मोबाईल, वाहन आणि फुकटचा सल्ला !
कोणतेही वाहन जेव्हा आपण चालवतो तेव्हा वाहन चालवण्याच्या क्रियेशी आपले हात, पाय, आणि विचार एकरूप होतात. माशीन आणि चालवणारा चालक दोघांच्या संगनमताने ते वाहन सहजपणे चालकाच्या मेंदूच्या आज्ञेप्रमाणे पुढे सरकते, वेग घेते. वाहन चालकाने नजर रस्त्यावर ठेवून शांत बुद्धीने वाहन चालवावे हि अपेक्षा, पण आजच्या मोबाईल काळात सतत नित्य बोलत राहा हेच सांगितल्या मुळे मोबाईल वर बोलणे अगदी आवश्यक आहे. त्या करिता एका हाताने वाहन आणि दुसर्या हाताने कानाला मोबाईल, मोठ्याने बोलणे, त्यापेक्षा बोलताना विषयाला अनुसरून चेहेर्यावर हावभाव, हे सुद्धा फारच आवश्यक आहे. याहीपेक्षा आणखीन एक क्रिया वाहनचालकाला यायलाच हवी, तरच त्याला तरबेज वाहन चालक म्हणता येईल. म्हणजे असे कि ४५ डिग्री आपली मान खंद्याच्या दिशेने झुकवायची आणि ४५ डिग्री ने खांदा उंच करायचा व मान आणि खांदा यांच्या मध्ये अलगद मोबाईल सरकवायचा आणि कितीही वेळ वाहन चालवताना मस्त गप्पा हाणायच्या. आहे कि नाही गम्मत ? नाहीतरी हि नवी पिढी मुळातच हुशार आहे बुवा !
वास्तविक वाहन चालवताना कसरत करत मोबाईल वापरणाऱ्या लोकांना इतर वाहनांनी सन्मानपूर्वक वाट करून द्यायला हवी. वाकडी मान करून येणारे वाहन सामान्य वाहन चालकांना दिसत कसे नाही ? मोबाईलवर बोलण्यात व्यस्त असलेल्या वाहन चालकावर सरळ आदळतात म्हणजे काय ? हे बरोबर नाही प्रत्येक वाहन चालकाला किमान मान वाकडी करून बोलत बोलत वाहन चालवता आलेच पाहिजे. तज्ञ चालकांनी असे कोचिंग क्लासेस काढायला हरकत नाही. आई बाप आणि पालक हि तर एक नंबरची घाबरत मंडळी. अगदी मुळे घरी येई पर्यंत सारखे घाबरत असतात. काही तज्ञ विचारवंत स्वतः ला लेखक वगैरे समजणारी मंडळी तर फुकटचा सल्ला देण्याची एकही संधी सोडत नाही. फुकट सल्ले देण्याच्या यांच्या चिकाटीला मानावे लागेल. खरे म्हणजे अनेक थोर महात्म्यांनी प्रवचकरांनी, संतांनी सांगूनच ठेवले आहे कि, जगतांना उठ सुठ सारखा सारखा मृत्यू चा विचार कधी करू नये. तो काय कधीतरी यायचाच कसे ? तरीपण एक फुकट सल्ला द्यावासा वाटतो कि मोबाईल वर बोलतांना वाहन चालवणे धोक्याचे असते.
सुहास सोहोनी
वीकास वार्ता पुरस्कार -१९९० महा शासन
राष्टीय एकात्मता फेलोशीप - २००५ अखील महा पत्रकार व पत्रलेखक संघ
सहसचीव डाय्बेटीक असो. इंडीया, अमरावती
please visit at : www.suhassohoni.blogspot.com
No comments:
Post a Comment