Tuesday, August 21, 2012

स्वाक्षरी मोहिमेत संघटीत व्हा

           *  महाराष्ट्र वृत्तपत्र लेखक असोसिएशन  च्या   स्वाक्षरी मोहिमेत संघटीत व्हा *
              अमरावती म .न .पा .द्वारा निर्माणाधीन असलेला कत्तल खाना रद्द करावा
*अमरावती म. न. पा.चा प्रस्तावित कत्तलखाना हा संतांच्या, 
विचारवंतांच्या अम्बानगरीला एक कलंक असणार आहे .
*या कत्तलखान्यात दररोज मोठ्या प्रमाणात हजारो दुभती जनावरे नष्ट होणार आहेत .
*गाई ,म्हशीचे दुध सर्वच आबालवृद्धांना हवे आहे.
दुधाच्या बाबतीत जात ,पंथ,धर्म हा भेदभाव नाही .
*2005 साली म.न.पा. च्या आमसभेत "कत्तलखाना रद्द"  चा ठराव बहुमताने पारित झाला होता .
*तत्कालीन म न पा आयुक्तानी" कत्तलखाना रद्द ठराव "विखंडीत करावा असा प्रस्ताव शासनाला दिला. शासनाने हा प्रस्ताव त्वरित मंजूर केला.
*महाराष्ट्र प्रदूषण मंडळाने "कन्सेट टू एसट्याब्लीष" असा परवाना  दिला. काम पूर्ण झाल्यावर "कन्सेट टु ओपरेट"असा परवाना दिला जाईल .
*कत्तलखान्याचे उत्पादन निर्यातक्षम करण्याचे प्रावधान आहे .
*कत्तलखान्यासाठी आपले अमरावती शहरच का निवडले ? उर्वरित महाराष्ट्र का नाही ?
*नगरसेवकांनी ठोस निर्णय घेऊन कत्तलखाना रद्द करण्याचा प्रस्ताव पुन्हा ठेवावा व पारित करावा .
*या मोहिमेसाठी जिल्ह्यातील 10 लाख नागरिकांनी एकत्रितपणे संघटीत व्हावे .
*बहुसंख्य नागरिकांचा लिखित विरोध असेल तर कायदेशीर मार्गाने, सनदशीर पद्धतीने, कायदेशीर सल्याप्रमाणे शांतता व अहिंसेच्या मार्गाने कत्तलखाना रद्द करता येईल .
*अम्बानगरीच्या सुज्ञ नागरिकांनी निर्णय घेण्याची वेळ आली आहे.
एकदा सुरु झालेला कत्तलखाना बंद करता येणे शक्य नाही .
*राष्ट्रसंतांच्या पावन अम्बानगरीत हा कत्तलखाना सुरु होऊ देणार का?
*निर्णय जनतेच्या कोर्टात आहे .
*  "कत्तलखान्याचे शहर "अशी नामुष्कीची,दुर्दैवी ओळख अमरावतीकरांना हवी आहे का?
* **************  स्वाक्षरी  मोहिमेत संघटीत व्हा .***************
*************** महाराष्ट्र वृत्तपत्र लेखक असोसिएशन ***************

चाळीशीतील मृत्यू

चाळीशीतील  मृत्यू 

            जीवनाची गाडी जन्मापासून असंख्य नागमोडी वळणे घेत घेत, अनेक चढउतार पार करीत शेवटी मृत्यूच्या थांब्यावर थांबते.  फक्त हे स्टेशन केव्हा येणार ही गोष्ट  ते आल्यावरच कळते आणि जेव्हा कळतं तेव्हा उशीर झालेला  असतो.  आयुष्यभर धडधडणारे हृदयाचे  इंजिन बंद पडते,  आणि काही केल्या पुन्हा सुरू होत नाही.  निसर्गातील  प्रत्येक वस्तु व जीवन नाशवंत आहे.  नव्याची उत्पत्ती व जुन्याचा नाश हे निसर्गतत्व आहे.  नाश केव्हा व्हावयाचा ते मात्र कुणाला  माहित नाही.  प्रत्येकाचं हे भविष्य काळाच्या लिफाफ्यात बंद केलेलं  आहे.  वेळ आली  की लिफाफा उघडतो.  मृत्यू हे जीवनाचं अंतिम सत्य आहे.  पण तरीही काही प्रसंग जीवाची कालवाकालव करतात व विचार करायला  लावतात.
    बाह्यता पूर्ण धडधाकट दिसणारा माणूस वय वर्ष फक्‌त बेचाळिस,  जो दैनंदिन जीवनात पूर्ण व्यग्र आहे, ज्याच्यावर अनेक जबाबदाऱ्या  आहेत,  तो अचानक छातीत दुखायला  लागून काही उपचार मिळायच्या आत मृत्यूला  शरण जातो,  ही घटनाच मन सुन्न करणारी आहे.  निरनिराळे  आजार किंवा अपघाताने जीवन संपुष्टा त येते हे मान्य पण ऐन चाळीशीत हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने येणारा मृत्यू ही आपल्या आरोग्याच्या बाबतीत विचार करायला  लावणारी घटना आहे.  सर्व विकारांमध्ये जशी आधीपासून लक्षणे दिसतात तसेच हृदयविकारात ठराविक लक्षणे नक्कीच दिसतात.  पण बऱ्याच वेळा  धडधाकट दिसणारा माणूस त्या धोक्याच्या लक्षणांकडे सहज दुर्लक्ष   करतो, ज्याप्रमाणे आगगाडी स्टेशनवर येण्याआधी अनेक संदेश येतात,   बेल  वाजते.  आऊटर सिग्नल  दिला  जातो.  गाडी येत असल्याची सुचना दिली    जाते.  तसेच आपले  शरीर रोगांची लक्षणे दाखवून आपल्याला  संदेश देत असते.  हे संदेश आपण ओळखू शकत नाही किंवा आप्तस्वकीय चिंता करतील  म्हणून त्यांना सांगत नाही, किंवा सहजतेने त्याकडे दुर्लक्ष  करतो.
              वयाची चाळीशी हा आयुष्यातील  महत्वाचा टप्पा असतो.  त्यावेळी  नोकरी व्यवसायात स्थिरता येत असते.  नवीन सामाजिक जबाबदाऱ्या  पेलण्यास अनुभवी मन सक्षम असतं.  लग्न  होऊन बारा ते पंधरा वर्षाचा काळ  लोटलेला  असतो.  चिमुकल्यांचे लाड करण्यात व त्यांचे बोबडे बोल  ऐकण्यात वेळ  आनंदात जात असतो.  भविष्यातील  रम्य स्वप्ने बघण्यात आणि ती प्रत्यक्षात उतरविण्यात हे वय मग्न  असते.  पण हीच वेळ  स्वत:च्या आरोग्याची काळजी घेण्याचीही असते.  काळजी करणे म्हणजे घाबरणे नसून स्वत:ची आरोग्यविषयक माहिती करून घेणे, असा अर्थ आहे.
    बऱ्याच वेळा  ह्रुदयविकाराच्या तीव्र झटक्‌याचे "ओव्‌हरवेट' किंवा "हार्ट ब्लॉक  'हे कारण सांगीतले   जाते.  अनावश्यक वाढलेलं  वजन कमी केल्याने आपण असे गंभीर विकार टाळू  शकतो काय ?  हा विचार प्रत्येकाने अंतर्मुख होऊन करावा.  वाढलेली  चरबी, कमी किंवा जास्त असलेला  रक्तदाब योग्य प्रमाणात आणणे यासाठी वेळीच करावी लागणारी उपाययोजना स्वत:करीता तसेच आपल्यावर अवलंबून असणाऱ्या  सर्वांच्या करीता फार महत्वाची आहे.  एखादा रोग मुळात होऊच नये म्हणून काळजी घेणे केव्हाही  योग्यच आहे .

  **  वर्तुळाचे टोक [मराठी लेखसंग्रह 2005]
        सुहास  सोहोनी 9405349354
        www.suhassohoni.blogspot.com


वयाची चाiीशी हा आयुष्‌यातीb महत्वाचा टप्‌पा असतो.  त्यावेiी नोकरी व्‌यवसायात स्थिरता येत असते.  नवीन सामाजिक जबाबदाèया पेbण्यास अनुभवी मन सक्षम असतं.  b¾ होऊन बारा ते पंधरा वर्षाचा काi bोटbेbा असतो.  चिमुकल्‌यांचे bाड करण्यात व त्यांचे बोबडे बोb ऐकण्यात वेi आनंदात जात असतो.  भविष्‌यातीb रम्य स्वप्‌ने बघण्यात आणि ती प्रत्यक्षात उतरविण्यात हे वय म¾ असते.  पण हीच वेi स्वत:च्‌या आरोग्याची काiजी घेण्याचीही असते.  काiजी करणे म्हणजे घाबरणे नसून स्वत:ची आरोग्यविषयक माहिती करून घेणे असा अर्थ आहे.
    बèयाच वेiा öदयविकाराच्‌या तीव्र झटक्‌याचे "ओव्‌हरवेट' किंवा "हार्ट ब्‌bॉक 'हे कारण सांगीतbे  जाते.  अनावश्यक वाढbेbं वजन कमी केल्‌याने आपण असे गंभीर विकार टाiू शकतो काय ?  हा विचार प्रत्येकाने अंतर्मुख होऊन करावा.  वाढbेbी चरबी, कमी किंवा जास्त असbेbा रक्‌तदाब योग्य प्रमाणात आणणे यासाठी वेiीच करावी bागणारी उपाययोजना स्वत:करीता तसेच आपल्‌यावर अवbंबून असणाèया सर्वांच्‌या करीता फार महत्वाची आहे.  एखादा रोग मुiात होऊच नये म्हणून काiजी घेणे केव्‌हा
    वर्तुळाचे टोक [मराठी लेखसंग्रह 2005]
    सुहास  सोहोनी 9405349354
    www.suhassohoni.blogspot.com

समाजातील त्रिदोषामुळे वाढतयं कुपोषण

            *    समाजातील  त्रिदोषामुळे  वाढतयं कुपोषण   *
-------------------------------------------------------------------
                       नदीचं मुळ  आणि ऋषीचं कुळ शोधणे महाकठीण काम असल  तरी सध्या वर्षानुवर्षे गाजत असलेल्या कुपोषणाचं मुळ  कारण म्हणजे खुप अंधश्रद्धा, बेरोजगारी, अज्ञान आणि कुटूंबनियोजन योजनेचा बट्ट्याबोळ , हेच आहे.  मध्यम वर्गीयांना  आपल्या एक किंवा दुसऱ्या  मुलाचं भवितव्य सुरक्षित करतांना प्रचंड कसरत करावी लागते, तिथे पाच, सहा मुलां पेक्षा जास्त अपत्ये  असणाऱ्या  दुर्गम प्रदेशात राहणाऱ्या ,  फारसा रोजगार उपलब्ध नसलेल्या, गरीब कुटूंबामध्ये कुपोषित बालके आढळणे स्वाभाविक आहे.  दररोजच्या रोजगार मिळण्याच्या चिंतेत असणाऱ्या  कुटूंबाला , आपल्या, इतक्या जास्त प्रमाणात असलेल्या अपत्या कडे लक्ष दयायला , संगोपन करावयाला  वेळ , पैसा असेल  ?
                गडचिरोली  व मेळघाट सारख्या रमणिय परिसरात निसर्गाने जरी भरभरून दान दिले  असले  तरी अंधश्रद्धेच्या जिवघेण्या दलदलीत तिथले  जिवन फसलेल  आहे.  ज्ञानाच्या अभावामुळे  अंधश्रद्धेच्या जाळ्यात माणसाचा मेंदू बधीर झाला  आहे.  त्यासोबत अस्वच्छता, जिवाणूचा संसर्ग अशी अनेक महत्वाची कारणें कुपोषणाला  मदत करीत आहेत.  अज्ञानी आणि कुपोषीत मातेच्या पोटी जन्म घेणारं बाळ  जन्मत: कुपोषित असण्याची शक्यता जास्त आहे.  जन्मानंतर जीवन जगण्यासाठी त्या बाळाला  हवा आहे  पौष्टिक आहार, स्वच्छ संसर्ग विरहीत निवास, योग्य औषध उपाय योजना , पण सर्वात महत्वाचे म्हणजे नित्यनियमीत लक्ष देणारी, बाळाला  मायेची उब देवून संरक्षण देणारी ज्ञानी माता.  बेरोजगाराच्या झंझावातात सापडलेल्या कुटूंबातील  या मातेला  बाळा च्या संवधर्नासाठी, प्रेम देण्यासाठी निश्चींत असा वेळ  आहे ? प्रसुती पुर्व काळात योग्य औषधी किंवा अन्नाद्वारे जीवनसत्वे व उष्‌मांक मातेला  न मिळाल्यामुळे  त्या बाळाचे निट पोषण होत नाही व जन्मत:च बाळाचे वजन कमी असल्यामुळे  कुपोषणाचा धोका वाढतो.  जन्मानंतर बाळाच्या संगोपनात अक्षम्य हेळसांड झाल्यामुळे  टप्याटप्‌प्याने कुपोषणाचे गांभीर्य वाढते.  प्रतिकार शक्‌ती क्षीण झाल्याने ऋतूमानातील  छोटे बदल  ते बाळ  सहन करू शकत नाही व रोगग्रस्त राहते.
                अफाट जनसमुह असलेल्या या भारत देशात आदीवासी बहुल  प्रांतात एक मोठा समाज घटक कुपोषणाच्या समस्येत त्रस्त आहे.  कुटूंब नियोजन या विषयात उदासीन असलेले  हे आमचे भाईबंद बेरोजगारीच्या वणव्यात खरपूस भाजले  जात असतांनाच कधी कोरडा दुष्‌काळ , नापीकी आणि कर्जाचे ओझे घेवून वाकले  आहेत, तर कधी ओला  दुष्काळ , महापूर यासारख्या प्रलयंकारी वादळात सापडून त्यांचं सर्वस्व हेलकावे खात पाचोळ्या सारखं उडून जात आहे.  निसर्गाच्या लहरीपणाला  कंटाळुन एक मोठा समाजघटक हजारो हेक्टर जमीन पडीक ठेवायला  तयार आहे.  समाजमनाच्या असंतुलीत  मानसीक दवंद्वाचा अर्थ कळतोय का ?  अंधश्रद्धेच्या जबरी मिठीत अडकलेला  हा समाजघटक ज्ञानाच्या प्रकाशकिरणांची वाट शोधतो आहे.  रोगावर किंवा जखमांवर केवळ  फुंकर घालून किंवा वरवर मलमपट्या  लावून किती काळ  आम्ही पक्षीय राजकारण साधणार आहोत ? खरी गरज आहे ती अंधश्रद्धा, बेरोजगारी आणि लोकसंख्या वाढ या त्रिदोषाला  समुळ  उखडून फेकण्याची. गरज आहे अशा धन्वंतरीची.

        सुहास  सोहोनी -9405349354    
      वर्तुळाचे  टोक [मराठी लेखसंग्रह 2005]
       www.suhassohoni.blogspot.com

सहनशील जनतेची छुपी लु ट

                   *  सहनशील  जनतेची छुपी लुट *

            आपल्यावर कितीही अन्याय होत अस  तरी त्याला  प्रखर विरोध करणे, अन्यायाला  वाचा फोडणे व निराकरण करणे हे असंघटित सामान्य जनतेला  सहजपणे शक्‌य नाही.  नेमका याच गोष्टी चा फायदा मालक, भांडवलदार कंपन्या व प्रत्यक्ष शासनकर्ते सुद्धा घेत असतात.  एका कमावत्या व्यक्तीवर किती प्रकारचा कररूपी भार पडतो, याचा साधा विचार कुणी करीत नाही.  वीज बिलातील  टि.डी.एल . चार्जेस  बाबत विरोध जनतेने दर्शवला .  त्याबद्दल  अभिनंदन !  तसेच, टेलिफोन व वीज बिलात दरपत्रकाप्रमाणे दर आकारल्यानंतर रेंटल चार्जेस हा सुद्धा विनाकारण भुर्दंड आहे.  एक प्रकारे ही ग्राहकांची छुपी लुट आहे.  देणारे देत आहेत तर घ्या  ओरबडून, ही वृत्ती वाढत आहे.
    खरे म्हणजे, कामगार म्हणजे नोकर.  ठराविक तास काम केल्‌यावर त्याबद्दल  त्याला  जे मिळते तो पगार, मेहनताना, चुकारा किंवा ठरलेला मोबदला  .  मग तो कामगार सरकारी , निमसरकारी, खाजगी कंपनीत, कारखान्यात, दुकानात किंवा कुणा भांडवलदाराकडे काम करणारा असो, तो केवळ  नोकर असतो.  पण, या संघटीत असलेल्या कामगारांकडून चक्क व्यावसायीक कर वसूल  केला  जातो.  कामगार हा व्यावसायीक कसा ? नोकरी करणे हा व्यवसाय आहे काय ?  याच कामगाराकडून आयकर सुद्धा वसूल  केला  जातो.  केलेल्या श्रमाबद्दल  मिळणारा मेहनताना हा नफा समजला  जातो.  एकाच पगारावर दोन प्रकारचे कर कां वसूल  केले  जातात ?  पुन्हा त्यावर अधिभार वसूल  केल्या जातो.  त्यानंतर सर्व्हिस टेक्स, त्यावर पुन्हा अधिभार, दंगल  झाली  म्हणून, भुकंप, नैसर्गक आपत्ती, दहशतवादी कारवाया अशी कारणपरत्वे उद्‌भवणारी करांची यादी मारूतीच्या शेपटीप्रमाणे वाढतच जाते.  नोकरी करू दिल्याबद्दल  शासनाने केवळ  एक नोकरी कर पगाराप्रमाणे तक्ता करून लावावा असे आता सुचवावेसे वाटते.  सुसंघटीत असणाऱ्या  कामगार संघटनांना ही लुट मान्य आहे, असे दिसते.  त्याऐवजी वाढीव भत्ता, महागाई भत्ता मागण्यात ते धन्यता समजतात व जनतेचा रोष ओढवून घेतात.  जरूरीप्रमाणे कायदयात बदल  व्हावा.  कायदा हा नेहमी भांडवल  दार व शासनाच्या हिताचा असतो, हेच सिद्ध होत आले  आहे.  दु:खाने म्हणावेसे वाटते की, कायदयाच्या आजुबाजुला  विरोधाभास वा संभ्रम असून मागे पळवाट असते.कितीतरी मान्यवर व्यक्ती टेक्स भरत नाहीत, वाचवतात किंवा चुकवतात.  जनतेचे सेवक असलेली  खासदार आमदार मंडळी  कायदयात सुधारणा करून आपले  मानधन वाढवून घेतात.  त्याचबरोबर त्यांना अनेक कर, टेलीफोन सेवा, वीज खर्च माफ असतो.  पंरतू या विषयी कुठेही, कुणीही विरोध करत नाही.  अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात संसदेत हा ठराव मंजूर होतो.  त्वरित कायदा बनतो.  त्याच संसदेत जनतेचे जिव्हाळ्याचे प्रश्न मात्र वर्षानुवर्षे निकालाची वाट पहात असतात.  भारतीय खेळाडूंना बक्षीस म्हणून मिळालेल्या विविध वस्तुंवर कर माफ करण्याचे संयुक्तिक  कारण काय ? वास्तविक हा श्रीमंत वर्ग कर भरण्यास सक्षम असतो.  अनेक परदेशी कंपन्यांच्या मालावर विविध प्रकारची सूट कां दिली  जाते ?
    कोणतेही वाहन खरेदी करतांना ग्राहकांकडून आधीच रोड टेक्स वसूल  केलेला  असतो.  त्यातूनच रस्ते दुरूस्त करण्याचे , पूल  बांधण्याचे ठेके दिले  जातात.  याशिवाय जागतिक बँकेचे कर्ज घेतले  जाते.  म्हणजेच ठेकेदाराला  त्याचे पैसे दिलेले  असतात.  असे असताना ठिकठिकाणी टोल एजंट्‌स वाहनाकडून जाण्यायेण्याचे पैसे कां वसूल  करतात ? एकदा रोड टेक्स भरलेला  असताना जागोजागी होणारी ही लुट कां सहन करायची ? अत्यंत घाणेरड्या  रस्त्यांवर वाहन का चालवावे लागते ? कोणत्याही वाहन चालकाला , धारकाला  हे खचितच आवडत नसावे. माहिती- तंत्रज्ञानाच्या युगात आपल्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांची उत्तरे जनतेला  शोधता येत नसतील  तर ती चूक केवळ  जनतेचीच आहे.  या सर्व विषयांवर सखोल  अभ्यास होणे व निर्णय होणे गरजेचे आहे.  केवळ  निवडणुकांपूरते हे विषय हाताळू  नयेत.  जनतेला  आधार मिळेल , आपुलकी मिळेल  असे व्यासपीठ तयार होणे गरजेचे आहे.  सहिष्णू असलेली  भारतीय जनता, जरा जास्त सहनशील  आहे.  म्हणूनच नित्यनेमाने दंडेलीचे आघात सहन करावे लागतात. केवळ  मुठभर लोकांची चैन व उधळपट्टी चालू  ठेवतांना सामान्य जनांच्या खिशाला  किती भार पडणार आहे?
   
          वर्तुळाचे टोक [ मराठी  लेखसंग्रह 2005]
          सुहास सोहोनी -9405349354
         www.suhassohoni.blogspot.com 

आरोग्य तपासणी – चाळीशीनंतर

            आरोग्य तपासणी – चाळीशीनंतर
   
    अपघात झाल्‌यानंतर , रक्तात  साखर जास्त आहे øा कारणाने आ°परेशनला वेi लागतो, आणि आपण मधुमेहाचे रोगी आहोत याच ज्ञान होतं. हे स्वास्थ्याबाबत अज्ञान बरं नव्‌हे, चाiीशी नंतर कमजोर होऊ लागलेली गात्रे व रोग प्रतिकार शक्ती, आनंददायी जीवन जगण्यात अडथiा निर्माण करतात. अशावेiी त्रासदायक व जीवघेण्या व्‌याधींना दूर ठेवण्याचा प्रयत्न करायला हवा. सांध्यांचे विकार, फुप्‌फुसाचे रोग, öदयरोग, मधुमेह, कर्करोग, व कमी,उƒ रक्तदाब या सारखे विकार आश्रयाला येऊ लागतात. हे विकार म्हणजे अनेक वर्षाची हiूहiू सुरू राहणारी प्रक्रिया असते. रूग्णाला त्याची जाणीव होत नसते. रक्तदाब पाहिला असता तो कमी अधिक प्रमाणात असतो. रक्तात साखर आढiते. रक्तात कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढलेbे असते. óियांची परिक्षा केली असता अनेक व्‌याधींची सुरूवात होत असल्‌याचे कiते- पण हे सर्व केवi वैद्यकीय परिक्षणानंतर उजेडात येते.
    वयाची चाiीशी ओलांडलेल्‌या प्रत्येक óी-पुरूषाला नियमित वैद्यकीय तपासणीची गरज असते. जेणे करून बरेचसे विकार प्रथमावस्थेत उपाययोजना, सवईत बदल करून खात्रीने रोखता येतात. अनेक समस्यांवर आपण नियंत्रण ठेवू शकतो.
    चाiीशी हा आयुष्‌यातील महत्वाचा टप्‌पा असतो. नोकरी व्‌यवसायात स्थिरता येऊन नवीन जबाबदाèया पेलण्यास अनुभवी मन सक्षम असतं. चिमुकल्‌यांचे लाड करण्यात व त्यांचा उत्कर्ष पाहण्यात वेi आनंदात जात असतो. भविष्‌यातील रम्य स्वप्‌ने बघण्यात आणि ती प्रत्यक्षात उतरवण्यात हे वय म¾ असते. पण नेमकी हीच वेi स्वत:च्‌या आरोग्याची काiजी घेण्याचीही असते. काiजी करणे म्हणजे घाबरणे नसून, स्वत:ची आरोग्यविषयक माहिती करून घेणे, असा आहे. चाiीशी नंतरची तपासणी व उपाययोजना स्वत:करीता तसेच आपल्‌यावर अवलंबून असणाèया सर्वांकरीता फारच महÎवाची आहे.एखादा रोग मुiात होऊच नये म्हणून काiजी घेणे केव्‌हाही योग्य.
      सुहास सोहोनी --9405349354
       उजळते क्षितिज [लेखसंग्रह 2007]
        www.suhassohoni.blogspot.com


शुभेच्‌छा पत्रांद्वारे ओळख विदर्भाची

                शुभेच्‌छा पत्रांद्वारे ओळख विदर्भाची
   
    भारताच्या नकाशावर मध्यभागी असलेला प्राचीन, पौराणिक व ऐतिहासिक  काळातील  उल्लेख असलेला, भरपूर निसर्ग संपदा व विविधतेने नटलेला आमचा विदर्भ जगात तर नाहीच, पण विदर्भाबाहेरही कुठे फारसा ओळखीचा नाही हा अनुभव  बऱ्याच  वेळा  आला आहे. आपल्या विदर्भात भरपूर निसर्ग सुंदर स्थळ  आहेत. पूर्णा, वर्धा, वैनगंगा, पैनगंगा या नद्या आहेत. मेळघाट, ताडोबा, तोतलाडोह, पेंच, नागझिरा, नवेगाव बांध ही राखीव जंगले, वन्यपशू-पक्षी, अभयारण्य आहेत. डोंगरी किल्ले, पुराणकालीन अती प्राचीन उल्लेख असलेली असंख्य ठिकाणे आहेत. दिक्षाभूमि, शेगाव, रामटेक यासारखी धर्मस्थळे  आहेत. प्राचीनतम मानवी वस्तीचे अवशेष असलेला दरेकसा व अज्ञात असा गडचिरोली जिल्हा, असे कितीतरी दुर्लक्षित, अप्रकाशित प्रदेश आहेत.
    माझ्या  मते विदर्भाची बाहेर ओळख करून देणे अत्यावश्यक आहे. निरनिराळ्या   निमित्ताने प्रत्येकजण शुभेच्‌छा पत्र पाठवत असतो. वाढदिवस, शुभकार्य, धार्मिक सण, आनंदोत्सव अशावेळी  आपण सर्वांनी शुभेच्‌छा पत्रांद्वारे (ग्रीटिंग कार्ड्स ) विदर्भाबाहेरील इष्टमित्र,नातेवाईकांना ह्या  प्रांताची ओळख करून द्यावी .  निरनिराळी  ठिकाणे, रमणिय निसर्गचित्रांचे प्रिंट व थोडक्यात माहिती द्यावी.
    विद्यार्थी  संघटना, ग्रुप्‌स व सर्व विदर्भवासियांनी या लोकप्रिय माध्यमाद्वारे एकत्रितपणे* "शुभेच्‌छा पत्रांद्वारे ओऴख -विदर्भाची'*हा उपक्रम राबवावा. त्यानंतर देशांत व देशाबाहेर अनेक ठिकाणी सहजच विदर्भ प्रदेशाबाबत विचारांची देवाण-घेवाण सुरू होईल. विचार प्रवाह सुरू होईल त्यातुनच सोईसवलती, उद्योग, योजना व पर्यटन वाढ होईल.
    येत्या काही दिवसात अनेक सण, उत्सव यांची सुरवात होत आहे. माझा हा विचार जर विदर्भवासियांना रूचला, पटला तर ह्या  विचाराचे प्रायोगिक उत्तर सर्वांना दिसेल. या कल्पनेद्वारे केवळ  लाभच होणार आहे. तरी "*शुभेच्‌छा पत्राद्वारे ओळख विदर्भाची*'हा उपक्रम हाती घ्यावा .
         * उजळते  क्षितिज [लेखसंग्रह 2007]*
           सुहास  सोहोनी ---9405349354
          www.suhassohoni.blogspot.com