Tuesday, August 21, 2012

स्वाक्षरी मोहिमेत संघटीत व्हा

           *  महाराष्ट्र वृत्तपत्र लेखक असोसिएशन  च्या   स्वाक्षरी मोहिमेत संघटीत व्हा *
              अमरावती म .न .पा .द्वारा निर्माणाधीन असलेला कत्तल खाना रद्द करावा
*अमरावती म. न. पा.चा प्रस्तावित कत्तलखाना हा संतांच्या, 
विचारवंतांच्या अम्बानगरीला एक कलंक असणार आहे .
*या कत्तलखान्यात दररोज मोठ्या प्रमाणात हजारो दुभती जनावरे नष्ट होणार आहेत .
*गाई ,म्हशीचे दुध सर्वच आबालवृद्धांना हवे आहे.
दुधाच्या बाबतीत जात ,पंथ,धर्म हा भेदभाव नाही .
*2005 साली म.न.पा. च्या आमसभेत "कत्तलखाना रद्द"  चा ठराव बहुमताने पारित झाला होता .
*तत्कालीन म न पा आयुक्तानी" कत्तलखाना रद्द ठराव "विखंडीत करावा असा प्रस्ताव शासनाला दिला. शासनाने हा प्रस्ताव त्वरित मंजूर केला.
*महाराष्ट्र प्रदूषण मंडळाने "कन्सेट टू एसट्याब्लीष" असा परवाना  दिला. काम पूर्ण झाल्यावर "कन्सेट टु ओपरेट"असा परवाना दिला जाईल .
*कत्तलखान्याचे उत्पादन निर्यातक्षम करण्याचे प्रावधान आहे .
*कत्तलखान्यासाठी आपले अमरावती शहरच का निवडले ? उर्वरित महाराष्ट्र का नाही ?
*नगरसेवकांनी ठोस निर्णय घेऊन कत्तलखाना रद्द करण्याचा प्रस्ताव पुन्हा ठेवावा व पारित करावा .
*या मोहिमेसाठी जिल्ह्यातील 10 लाख नागरिकांनी एकत्रितपणे संघटीत व्हावे .
*बहुसंख्य नागरिकांचा लिखित विरोध असेल तर कायदेशीर मार्गाने, सनदशीर पद्धतीने, कायदेशीर सल्याप्रमाणे शांतता व अहिंसेच्या मार्गाने कत्तलखाना रद्द करता येईल .
*अम्बानगरीच्या सुज्ञ नागरिकांनी निर्णय घेण्याची वेळ आली आहे.
एकदा सुरु झालेला कत्तलखाना बंद करता येणे शक्य नाही .
*राष्ट्रसंतांच्या पावन अम्बानगरीत हा कत्तलखाना सुरु होऊ देणार का?
*निर्णय जनतेच्या कोर्टात आहे .
*  "कत्तलखान्याचे शहर "अशी नामुष्कीची,दुर्दैवी ओळख अमरावतीकरांना हवी आहे का?
* **************  स्वाक्षरी  मोहिमेत संघटीत व्हा .***************
*************** महाराष्ट्र वृत्तपत्र लेखक असोसिएशन ***************

No comments: