Saturday, December 10, 2011

भांडवलदारांना हवा असतो फक्‌त नफा-आणखी नफा


सुहास सोहोनी
वीकास वार्ता पुरस्कार -१९९० महा शासन,
राष्टीय एकात्मता फेलोशीप - २००५ अखील महा पत्रकार पत्रलेखक संघ,
सहसचीव डाय्बेटीक असो. इंडीया, अमरावती ,
सदस्य : महारषट्र वृत्तपत्र लेखक असोसिएशन,
please visit at : www.suhassohoni.blogspot.com
_________________________________________


भांडवलदारांना हवा असतो फक्‌त नफा-आणखी नफा 
   
       करोडो भारतीयांच्या  पोटात भरपूर किटकांचा प्रादुर्भाव झाला असा शोध लागल्यामुळे, आरोग्याच्या काळजीपोटी पवीत्र सेवाभावी वृत्तीने परदेशस्थ थंड पेयांच्या कंपनींनी थंड पेयात किडनाशकांचा वापर केला असावा काय ? आणि असे जर असेल तर आपण मात्र......... मुख्‌य म्हणजे किटकनाशकांचे प्रमाण जास्त असण्यावर आक्षेप आहे.  दररोज आमच्या पोटात किती विषारी द्रव्य कणाकणांनी जात आहे याबाबत आम्ही खरोखर अज्ञानी आहोत.  पण याहीपेक्षा महत्वाचे म्हणजे काही राज्यांनी या बहुराष्ट्रीय कंपन्यांना म्हणे विक्रीकरात करोडो रूपयांची सवलत देण्याच पवित्र कार्य केल आहे.

           आता महीने न महीने समिती वगैरे नेमुन भारतीय जनता आपला  विस्मरणाचा हक्क बजावण्यास मोकळी  आहेच. पाश्चिमात्यांचे गोडवे गाण्याचा आपला  परिपाठ असतांना त्यांना एकदम गुन्हेगार वगैरे कसं काय म्हणायचं ? याच राक्षसी प्रमाणात उत्पादक असणार्या बहुराष्ट्रीय  परदेशस्थ कंपन्या भारतामधे टाचणी पासुन तर विमानापर्यंत सगळ्या वस्तू व सेवा घरपोच आणुन देणार आहेत, आणि आपल्याला  फक्त उपभोग घेण्याचं काम करायचं आहे, अशा शेकडो कंपन्यांच्या मदतीने आपल्या देशात एक्सप्रेस हायवेज, उड्डाण  पुल, संगीत उद्याने, मोटारी, इंटरनेट, फास्ट  हॉटेल्स खाण्यापिण्याच्या सगळ्या  वस्तु मिळणार आहेत.  एक नवा स्वर्ग इथे अवतरणार आहे.  तुमच्याजवळ पैसे नसतील तर प्रॉपरटी गहाण ठेवून या कंपन्या भरपूर कर्ज ही देणार आहेत.  त्यांना इथे कायम व्यवसाय करायचा आहे.  भांडवलदारांना फक्त हवा असतो नफा आणखी नफा.  श्रीमंतांना व्हावयाचं असतं आणखी श्रीमंत.  या देशातल्या मुठभर 10 टक्के श्रीमंतांना या मानवयोनीतील  मिळालेल्या जीवनाचा आनंद उपभोगायचा आहे.   उरलेल्या 90 टक्के गरीबांचा विचार किती काळ , कोणी करावा?  गरिब वगैरे जर कोणी असतील तर त्यांनी सुद्धा झटपट श्रीमंत व्हावं आणि याच जीवनात सगळा उपभोग घेवून टाकावा हे पाश्चात्य तत्वज्ञान इंटरनेट मार्केटिंग सारख्या नवतंत्रात घरोघरी शिकवल जात आहे.
    विदर्भात कापुस पिकत असतांना घरोघरी हातमाग का नाहीत ?  विदर्भात संत्रा पिकत आसतांना संत्राज्युस, संत्र्याचे अनेक पदार्थ का नाही बनत ?  भारतात ठिकठिकाणी उपलब्ध असलेल्या कच्च्या माला पासून त्याच विभागात कारखाने का नाही चालत ?  करोडो हातांना काम का नाही?  सुरक्षीत नोकर्या मधून कामगार का काढले जात आहेत ?  प्रश्न अनेक आहेत आणि जनतेनेच त्यांचा वेध घ्यायचा आहे.

           -------------0--------------------0--------------0---------------------0--------------------


सुहास सोहोनी
विवेकानंद कॉलोनी, अमरावती ४४४६०६
फोन : ०७२१-२५६७४६३, ९४०५३४९३५४.

 

No comments: