💥अड्डा -२७,कसबा कॅफे ही ,विदर्भाची सांस्कृतिक नगरी- "अमरावतीची दुर्दैवी नवी ओळख."
💥
★एका शांत आणि चांगल्या शहरातील लाडावलेल्या आणि चटावलेल्या धनिक पुत्रांचे लाफडेबाज चाळे नक्कीच दखलपात्र आहेत .आपल्या मुलाने कोणता व्यवसाय निवडावा, तो व्यवसाय आपल्या घराण्याच्या प्रतिष्ठेला साजेसा आहे की नाही !असे विचार या तरुणांच्या आई बापांच्या मनात तरी येतात कि नाही ,हाच खरा प्रश्न आहे .असे आई वडील आपल्या मुलांना अवैध धंद्यासाठी प्रोत्साहन देतात याचे कारणच मुळी अशा घरात पूर्वापार अनैतिक धंदे ,अयोग्य विचारधारणा असू शकते ,त्यामुळे शासकीय नियमांची ऐसी तैसी करण्यासाठी नेहमीच हातमिळवणी झालेली असते.
★नीती - अनीती चा विचार न करता कोणत्याही मार्गाने फक्त भरपूर पैसे मिळविणे एवढा #एक #कलमी #कार्यक्रम ,या मंडळींचा असतो.सध्याचं युग हे #प्रलोभन युग आहे.तरुण - तरुणी ,काही भरकटलेले मध्यमवयीन पुरुष हे अंमली पदार्थ व चैनी च्या दुनिये कडे आकर्षित झालेले आहेत .सगळ्या प्रकारची भौतिक सुखे हर प्रयत्नाने कशी मिळवता येतील याच विचारात हा वर्ग नेहमी गर्क असतो.सट्टा, जुगार ,विविध अंमली पदार्थ याच्याच शोधात हा बिघडलेला समाजघटक गावभर उनाडक्या करत फिरत असतो. चैन आणि पैसे कमविण्याचे सगळे हलके, नीच मार्ग यांना सहज मंजूर असतात. ★देशी विदेशी मद्याची यांची मागणी प्रचंड आहेच पण त्याबरोबरच सट्टा, जुगार, हुक्का,आणि नवं नवीन स्त्रिया आपल्या तावडीत कशा सापडतील याच्या शोधात हि मंडळी असतात.यांना अशा सुखाची चटक लागलेले ग्राहक सुद्धा भरपूर मिळतात .चुकीच्या मार्गाने अफाट पैसा कमावलेल्या घरातील बिघडलेल्या तरुण-तरुणींच्या जवळ पॉकेट मनी च्या रूपाने बराच पैसा खुळखुळत असतो ,आणि तो #चैनकेंद्रात उधळला जातो . ★एकदा व्यसनी बनल्यावर तर काय ! वाटेल त्या मार्गाने पैसे मिळवले जातात .शासनाने समाजाला धोकादायक अशी ही *#चैन #केंद्रे* नष्ट करावी.कारण ही किड आहे आणि वेळेवर कीड नष्ट नाही केली तर संपूर्ण समाजाला हि कीड नष्ट करेल,पोखरून टाकेल.सांभाळा आपल्या तरुणांना,मुला - मुलींना. कुठे वळताहेत यांची पावले ! नक्कीच आणि वेळीच लक्ष द्यायला हवं .
*आपल्या शांत शहराची अशी दळभद्री ओळख व्हायला नकोच* .* *सुहास सोहोनी,
*सामाजिक विचार मंच
अमरावती
★एका शांत आणि चांगल्या शहरातील लाडावलेल्या आणि चटावलेल्या धनिक पुत्रांचे लाफडेबाज चाळे नक्कीच दखलपात्र आहेत .आपल्या मुलाने कोणता व्यवसाय निवडावा, तो व्यवसाय आपल्या घराण्याच्या प्रतिष्ठेला साजेसा आहे की नाही !असे विचार या तरुणांच्या आई बापांच्या मनात तरी येतात कि नाही ,हाच खरा प्रश्न आहे .असे आई वडील आपल्या मुलांना अवैध धंद्यासाठी प्रोत्साहन देतात याचे कारणच मुळी अशा घरात पूर्वापार अनैतिक धंदे ,अयोग्य विचारधारणा असू शकते ,त्यामुळे शासकीय नियमांची ऐसी तैसी करण्यासाठी नेहमीच हातमिळवणी झालेली असते.
★नीती - अनीती चा विचार न करता कोणत्याही मार्गाने फक्त भरपूर पैसे मिळविणे एवढा #एक #कलमी #कार्यक्रम ,या मंडळींचा असतो.सध्याचं युग हे #प्रलोभन युग आहे.तरुण - तरुणी ,काही भरकटलेले मध्यमवयीन पुरुष हे अंमली पदार्थ व चैनी च्या दुनिये कडे आकर्षित झालेले आहेत .सगळ्या प्रकारची भौतिक सुखे हर प्रयत्नाने कशी मिळवता येतील याच विचारात हा वर्ग नेहमी गर्क असतो.सट्टा, जुगार ,विविध अंमली पदार्थ याच्याच शोधात हा बिघडलेला समाजघटक गावभर उनाडक्या करत फिरत असतो. चैन आणि पैसे कमविण्याचे सगळे हलके, नीच मार्ग यांना सहज मंजूर असतात. ★देशी विदेशी मद्याची यांची मागणी प्रचंड आहेच पण त्याबरोबरच सट्टा, जुगार, हुक्का,आणि नवं नवीन स्त्रिया आपल्या तावडीत कशा सापडतील याच्या शोधात हि मंडळी असतात.यांना अशा सुखाची चटक लागलेले ग्राहक सुद्धा भरपूर मिळतात .चुकीच्या मार्गाने अफाट पैसा कमावलेल्या घरातील बिघडलेल्या तरुण-तरुणींच्या जवळ पॉकेट मनी च्या रूपाने बराच पैसा खुळखुळत असतो ,आणि तो #चैनकेंद्रात उधळला जातो . ★एकदा व्यसनी बनल्यावर तर काय ! वाटेल त्या मार्गाने पैसे मिळवले जातात .शासनाने समाजाला धोकादायक अशी ही *#चैन #केंद्रे* नष्ट करावी.कारण ही किड आहे आणि वेळेवर कीड नष्ट नाही केली तर संपूर्ण समाजाला हि कीड नष्ट करेल,पोखरून टाकेल.सांभाळा आपल्या तरुणांना,मुला - मुलींना. कुठे वळताहेत यांची पावले ! नक्कीच आणि वेळीच लक्ष द्यायला हवं .
*आपल्या शांत शहराची अशी दळभद्री ओळख व्हायला नकोच* .* *सुहास सोहोनी,
*सामाजिक विचार मंच
अमरावती
- ६
No comments:
Post a Comment