Monday, October 10, 2016

■सावध रहा ,रात्र वैऱ्याची आहे■

■सावध रहा ,रात्र वैऱ्याची आहे■ 💥युद्धासाठी जनतेचे संपूर्ण सहकार्य लागतं, एकमेकांवर विश्वास हवा,युद्ध केवळ सैनिकच नाही, तर अवघ्या देशाला लढावं लागतं, जनतेच्या विश्वासावर सैनिकी ताकत वाढत असते,देशाबाहेरील प्रत्यक्ष शत्रूपेक्षा देशातील देशविरोधी कारवाया करणारे ,जनतेच्या मनोधैर्यावर वार करणारे जास्त धोकादायक असतात. दुर्दैवाने असे देशात बरेच लोक आहेत आणि ते बुद्धीजीवी,लोकनेते, खेळाडू ,लेखक,पत्रकार, राष्ट्रीय पुरस्कार विजेते,भडकवलेले दुखावलेले वाहवत गेलेले तरुण असेे महत्वाचे लोकं आहेत.ह्यांच्याकडे लक्ष देणे हे युद्धापेक्षा जास्त महत्वाचे आहे,अर्थात सैन्याला या गोष्टी समजतात .युद्ध काळात असंतुष्ट आणि भ्रष्टाचारी लोकांच्या शोधात शत्रू असतो हे कुणी सांगायची गरज नाही .मला वाटतं आजची ही वेळ एकी सिद्ध करण्याची आहे ,आपण सुज्ञ आहात. ★सावध रहा ,रात्र वैऱ्याची आहे★ सुहास सोहोनी

💥देशापुढे सगळे दुय्यम आहेत💥

💥देशापुढे सगळे दुय्यम आहेत💥
★जबाबदार सेलिब्रिटी,नेते ,राजकीय प्रतिस्पर्धी असलेले लोकं, आपल्याच सैन्याच्या पाकिस्तान विरुद्ध च्या अतिमहत्वाच्या कारवाई बद्दल जाहीर शंका उपस्थित करतात,प्रेस/चॅनलवर तावातावाने चर्चा किंवा वाद घालतात,अनेक मान्यवर म्हणवणारे त्यांच्या बेताल,उर्मट व्यक्तव्याचे समर्थनही करतात ,हे दुख:दायक आहेच,पण त्यापेक्षा जास्त धोकादायक आहे.
★सध्या युद्धजन्य परिस्थिती असून आपण कदाचित दीर्घकाळ चालणाऱ्या त्रासदायक युद्धाच्या दिशेने सरकतो आहोत. अशावेळी सैन्याच्या गुप्त हालचाली बद्दल,देशाच्या निर्णया बद्दल, संभ्रम निर्माण होईल असे विचार पसरवणे,जनतेत वैचारिक दुही ,फूट पाडणे,शासनाला/सैन्याला दोषी ठरवणे हा अक्षम्य गुन्हा आहे.या गुन्ह्याला क्षमा नाहीच.
★आपल्या विचारांनी, कृतीने असे लोकं शत्रूचाच फायदा करतात.सैनिक नेहमीच डोळ्यात तेल घालून सीमेचे रक्षण करतात त्यामुळेच आम्ही सुखानं झोपू शकतो.आरामात सगळ्या प्रकारचे उपभोग घेत असतो.मात्र युद्धात सैनिक आणि नागरिक दोघेही शत्रूशी लढत असतात.त्यांचा एकमेकांवर १००% विश्वास असतो.हा विश्वास आजही आहेच ,संपूर्ण देश सैन्या सोबत आहेच . ★काही नतद्रष्ट ,देशविरोधी ,सोय व वेळ साधून स्वार्थ साधणारे, शत्रूला कळत नकळत मदत पोह्चवणारे दळभद्री लोकं दुर्दैवाने प्रत्येक कालखंडात असतातच.त्यांना शोधून निष्क्रिय करणे जरुरी आहे,कारण हा देशाच्या हरण्या जिंकण्याचा प्रश्न आहे,देशाच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे .युद्धात झालेलं नुकसान हे कायमचं नुकसान असतं.
★शत्रूशी सीमेवर लढतांना सैन्याला देशांतर्गत विरोधी कारवाया करणारे/देशविरोधी कृती करणारे ,गैरसमज पसरवणारे ,यांच्या विरोधात सुद्धा लढावे लागणार आहे.अन्यथा शत्रूपेक्षा हे लोकं जास्त धोकादायक आहेत. ●हे युद्ध सीमेच्या बाहेर तर लढावे लागणार आहेच पण देशाच्या आत देशद्रोह्यांशी सुद्धा लढावं लागणार आहे,● ■पण देश महत्वाचा.■
💥देशापुढे सगळे दुय्यम आहेत.💥 सुहास सोहोनी
★संवेदना★
(सामाजिक विचार मंच)
अमरावती - ६