महापुरुषांच्या महाराष्ट्र राज्यात गोवंश हत्या बंदी कायद्याची गरज
नित्य नेमाने होणारी दुभत्या जनावरांची कत्तलीसाठी होणारी अवैध वाहतूक विविध शहरांमध्ये
होते आणि जनक्षोभ उसळतो ,जमाव जमतो ,काही ठिकाणी अप्रिय घटना घडतात .भारतात गोवंश हे दैवत
आहे .मानबिंदू आहे .त्या गोवंशाची चोरी, अवैध कत्तल आणि मोठ्या शहरांमध्ये पाठवण्यासाठी मांसाची
अवैध वाहतूक या सर्व बेकायदेशीर कृत्यांमुळे समाजमन अस्वस्थ आहे . अशा न आवडणाऱ्या घटनांना
विरोध करण्यासाठी नागरिक एकत्र येतात तेंव्हा त्यांच्यावर विविध कलमांद्वारे गुन्हे दाखल केले जातात .
तेही दुर्दैवीच आहे.कत्तलीसाठी शिफारस नसलेल्या जनावरांची अवैध वाहतूक ,अवैध मांस वाहतूक होते ,
तेव्हा "animal cruality law"या कायद्याचे काय ?नित्य नेमाने होणारी दुभत्या जनावरांची कत्तलीसाठी होणारी अवैध वाहतूक विविध शहरांमध्ये
होते आणि जनक्षोभ उसळतो ,जमाव जमतो ,काही ठिकाणी अप्रिय घटना घडतात .भारतात गोवंश हे दैवत
आहे .मानबिंदू आहे .त्या गोवंशाची चोरी, अवैध कत्तल आणि मोठ्या शहरांमध्ये पाठवण्यासाठी मांसाची
अवैध वाहतूक या सर्व बेकायदेशीर कृत्यांमुळे समाजमन अस्वस्थ आहे . अशा न आवडणाऱ्या घटनांना
विरोध करण्यासाठी नागरिक एकत्र येतात तेंव्हा त्यांच्यावर विविध कलमांद्वारे गुन्हे दाखल केले जातात .
तेही दुर्दैवीच आहे.कत्तलीसाठी शिफारस नसलेल्या जनावरांची अवैध वाहतूक ,अवैध मांस वाहतूक होते ,
जंगलातील हरणांची शिकार व मांसभक्षण या विरोधात कायदा आहे, त्यांच्यावर खटला चालतो.
तसेच दुभत्या जनावरांची "शिकार" केली जाते,तेव्हा कायद्यात फरक कसा ?संपूर्ण देशात वाईल्ड लाईफ,
पशुपक्षी तसेच गोवंश हत्या बंदी कायदा आहे ,मग महापुरुषांच्या आणि विचारवंत ,संतांच्या महाराष्ट्रात
गोवंश हत्या बंदीचा कायदा का अमलात आणला जात नाही ?येत्या हिवाळी अधिवेशनात 'प्रलंबित गोवंश हत्याबंदी 'याबाबत आमचे नेते आणि विविध संबंधित संस्था,शासन हा ठराव पारित करण्यासाठी पुढे येतील
का ?कायद्यात पळवाटा शोधता येतात हे जरी मान्य केले तरी किमान कायदा तर असावा लागतो ना?
हे राज्य कायद्याचे कि ?..........
सुसंवाद कसा साधेल ?कोणत्याही क्ष्रेत्राच्या विकासासाठी नागरिकांमध्ये आपसात सलोखा ,शांतता आणि
मुख्य म्हणजे विश्वास असण्याची गरज आहे.प्रत्येक समाज घटकाने हाच विचार करायला हवा .टाळी कधीएका हाताने वाजत नाही."गोवंश हत्या बंदी कायद्याची गरज आहे "यावर अवश्य जनमत घ्यायला हवे .त्याच बरोबर दुध देणे बंद झालेल्या दुभत्या जनावरांची कशा प्रकारे जोपासना केली जाते ?तितक्याच आपुलकीने निगा राखली जाते का ?याविषयी आत्मचिंतन हवे .शासनाच्या संबंधित विभागाने पकडलेली जनावरे कोंडवाड्यात ठेवण्याऐवजी जवळच्या गोरक्षण संस्थेत ठेवावी .गोरक्षण संस्थेत जनावरांची खाण्यापिण्याची व्यवस्था असावी, देखभालीसाठी कर्मचारी ,तज्ञ आरोग्य अधिकारी व सरकारची मान्यता आणि सरकारी अनुदान मिळावे.प्रत्येक तहसीलच्या ठिकाणी गोरक्षण संस्था असावी व गोपालक /कर्मचारी नोकरीत ठेवावे.जेणेकरून भारतीय पशुधन समृध्द होईल
सुहास सोहोनी ....९४०५३४९३५४
pl.visit :suhassohoni.blogspot.com
No comments:
Post a Comment