हिडीस मानवी चेहरा
मातेच्या गर्भात बाळ नक्कीच सुरक्षित असत आणि निसर्गाची सुद्धा तीच इच्छा आहे ,पण ते बाळ
जर कन्या असेल [भ्रूण], तर मात्र आज मातेच्या गर्भातही कन्या सुरक्षित नाही ,हे आजचं विदारक वास्तव आहे .
त्यातूनही कन्येचा जन्म झाला ....आणि विकृतीने पछाडलेल्या बापाच्या तावडीत ती सापडली तर तिचे काय
हाल होतात ते उघडकीस येत असलेल्या अनेक घटनांवरून दिसत आहे .कुणी एक बाप आपल्या कोवळ्या नवजात
मुलीवर विविध प्रकारे अत्याचार करू शकतो ,हा विचार सुद्धा मनाचा थरकाप उडवतो .त्याहीपेक्षा अशा उघडकीस
न आलेल्या घटना देशभरात किती असाव्यात हा विचारसुद्धा मन सुन्न करतो .
या विकृतांधांना कुणी दिला हा जीवन संपवण्याचा अधिकार ? काय गुन्हा आहे त्या निष्पाप निरागस
बाळांचा आणि त्या निर्दोष मातेचा ? पालन पोषण शिक्षण, संरक्षण, विवाह, फसवणूक ,अत्याचार आशा भविष्यातल्या
अनेक संभाव्य धोकेदायक घटनांचा विचार करून 'कन्या नकोच 'अशी भावना बळावत चालली असावी .मुलगी
परक्याच धन आणि मुलगा वृद्धापकाळाचा आधार ,वंशाचा दिवा या सगळ्या संकल्पना किती तकलादू आहेत हि
गोष्ट सतत सिद्ध होत आहे .मुळात पुत्र किंवा कन्याजन्म होणे हे त्या मातापित्याच्या हातात नाही हेच सत्य आहे .
हे सत्य ज्यांना समजत नाही त्यांनी विवाह बंधनात अडकू नाही किंवा मुलच होऊ देऊ नये .पृथ्वीवरील सर्व प्राण्यांमध्ये
[काही अपवाद वगळता] स्त्री आणि पुरुष [नर व मादी ]या दोनच मुळ जाती आहेत पण त्या परस्परांसाठी निर्माण
केल्या गेल्या .हीच निसर्गाची इच्छा आहे .आपण जर जाणीवपूर्वक हा समतोल बिघडवला तर अनर्थ ओढवेल .हि
गोष्ट सामान्ज्स्पणे मान्य करण्याची बौद्धिक पात्रता आणि तारतम्य आज आपण गमावत चाललो असेच दिसते .
अफाट लोकसंख्या असलेल्या आपल्या देशात आत्यंतिक व्यस नान्ध , विकृत ,मनोरूग्ण आणि हिडीस
क्रूरकर्मा चेहरा असलेले किती " बाप "खुलेआम वावरताहेत हा विचार भीतीदायक आहे .
सुहास सोहोनी
मातेच्या गर्भात बाळ नक्कीच सुरक्षित असत आणि निसर्गाची सुद्धा तीच इच्छा आहे ,पण ते बाळ
जर कन्या असेल [भ्रूण], तर मात्र आज मातेच्या गर्भातही कन्या सुरक्षित नाही ,हे आजचं विदारक वास्तव आहे .
त्यातूनही कन्येचा जन्म झाला ....आणि विकृतीने पछाडलेल्या बापाच्या तावडीत ती सापडली तर तिचे काय
हाल होतात ते उघडकीस येत असलेल्या अनेक घटनांवरून दिसत आहे .कुणी एक बाप आपल्या कोवळ्या नवजात
मुलीवर विविध प्रकारे अत्याचार करू शकतो ,हा विचार सुद्धा मनाचा थरकाप उडवतो .त्याहीपेक्षा अशा उघडकीस
न आलेल्या घटना देशभरात किती असाव्यात हा विचारसुद्धा मन सुन्न करतो .
या विकृतांधांना कुणी दिला हा जीवन संपवण्याचा अधिकार ? काय गुन्हा आहे त्या निष्पाप निरागस
बाळांचा आणि त्या निर्दोष मातेचा ? पालन पोषण शिक्षण, संरक्षण, विवाह, फसवणूक ,अत्याचार आशा भविष्यातल्या
अनेक संभाव्य धोकेदायक घटनांचा विचार करून 'कन्या नकोच 'अशी भावना बळावत चालली असावी .मुलगी
परक्याच धन आणि मुलगा वृद्धापकाळाचा आधार ,वंशाचा दिवा या सगळ्या संकल्पना किती तकलादू आहेत हि
गोष्ट सतत सिद्ध होत आहे .मुळात पुत्र किंवा कन्याजन्म होणे हे त्या मातापित्याच्या हातात नाही हेच सत्य आहे .
हे सत्य ज्यांना समजत नाही त्यांनी विवाह बंधनात अडकू नाही किंवा मुलच होऊ देऊ नये .पृथ्वीवरील सर्व प्राण्यांमध्ये
[काही अपवाद वगळता] स्त्री आणि पुरुष [नर व मादी ]या दोनच मुळ जाती आहेत पण त्या परस्परांसाठी निर्माण
केल्या गेल्या .हीच निसर्गाची इच्छा आहे .आपण जर जाणीवपूर्वक हा समतोल बिघडवला तर अनर्थ ओढवेल .हि
गोष्ट सामान्ज्स्पणे मान्य करण्याची बौद्धिक पात्रता आणि तारतम्य आज आपण गमावत चाललो असेच दिसते .
अफाट लोकसंख्या असलेल्या आपल्या देशात आत्यंतिक व्यस नान्ध , विकृत ,मनोरूग्ण आणि हिडीस
क्रूरकर्मा चेहरा असलेले किती " बाप "खुलेआम वावरताहेत हा विचार भीतीदायक आहे .
सुहास सोहोनी
No comments:
Post a Comment