Tuesday, October 18, 2016

असा मोर्चा असावा

💥एक अतिभव्य ,महामोर्चा मला काढायचा आहे.
सर्वच भारतीयांना आग्रहाचे आमंत्रण आहे.
★प्रत्येकाने मनाने व कृतीने या महामोर्चात सामील व्हायचं आहे.कन्याकुमारी ते श्रीनगर आणि जगन्नाथ पुरी ते पोरबंदर असा भारतभर करोडो भारतीयांचा अतिभव्य महामोर्चा सुरु होत आहे
■या महा मोर्च्यात मागण्या आणि घोषणा आहेत : -
★जीवनावश्यक वस्तूंची भाववाढ थांबवा . ★शेतकरी वाचवा .
★ प्रदूषण नष्ट करा (परिसराचे व मनाचे) ★भ्रष्टाचार मुक्त भारत.
★ कायद्याचे पालन व्हावे,लवकर (अविलंब)न्याय मिळावा.
★ प्रत्येकाला शिक्षण
★ प्रत्येकासाठी दर्जेदार आरोग्यसेवा हवी. ★जातीभेद नष्ट करा.
■ करोडो भारतीयांना रोज या मोर्च्यात यायचं आहे.
■सारे भारतीय एक झाले तर काहीही अशक्य नाही.
◆स्वागत आहे◆
◆आजपासून आणि आत्तापासून हा महामोर्चा सुरु झाला आहे.
■ शुभकार्यासाठी मुहूर्ताची गरज नाही ■ * सुहास सोहोनी
★संवेदना★
[ सामाजिक विचार मंच] ,
अमरावती

💥अन्नाचा आदर करावा💥

                                               💥अन्नाचा आदर करावा💥
               ★अन्न वाया जाणे म्हणजे नक्की काय हे आजकाल मोठमोठ्या जेवणावळींच्या ठिकाणी नित्य पहावयास मिळते.अर्धवट खाऊन सोडून दिलेलं अन्न थाळीमध्ये पडलेलं असतं .जेवणात बदल हवा म्हणून हॉटेलमध्ये जेवतांना अनेक पदार्थ मागवायचे,हवं तेवढं खाऊन बाकीच टाकून दिलं जातं. वाया जाणाऱ्या एवढ्या अन्नात कितीतरी उपाशी परिवार भरपेट जेवले असते.
           ★अन्न हे पूर्ण ब्रम्ह असून पानात घेतलेले सगळे पदार्थ खाल्लेच पाहिजे ही सक्तीची शिकवण आजच्या पिढीला दिली जाते की नाही ? कच्या बच्यांसाठी दररोज अन्नाची सोय करतांना ८०% जनता अक्षरशः जीवाचं रान करते. मोलमजुरी,काबाडकष्ट करून आपल्या अन्नाची सोय करणारे एकीकडे कायम चिंताग्रस्त असतात तर अन्नाची किंमत नसलेले अंगात माज आल्यासारखे अन्नाची नासाडी करतात . इतके अन्न वाया जातांना पाहून हे अस्वस्थ नाही होत ? किती विरोधाभास आहे हा ! ★ लहानपणी मुलांना एका दयाळू राजाची गोष्ट सांगितली जाते.त्या राजाला आपल्या प्रजेची मनापासून काळजी होती .माझ्या राज्यात एकही नागरिक उपाशी झोपू नये यासाठी त्याचे सतत लक्ष असे .प्रजा सुखी,आनंदी व सुरक्षित राहण्यासाठी तत्पर असणे हेच राजाचं कर्तव्य आहे ,अस त्या राजाचं मत होतं. ★भविष्यात असे दयाळू राज्यकर्ते असतील ? ?
          ★गरजेपेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्या व कमी श्रमात अती श्रीमंत असणाऱ्या २०% जनतेला अन्न मिळवण्यासाठी काबाडकष्ट करावे लागत नाहीत हे मान्य आहे पण अन्नाची किंमत सुद्धा समजू नये याचं फार वाईट वाटतं . आपल्या शरीराचं सुयोग्य पोषण करणाऱ्या अन्नाचा आदर करण्याची शिकवण बालपणीच देण्याची गरज आहे .अन्नाचा आदर करावा. लेखसंग्रह :घे उंच भरारी. (2016) लेखक : सुहास सोहोनी
अमरावती
मोबा : 8626060646

Monday, October 10, 2016

■सावध रहा ,रात्र वैऱ्याची आहे■

■सावध रहा ,रात्र वैऱ्याची आहे■ 💥युद्धासाठी जनतेचे संपूर्ण सहकार्य लागतं, एकमेकांवर विश्वास हवा,युद्ध केवळ सैनिकच नाही, तर अवघ्या देशाला लढावं लागतं, जनतेच्या विश्वासावर सैनिकी ताकत वाढत असते,देशाबाहेरील प्रत्यक्ष शत्रूपेक्षा देशातील देशविरोधी कारवाया करणारे ,जनतेच्या मनोधैर्यावर वार करणारे जास्त धोकादायक असतात. दुर्दैवाने असे देशात बरेच लोक आहेत आणि ते बुद्धीजीवी,लोकनेते, खेळाडू ,लेखक,पत्रकार, राष्ट्रीय पुरस्कार विजेते,भडकवलेले दुखावलेले वाहवत गेलेले तरुण असेे महत्वाचे लोकं आहेत.ह्यांच्याकडे लक्ष देणे हे युद्धापेक्षा जास्त महत्वाचे आहे,अर्थात सैन्याला या गोष्टी समजतात .युद्ध काळात असंतुष्ट आणि भ्रष्टाचारी लोकांच्या शोधात शत्रू असतो हे कुणी सांगायची गरज नाही .मला वाटतं आजची ही वेळ एकी सिद्ध करण्याची आहे ,आपण सुज्ञ आहात. ★सावध रहा ,रात्र वैऱ्याची आहे★ सुहास सोहोनी

💥देशापुढे सगळे दुय्यम आहेत💥

💥देशापुढे सगळे दुय्यम आहेत💥
★जबाबदार सेलिब्रिटी,नेते ,राजकीय प्रतिस्पर्धी असलेले लोकं, आपल्याच सैन्याच्या पाकिस्तान विरुद्ध च्या अतिमहत्वाच्या कारवाई बद्दल जाहीर शंका उपस्थित करतात,प्रेस/चॅनलवर तावातावाने चर्चा किंवा वाद घालतात,अनेक मान्यवर म्हणवणारे त्यांच्या बेताल,उर्मट व्यक्तव्याचे समर्थनही करतात ,हे दुख:दायक आहेच,पण त्यापेक्षा जास्त धोकादायक आहे.
★सध्या युद्धजन्य परिस्थिती असून आपण कदाचित दीर्घकाळ चालणाऱ्या त्रासदायक युद्धाच्या दिशेने सरकतो आहोत. अशावेळी सैन्याच्या गुप्त हालचाली बद्दल,देशाच्या निर्णया बद्दल, संभ्रम निर्माण होईल असे विचार पसरवणे,जनतेत वैचारिक दुही ,फूट पाडणे,शासनाला/सैन्याला दोषी ठरवणे हा अक्षम्य गुन्हा आहे.या गुन्ह्याला क्षमा नाहीच.
★आपल्या विचारांनी, कृतीने असे लोकं शत्रूचाच फायदा करतात.सैनिक नेहमीच डोळ्यात तेल घालून सीमेचे रक्षण करतात त्यामुळेच आम्ही सुखानं झोपू शकतो.आरामात सगळ्या प्रकारचे उपभोग घेत असतो.मात्र युद्धात सैनिक आणि नागरिक दोघेही शत्रूशी लढत असतात.त्यांचा एकमेकांवर १००% विश्वास असतो.हा विश्वास आजही आहेच ,संपूर्ण देश सैन्या सोबत आहेच . ★काही नतद्रष्ट ,देशविरोधी ,सोय व वेळ साधून स्वार्थ साधणारे, शत्रूला कळत नकळत मदत पोह्चवणारे दळभद्री लोकं दुर्दैवाने प्रत्येक कालखंडात असतातच.त्यांना शोधून निष्क्रिय करणे जरुरी आहे,कारण हा देशाच्या हरण्या जिंकण्याचा प्रश्न आहे,देशाच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे .युद्धात झालेलं नुकसान हे कायमचं नुकसान असतं.
★शत्रूशी सीमेवर लढतांना सैन्याला देशांतर्गत विरोधी कारवाया करणारे/देशविरोधी कृती करणारे ,गैरसमज पसरवणारे ,यांच्या विरोधात सुद्धा लढावे लागणार आहे.अन्यथा शत्रूपेक्षा हे लोकं जास्त धोकादायक आहेत. ●हे युद्ध सीमेच्या बाहेर तर लढावे लागणार आहेच पण देशाच्या आत देशद्रोह्यांशी सुद्धा लढावं लागणार आहे,● ■पण देश महत्वाचा.■
💥देशापुढे सगळे दुय्यम आहेत.💥 सुहास सोहोनी
★संवेदना★
(सामाजिक विचार मंच)
अमरावती - ६