांनी जात आहे याबाबत आम्ही खरोखर अज्ञानी आहोत.  पण याहीपेक्षा महत्वाचे म्हणजे काही राज्यांनी या बहुराष्ट्रीय कंपन्यांना म्हणे विक्रीकरात करोडो रूपयांची सवलत देण्याच पवित्र कार्य केल आहे.

           आता महीने न महीने समिती वगैरे नेमुन भारतीय जनता आपला  विस्मरणाचा हक्क बजावण्यास मोकळी  आहेच. पाश्चिमात्यांचे गोडवे गाण्याचा आपला  परिपाठ असतांना त्यांना एकदम गुन्हेगार वगैरे कसं काय म्हणायचं ? याच राक्षसी प्रमाणात उत्पादक असणार्या बहुराष्ट्रीय  परदेशस्थ कंपन्या भारतामधे टाचणी पासुन तर विमानापर्यंत सगळ्या वस्तू व सेवा घरपोच आणुन देणार आहेत, आणि आपल्याला  फक्त उपभोग घेण्याचं काम करायचं आहे, अशा शेकडो कंपन्यांच्या मदतीने आपल्या देशात एक्सप्रेस हायवेज, उड्डाण  पुल, संगीत उद्याने, मोटारी, इंटरनेट, फास्ट  हॉटेल्स खाण्यापिण्याच्या सगळ्या  वस्तु मिळणार आहेत.  एक नवा स्वर्ग इथे अवतरणार आहे.  तुमच्याजवळ पैसे नसतील तर प्रॉपरटी गहाण ठेवून या कंपन्या भरपूर कर्ज ही देणार आहेत.  त्यांना इथे कायम व्यवसाय करायचा आहे.  भांडवलदारांना फक्त हवा असतो नफा आणखी नफा.  श्रीमंतांना व्हावयाचं असतं आणखी श्रीमंत.  या देशातल्या मुठभर 10 टक्के श्रीमंतांना या मानवयोनीतील  मिळालेल्या जीवनाचा आनंद उपभोगायचा आहे.   उरलेल्या 90 टक्के गरीबांचा विचार किती काळ , कोणी करावा?  गरिब वगैरे जर कोणी असतील तर त्यांनी सुद्धा झटपट श्रीमंत व्हावं आणि याच जीवनात सगळा उपभोग घेवून टाकावा हे पाश्चात्य तत्वज्ञान इंटरनेट मार्केटिंग सारख्या नवतंत्रात घरोघरी शिकवल जात आहे.
    विदर्भात कापुस पिकत असतांना घरोघरी हातमाग का नाहीत ?  विदर्भात संत्रा पिकत आसतांना संत्राज्युस, संत्र्याचे अनेक पदार्थ का नाही बनत ?  भारतात ठिकठिकाणी उपलब्ध असलेल्या कच्च्या माला पासून त्याच विभागात कारखाने का नाही चालत ?  करोडो हातांना काम का नाही?  सुरक्षीत नोकर्या मधून कामगार का काढले जात आहेत ?  प्रश्न अनेक आहेत आणि जनतेनेच त्यांचा वेध घ्यायचा आहे.

           -------------0--------------------0--------------0---------------------0--------------------


सुहास सोहोनी
विवेकानंद कॉलोनी, अमरावती ४४४६०६
फोन : ०७२१-२५६७४६३, ९४०५३४९३५४.

 

व्यवस्थेने आत्मचिंतन करण्याची गरज


सुहास सोहोनी
वीकास वार्ता पुरस्कार -१९९० महा शासन,
राष्टीय एकात्मता फेलोशीप - २००५ अखील महा पत्रकार पत्रलेखक संघ,
सहसचीव डाय्बेटीक असो. इंडीया, अमरावती ,
सदस्य : महारषट्र वृत्तपत्र लेखक असोसिएशन,
please visit at : www.suhassohoni.blogspot.com
_________________________________________

व्यवस्थेने आत्मचिंतन करण्याची गरज
 
       ना होगा कोर्ट, ना मिलेगी तारीख और ना होगी सुनबाई. सिधा उपर भेज दूंगा ।  नायकाच्या तोंडी शोभुन दिसणारे टाळ्या हमखास मिळवणारा प्रेक्षकांच्या पसंतीचा हा डायलॉग नागपूरच्या आतंकाग्रस्त १०० -१५० च्या जमावाने भर कोर्टात पोलीस आणि वकीलाच्या साक्षीने एका कुख्‌यात गुन्हेगाराला यमसदनास पाठविले. तडीपार असलेला गुन्हेगार सतत मोहल्यात येतो. नित्य जबरी गुन्हे करतो. नागरीक आतंकित आहेत, त्रस्त आहेत.  न्यायाची वाट न पाहता, पुर्ण विचार करून पुर्णनियोजित पद्धतीने त्या गुन्हेगाराला संपवले जाते.  संपुर्ण पणे दोषी ठरलेल्या ज्ञात गुन्हेगाराला शिक्षा देण्याकरीता १०० च्या वर नागरीकांनी शस्त्र हाती धरावे ? ज्या पद्धतीने ही घटना घडली. त्या वेळी जास्त दु:खद घटना घडली आहे की १००  ते १५०  नवीन गुन्हेगारांनी जन्म घेतला.

         जगात सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतवर्षाचा न्यायपालीकेवर असीम विश्वास आहे. न्यायसंस्था ही सर्वोच्य आहे आणि ती आदरणीय राहिलीच पाहिजे, ही जबाबदारी आहे लोकशाहीचा पुरस्कार करणार्यांची निरनिराळी पद भूषवित मिरवणार्यांची. जनतेचे रक्षक असणारा पोलीस विभाग आणि शासनाचे सर्व घटक यांनी आपापली जबाबदारी वेळच्यावेळी पार पाडणे ही गोष्ट सर्वांच्या भल्यासाठी अत्यावश्यक बाब आहे. दुष्टांच निर्दालन करण्यासाठी जनता जनार्दनाला कायदा हातात घ्यावा लागतोय हे संकेत निश्चीतच धोकादायक आहेत.  व्यक्ती स्वातंत्र्याचा आनंद उपभोगीत असतांना गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांसाठी कायद्याची कठोर पकड हवीच.  कायदा आणि त्याचे रक्षक यांचा धाक कमी होत चालला आहे.  ही गोष्ट अशा घटनांवरून सिद्ध होते आहे. कायदेशीर कार्यालयीन कामाला वेग देवून दोषी व्यक्तींवर लवकर कारवाई होणे गरजेचे आहे. कायद्याच्या त्रुटीचा लाभ जेव्हा सराईत गुन्हेगारांना मिळतो तेव्हा त्रस्त असलेल्या जनतेचा राग अनावर होतो ही मानसीकता लक्षात घेणे आवश्यक आहे. बेसुमार वाढत चाललेली लोकसंख्या, शिक्षित बेरोजगारांचा खदखदणारा असंतोष आणि भौतिक सुखाची लालसा यातुन गुन्हेगारी प्रवृत्ती प्रबळ होईल यात नवल नाही.  सुदृढ लोकशाहीच्या उज्वल भविष्यासाठी न्यायदेवतेवर भारतीयांचा पुर्ण विश्वास हवा, यात तडजोड नाही करता येणार. जनसमुहाद्वारे केल्‌या गेलेल्या हिंसेच्या उद्रेकाच समर्थन होऊच शकत नाही. गरज आहे ती प्रस्थापित व्यवस्थेने आत्मचिंतन करण्याची. ( लेख संग्रह - वर्तुळाचे टोक - लेख क्रमांक २८ )

सुहास सोहोनी
विवेकानंद कॉलोनी, अमरावती.

फोन : ०७२१-२५६७४६३, ९४०५३४९३५४.